शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

धामणीवासीयांना आश्वासनांचे गाजरच

By admin | Updated: May 11, 2017 00:18 IST

धामणीवासीयांना आश्वासनांचे गाजरच

गेल्या २0 वर्षांच्या काळात सरकारे बदलली. मात्र, धामणीवासीयांच्या नशिबी केवळ आश्वासनांची गाजरेच आली. प्रकल्पस्थळासह धामणी खोऱ्यासही भग्नावस्था आली असून, राजकीय अनास्था यासाठी कारणीभूत आहे. श्रेयवादाचे राजकारण आणि धामणीवासीयांचे अज्ञान या सर्वांमुळेच प्रकल्पाचे काम रखडले आहे. त्याच वेध घेणारी मालिका ...महेश आठल्ये । लोकमत न्यूज नेटवर्कम्हासुर्ली : धामणी खोऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या धामणी मध्यम प्रकल्पाचे काम प्रशासकीय मान्यतेनंतरही २0 वर्षे अपूर्णावस्थेत आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी धामणीवासीयांनी दोन वेळा विराट मोर्चे काढले. दोनवेळा सुधारित प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली. प्रकल्पाची किंमत १२० कोटींवरून तब्बल ८०० कोटींवर पोहोचली. मात्र, आजही या प्रकल्पाचे काम रखडले असून पाणी टंचाईमुळे धामणीवासीयांची होरपळ कायम आहे. राधानगरी, पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यांत विभागलेल्या धामणी खोऱ्यात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, पिके पाण्यावाचून होरपळू लागली आहेत. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र, धामणी मध्यम प्रकल्पाचे काम गेली अकरा वर्षे सलगपणे बंद आहे. गेल्या आॅगस्टमध्ये या प्रकल्पाच्या सुधारित आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळाली व या ७८२ कोटींच्या खर्चास मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली. मात्र, याही वर्षी या प्रकल्पाचे काम सुरू न झाल्याने तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात अत्यल्प तरतूद झाल्याने धामणीवासीयांच्या पदरात पुन्हा निराशा पडली आहे. वेळोवेळी केवळ आश्वासनांची गाजरे दाखवायची आणि राजकीय लाभ उठवायचा हेच प्रत्येक सरकारचे धोरण असल्याचे यावरून दिसते.३.८५ टीएमसी क्षमतेच्या धामणी मध्यम प्रकल्पास १९९९ ला मंजुरी मिळाली. मात्र, काम सुरू होण्यास २००० साल उजाडले. दरम्यानच्या काळात अनेकवेळा पुनर्वसनाचा प्रश्न, वनविभागाचा प्रश्न, निधीची कमतरता, आदी कारणांनी प्रकल्पाचे काम रखडले. वेळोवेळी यावर मार्ग काढून तत्कालीन लोकप्रतिनिधींनी काम सुरू होण्यासाठी प्रयत्न केले. सन २०१० पासून या प्रकल्पाचे काम गेली सलग ११ वर्षे पूर्णपणे बंद आहे. परिणामी, प्रकल्पस्थळास भग्नावस्था आली आली आहे.गेली २0 वर्षे आम्ही प्रकल्पासाठी जमिनी दिल्या. मात्र, प्रकल्प अपूर्ण असल्यामुळे भीषण पाणीटंचाई जाणवते. प्रकल्पग्रस्तांसह लाभधारक शेतकरी सरकारच्या धोरणामुळे देशोधडीला लागला आहे. - कृष्णात आरबुणे (अध्यक्ष, धामणी धरणग्रस्त संग्राम समिती)काही तांत्रिक अडचणीमुळे प्रकल्पाचे काम थांबले आहे. त्यावर मार्ग काढणे सुरू असून, धामणी प्रकल्पाचे काम सुरू केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी जबाबदार आहे.- आमदार प्रकाश आबिटकर