शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

विशाळगडावरील अतिक्रमणे पुरातत्त्वने हटवावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:29 IST

कोल्हापूर : विशाळगड (ता. शाहुवाडी) येथील अतिक्रमण हटविण्याच्या दृष्टीने पुरातत्त्व खात्याने कायदेशीर अभ्यास करून संबंधितांना नोटिसा पाठवाव्यात व पुढील ...

कोल्हापूर : विशाळगड (ता. शाहुवाडी) येथील अतिक्रमण हटविण्याच्या दृष्टीने पुरातत्त्व खात्याने कायदेशीर अभ्यास करून संबंधितांना नोटिसा पाठवाव्यात व पुढील कार्यवाही सुरू करावी. याबाबतीत विभागाला जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून सहकार्य केले जाईल असे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी गुरुवारी दिले. यावेळी त्यांनी तहसीलदारांना परिसराचा सर्व्हे करण्यास सांगितले.

विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी रेखावार यांनी पुरातत्त्व खात्याचे सहसंचालक विलास वहाणे, शाहुवाडीचे तहसीलदार गुरू बिराजदार, पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे, कोल्हापूर वस्तूसंग्रहालयाचे मिलिंद कवितकर, गटविकास अधिकारी, वनखात्याचे अधिकारी व संघटनांचे कार्यकर्ते यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.

अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी वनखात्याची आहे असे पुरातत्त्व खात्याचे म्हणणे होते. मात्र, विशाळगड हे संरक्षित स्मारक आहे. अतिक्रमण हटवण्याची व तसेच तेथील वास्तूंचे जतन संवर्धन करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही पुरातत्त्व खात्याची असल्याचे पन्हाळा तहसीलदार यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले.

यावेळी जिल्हाधिकारी रेखावार यांनी पुरातत्त्व खात्याने सर्व कायदेशीर बाबी तपासून पुन्हा एकदा अतिक्रमण केलेल्यांना ३० दिवसांची नोटिसा पाठवाव्यात. स्थानिक पातळीवर बैठका घ्या, तेथील नागरिकांना वस्तुस्थिती समजावून सांगा, तहसीलदारांनी या परिसराचा पुन्हा सर्व्हे करावा व झालेल्या अतिक्रमणाची यादी तपासून बघावी. ज्या दुकानदार, रहिवाशांनी, नागरिकांनी येथे अतिक्रमण केले आहे त्यांच्यासाठी काही पर्यायी जागा उपलब्ध होते का याचाही सर्व्हे केला जावा असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी अतिक्रमण हटविण्याबाबत कोणकोणती कार्यवाही करण्यात येत आहे किंवा करण्यात आली याचा आढावा दर महिन्याला घेण्याचे ठरले. बैठकीला किशोर घाटगे, प्रमोद सावंत, बाबासो भोपळे आदी उपस्थित होते.

--

विकासासाठी १० कोटींची मागणी

विशाळगडावरील पुरातन मंदिरे व वास्तूंची दुरवस्था झाली आहे त्याचे जतन संवर्धन पुरातत्त्वकडून केले जावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावर विलास वहाणे यांनी त्यासाठी शासनाकडे १० कोटींची मागणी केली असल्याचे सांगितले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन वाढीसाठी विशेष उपक्रम घ्यावेत अशी सूचना केली.

--