शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होण्याची गरज

By admin | Updated: January 10, 2015 00:26 IST

भालचंद्र कुलकर्णी : नाट्य महोत्सवाचे उद्घाटन

आजरा : आजरा तालुक्याची स्वत:ची अशी नाट्यपरंपरा आहे. आजरा गाव हे नाटकाचे वेड जोपासणारे गाव आहे. नाट्यशास्त्र विभागातून व स्थानिक मंडळांकडून तयार होणाऱ्या नाट्यकलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होण्याची गरज असून एखादे नाट्यविद्यापीठ सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी केले.नाट्य दिग्दर्शक कै. रमेश टोपले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित राज्यस्तरीय नाट्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे संचालक अशोक चराटी होते. कुलकर्णी यांच्याहस्ते नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.कुलकर्णी म्हणाले, समांतर नाटक, दलित नाटक, कौटुंबिक नाटक, सामाजिक नाटक असे नाटकाचे विविध प्रकार सांगितले जात असले तरी चांगले नाटक आणि वाईट नाटक असे दोनच प्रकार आपणाला माहीत आहेत. रमेश टोपलेसारख्या नाटकाची प्रचंड जडण असणाऱ्या माणसाच्या अकाली निधनाने प्रचंड हानी झाली आहे. नवनाट्यने व डॉ. श्रद्धानंद ठाकूर यांच्यासारख्या नव्या दमाच्या मंडळींनी आजऱ्याची नाट्य चळवळ पुढे देण्यासाठी प्रयत्न करावेत.अशोकअण्णा चराटी म्हणाले, नाट्यचळवळ पुढे नेण्यासाठी आपले सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत. नाट्य विद्यापीठ आजरा येथे व्हावे यासाठी प्रयत्न जरूर केले जातील, असे सांगितले.यावेळी ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे, रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीचे अध्यक्ष एम. एल. चौगुले, मिनर्वा गु्रपचे सुरेश होडगे, प्रकाश वाटवे, अन्नपूर्णादेवी चराटी, आय. के. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. चंद्रशेखर फडणवीस यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. सुधीर मुंज यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)