शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
4
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
6
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
7
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
8
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
9
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
10
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
11
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
12
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
13
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
14
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
15
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
16
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
17
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
18
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
19
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
20
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?

कृषी पंपांच्या ‘अटल सौर योजने’ला यंदाही ठेंगा : केंद्राकडून निधीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:59 IST

विश्वास पाटील ।कोल्हापूर : केंद्र सरकारने गतवर्षी मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या सौर कृषी पंप बसविण्याच्या अटल सौर कृषी पंप योजनेला या वर्षात पावसाळा सुरू झाला तरी केंद्र सरकारकडून अद्याप मंजुरीच मिळालेली नाही. अजून केंद्रानेच निधी मंजूर न केल्याने प्रस्तावही मागविले नसल्याचे अंमलबजावणी यंत्रणा असलेल्या ‘मेडा’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले.गतवर्षी कोल्हापूर, ...

ठळक मुद्देगतवर्षात आठ जिल्ह्यांत शून्य प्रतिसाद, पावसाळा सुरू झाला तरी अद्याप मंजुरीच नाही

विश्वास पाटील ।कोल्हापूर : केंद्र सरकारने गतवर्षी मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या सौर कृषी पंप बसविण्याच्या अटल सौर कृषी पंप योजनेला या वर्षात पावसाळा सुरू झाला तरी केंद्र सरकारकडून अद्याप मंजुरीच मिळालेली नाही. अजून केंद्रानेच निधी मंजूर न केल्याने प्रस्तावही मागविले नसल्याचे अंमलबजावणी यंत्रणा असलेल्या ‘मेडा’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

गतवर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगरसह आठ जिल्ह्यांतील एकही प्रस्ताव मंजूर झालेला नाही. राज्यासाठी दहा हजार सौर कृषी पंप बसविण्यात येणार होते, त्यातील ५५८१ पंप बसविल्याची माहिती सूत्रांनी दिली. या योजनेला राज्यस्तरीय संनियंत्रण समितीच्या बैठकीत ८ डिसेंबर २०१७ ला स्थगिती दिली. योजनेमध्ये काही बदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते; परंतु बदलही नाही व जुनी योजनाही नाही अशी सध्या स्थिती आहे. केंद्राने या योजनेची घोषणा केल्यावर राज्य शासनानेही २७ मार्च २०१५ ला आदेश काढून योजनेची रूपरेषा निश्चित केली. त्यानुसार ही योजना सुरुवातीला विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांसाठीच होती; परंतु त्यास कमी प्रतिसाद मिळाल्याने ती राज्यासाठी लागू केली. पहिल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर महावितरण तिची अंमलबजावणी करून त्यानंतर ही योजना ‘महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण’ (मेडा)तर्फे राबविण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी राज्यभरातून १२९५७ अर्ज या पंपांसाठी आले होते. त्यातून जिल्हा समितीने ९३८२ मंजूर केले. त्यातील ९२५८ ग्राहकांनी फर्म कोटेशन दिले.

त्यामध्ये एसी सेटसाठी २४९९ व डीसी सेट (जास्त क्षमता) ३२३२ अर्ज असे५७३१ प्रस्ताव मंजूर झाले. त्यापैकी ५५८१ शेतकऱ्यांच्या शेतात हासौरपंप बसविल्याची माहिती ‘महावितरण कंपनी’कडून देण्यात आली.दक्षिण महाराष्ट्राला लाभ का नाही..?कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर, सिंधुदुर्ग व औरंगाबाद या जिल्ह्यांतून एकही प्रस्ताव मंजूर झाला नाही. कोल्हापूर जिल्ह्यातून १७१ प्रस्ताव आले होते.त्यातील ५२ प्रस्तावांचे भूजल सर्वेक्षण यंत्रणेने सर्वेक्षण केले; परंतु प्रत्यक्षात मात्र एकाही शेतकºयाला हा पंप मिळाला नाही. हा पंप नदीतील पाण्यासाठी बसविता येत नाही. विहिरीवर व बोअरच्या पाण्यावरच बसविण्याचा राज्य सरकारचा निकष असल्याने दक्षिण महाराष्ट्रातील शेतकºयांना त्याचा लाभ झाला नाही.योजनेतून मिळणारे अनुदान असेपंप मूळ केंद्राचा राज्य शासन वक्षमता किंमत हिस्सा लाभार्थी प्रत्येकी कर्ज३ अश्वशक्ती एसी पंप ३ लाख २४ हजार ९७२०० १६२०० १९४४००३ अश्वशक्ती डीसी पंप ४ लाख ५ हजार १,२१,५०० २०२५० २,४३०००५ अश्वशक्ती एसी पंप ५ लाख ४० हजार १,६२००० २७००० ३,२४०००५ अश्वशक्ती डीसी पंप ६ लाख ७५ हजार २,२५०० ३३७५० ४,०५०००