शहरं
Join us  
Trending Stories
1
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
2
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
3
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
4
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
5
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
6
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!
7
हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल
8
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
9
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कियारा अडवाणी, दिवाळीनिमित्त शेअर केला क्युट व्हिडीओ
10
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
11
Ashwin Amavasya 2025: दिवाळीच्या आनंदात ठेवा पितरांचे स्मरण; त्यांचे नावे पणती लावून करा दीप प्रज्वलन!
12
Shaheen Afridi Pakistan New ODI Captain : रिझवानची 'उचलबांगडी'; आफ्रिदीच्या डोईवर 'कॅप्टन्सीचा ताज'
13
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
14
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
15
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
16
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
17
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
18
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
19
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
20
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार

नाल्याच्या काठावर २५० च्या आसपास अवैध बांधकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:27 IST

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे नाल्याच्या काठावरील अवैध बांधकामे चर्चेत आली आहेत. राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेतली असून ...

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे नाल्याच्या काठावरील अवैध बांधकामे चर्चेत आली आहेत. राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेतली असून याबाबत काही कठोर निर्णय घेण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. महापालिका प्रशासनानेही त्याची दखल घेत सर्वेक्षण सुरू केले आहे. परंतु सर्वेक्षणाने प्रश्न सुटणार नसून पालिका प्रशासनानेही कठोर भूमिका घेणे आवश्यक ठरणार आहे.

महापुराला कारणीभूत असलेल्या नाल्यातील अतिक्रमणाचे सर्वेक्षण झाले तरी या अतिक्रमणावर कारवाई होणार का आणि नवीन बांधकामे होणार नाहीत, याची खबरदारी घेणार का, या प्रश्नाचे उत्तर आता महापालिका प्रशासनाला द्यावे लागणार आहे. केवळ अवैध बांधकामावर कारवाई करून भागणार नाही, तर त्या त्या भागात अशी बांधकामे होत असताना अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी लागणार आहे.

कळंबा तलाव येथून जयंती नाल्याचा प्रवाह शहराच्या दिशेने आला आहे. पाचगाव रेणुका मंदिरापासून रायगड कॉलनी, जरगनगर, रामानंदनगर पासून हॉकी स्टेडियमच्या बाजूला हा नाला निघतो. शहराचा विस्तार होत जाईल तशी या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू झाली. साधारणपणे २००० सालापासून नाल्याच्या काठावरील जमिनीवर घरे बांधायला सुरुवात झाली.

आरक्षणातील जागा मूळ मालकांनी प्लॉट पाडून दाबून विकल्या. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कृपेने या जागांवर बांधकाम परवानगी दिली गेली. गुंठेवारी कायद्याचा त्यासाठी आधार घेतला. गुंठेवारीचा कायदा म्हणजे पैसे मिळवून देण्याचा एक हक्काचा पर्याय समोर आल्यामुळे अधिकाऱ्यांनी मुक्त हस्ते परवानगी दिल्या. शेजारी जयंती नाला वाहतोय, याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले. अधिकाऱ्यांनी फारशे गांभीर्याने लक्ष दिले नाही. मिळकतधारकांनीही भविष्यकाळात जयंती नाल्याचा प्रवाह वाढून घरात पाणी शिरणार का, याचा जराही अभ्यास केला नाही.

रिटेनिंग वॉलवर अतिक्रमण?

महापालिकेने ओढ्याचे पाणी नागरी वस्तीत शिरू नये म्हणून जयंती नाल्यावर अनेक ठिकाणी संरक्षक भिंती (रिटेनिंग वॉल) बांधल्या आहेत. या भिंती बांधून झाल्यानंतर काही मिळकतधारकांनी या भिंतींना लागून घरांच्या भिंती बांधल्या असल्याचे दिसून येते. नाल्याच्या परिसरात सहा मीटरपर्यंत बांधकामाला परवानगी नसताना ही बांधकामे होत होती तेव्हा पालिकेचे अधिकारी गप्प बसले.

-आरक्षणातील जागा असल्याचा संशय-

पाचगावपासून रायगड कॉलनीपर्यंत नाल्याकाठच्या जमिनीवर काही ठिकाणी आरक्षण टाकण्यात आले आहे. मूळ मालकांनी त्या सामान्य माणसांना विकल्या. गुंठेवारी कायदा आल्यानंतर त्या जमिनींचे चिरीमिरी देऊन नियमितीकरण झाले. त्यामुळे गुन्हा करणाऱ्यांपेक्षा गुन्हा करण्यास परवानगी देणारेच जास्त जबाबदार असल्याने अधिकाऱ्यांवर प्रथम कारवाई झाली पाहिजे.