शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

विशाळगडावरील अतिक्रमणे पुरातत्त्वने हटवावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:29 IST

कोल्हापूर : विशाळगड (ता. शाहुवाडी) येथील अतिक्रमण हटविण्याच्या दृष्टीने पुरातत्त्व खात्याने कायदेशीर अभ्यास करून संबंधितांना नोटिसा पाठवाव्यात व पुढील ...

कोल्हापूर : विशाळगड (ता. शाहुवाडी) येथील अतिक्रमण हटविण्याच्या दृष्टीने पुरातत्त्व खात्याने कायदेशीर अभ्यास करून संबंधितांना नोटिसा पाठवाव्यात व पुढील कार्यवाही सुरू करावी. याबाबतीत विभागाला जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून सहकार्य केले जाईल असे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी गुरुवारी दिले. यावेळी त्यांनी तहसीलदारांना परिसराचा सर्व्हे करण्यास सांगितले.

विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी रेखावार यांनी पुरातत्त्व खात्याचे सहसंचालक विलास वहाणे, शाहुवाडीचे तहसीलदार गुरू बिराजदार, पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे, कोल्हापूर वस्तूसंग्रहालयाचे मिलिंद कवितकर, गटविकास अधिकारी, वनखात्याचे अधिकारी व संघटनांचे कार्यकर्ते यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.

अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी वनखात्याची आहे असे पुरातत्त्व खात्याचे म्हणणे होते. मात्र, विशाळगड हे संरक्षित स्मारक आहे. अतिक्रमण हटवण्याची व तसेच तेथील वास्तूंचे जतन संवर्धन करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही पुरातत्त्व खात्याची असल्याचे पन्हाळा तहसीलदार यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले.

यावेळी जिल्हाधिकारी रेखावार यांनी पुरातत्त्व खात्याने सर्व कायदेशीर बाबी तपासून पुन्हा एकदा अतिक्रमण केलेल्यांना ३० दिवसांची नोटिसा पाठवाव्यात. स्थानिक पातळीवर बैठका घ्या, तेथील नागरिकांना वस्तुस्थिती समजावून सांगा, तहसीलदारांनी या परिसराचा पुन्हा सर्व्हे करावा व झालेल्या अतिक्रमणाची यादी तपासून बघावी. ज्या दुकानदार, रहिवाशांनी, नागरिकांनी येथे अतिक्रमण केले आहे त्यांच्यासाठी काही पर्यायी जागा उपलब्ध होते का याचाही सर्व्हे केला जावा असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी अतिक्रमण हटविण्याबाबत कोणकोणती कार्यवाही करण्यात येत आहे किंवा करण्यात आली याचा आढावा दर महिन्याला घेण्याचे ठरले. बैठकीला किशोर घाटगे, प्रमोद सावंत, बाबासो भोपळे आदी उपस्थित होते.

--

विकासासाठी १० कोटींची मागणी

विशाळगडावरील पुरातन मंदिरे व वास्तूंची दुरवस्था झाली आहे त्याचे जतन संवर्धन पुरातत्त्वकडून केले जावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावर विलास वहाणे यांनी त्यासाठी शासनाकडे १० कोटींची मागणी केली असल्याचे सांगितले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन वाढीसाठी विशेष उपक्रम घ्यावेत अशी सूचना केली.

--