शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपांच्या ‘अटल सौर योजने’ला यंदाही ठेंगा : केंद्राकडून निधीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:59 IST

विश्वास पाटील ।कोल्हापूर : केंद्र सरकारने गतवर्षी मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या सौर कृषी पंप बसविण्याच्या अटल सौर कृषी पंप योजनेला या वर्षात पावसाळा सुरू झाला तरी केंद्र सरकारकडून अद्याप मंजुरीच मिळालेली नाही. अजून केंद्रानेच निधी मंजूर न केल्याने प्रस्तावही मागविले नसल्याचे अंमलबजावणी यंत्रणा असलेल्या ‘मेडा’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले.गतवर्षी कोल्हापूर, ...

ठळक मुद्देगतवर्षात आठ जिल्ह्यांत शून्य प्रतिसाद, पावसाळा सुरू झाला तरी अद्याप मंजुरीच नाही

विश्वास पाटील ।कोल्हापूर : केंद्र सरकारने गतवर्षी मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या सौर कृषी पंप बसविण्याच्या अटल सौर कृषी पंप योजनेला या वर्षात पावसाळा सुरू झाला तरी केंद्र सरकारकडून अद्याप मंजुरीच मिळालेली नाही. अजून केंद्रानेच निधी मंजूर न केल्याने प्रस्तावही मागविले नसल्याचे अंमलबजावणी यंत्रणा असलेल्या ‘मेडा’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

गतवर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगरसह आठ जिल्ह्यांतील एकही प्रस्ताव मंजूर झालेला नाही. राज्यासाठी दहा हजार सौर कृषी पंप बसविण्यात येणार होते, त्यातील ५५८१ पंप बसविल्याची माहिती सूत्रांनी दिली. या योजनेला राज्यस्तरीय संनियंत्रण समितीच्या बैठकीत ८ डिसेंबर २०१७ ला स्थगिती दिली. योजनेमध्ये काही बदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते; परंतु बदलही नाही व जुनी योजनाही नाही अशी सध्या स्थिती आहे. केंद्राने या योजनेची घोषणा केल्यावर राज्य शासनानेही २७ मार्च २०१५ ला आदेश काढून योजनेची रूपरेषा निश्चित केली. त्यानुसार ही योजना सुरुवातीला विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांसाठीच होती; परंतु त्यास कमी प्रतिसाद मिळाल्याने ती राज्यासाठी लागू केली. पहिल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर महावितरण तिची अंमलबजावणी करून त्यानंतर ही योजना ‘महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण’ (मेडा)तर्फे राबविण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी राज्यभरातून १२९५७ अर्ज या पंपांसाठी आले होते. त्यातून जिल्हा समितीने ९३८२ मंजूर केले. त्यातील ९२५८ ग्राहकांनी फर्म कोटेशन दिले.

त्यामध्ये एसी सेटसाठी २४९९ व डीसी सेट (जास्त क्षमता) ३२३२ अर्ज असे५७३१ प्रस्ताव मंजूर झाले. त्यापैकी ५५८१ शेतकऱ्यांच्या शेतात हासौरपंप बसविल्याची माहिती ‘महावितरण कंपनी’कडून देण्यात आली.दक्षिण महाराष्ट्राला लाभ का नाही..?कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर, सिंधुदुर्ग व औरंगाबाद या जिल्ह्यांतून एकही प्रस्ताव मंजूर झाला नाही. कोल्हापूर जिल्ह्यातून १७१ प्रस्ताव आले होते.त्यातील ५२ प्रस्तावांचे भूजल सर्वेक्षण यंत्रणेने सर्वेक्षण केले; परंतु प्रत्यक्षात मात्र एकाही शेतकºयाला हा पंप मिळाला नाही. हा पंप नदीतील पाण्यासाठी बसविता येत नाही. विहिरीवर व बोअरच्या पाण्यावरच बसविण्याचा राज्य सरकारचा निकष असल्याने दक्षिण महाराष्ट्रातील शेतकºयांना त्याचा लाभ झाला नाही.योजनेतून मिळणारे अनुदान असेपंप मूळ केंद्राचा राज्य शासन वक्षमता किंमत हिस्सा लाभार्थी प्रत्येकी कर्ज३ अश्वशक्ती एसी पंप ३ लाख २४ हजार ९७२०० १६२०० १९४४००३ अश्वशक्ती डीसी पंप ४ लाख ५ हजार १,२१,५०० २०२५० २,४३०००५ अश्वशक्ती एसी पंप ५ लाख ४० हजार १,६२००० २७००० ३,२४०००५ अश्वशक्ती डीसी पंप ६ लाख ७५ हजार २,२५०० ३३७५० ४,०५०००