शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

सुळकूड पाणी योजनेसंदर्भातील विषयांवर नगरपालिका सभेत मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:26 IST

इचलकरंजी : शहराला मंजूर झालेल्या दूधगंगा पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक ठिकाणी जागा खरेदी करणे, पाणी आरक्षण, योजनेसंदर्भात विविध परवानगी ...

इचलकरंजी : शहराला मंजूर झालेल्या दूधगंगा पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक ठिकाणी जागा खरेदी करणे, पाणी आरक्षण, योजनेसंदर्भात विविध परवानगी घेणे तसेच नगरपालिकेच्या हिश्श्याची रक्कम भरणे, या विषयाला सोमवारी पालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. या योजनेबाबतची सविस्तर माहिती माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी सभागृहात दिली.

विषयपत्रिकेवरील ११ व ऐनवेळचे ५ अशा एकूण १६ विषयांवर चर्चा करून मंजुरी घेण्यासाठी श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अलका स्वामी होत्या.

रिंग रोड येथील रस्ता रुंदीकरण करण्यात आला नाही. या मार्गावरून ऊस ट्रॅक्टर-ट्रॉली मोठ्या प्रमाणात जातात. तेथे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीही गर्दी असते. त्यामुळे तत्काळ या रस्त्याच्या कामाकडे लक्ष द्यावे, असे नगरसेविका संगीता आलासे यांनी सांगितले. यावर याच ठिकाणी अनेक अपघात झाले असून, या रस्त्यासंदर्भात फक्त चर्चा केली जाते. मात्र, प्रशासनाकडून कार्यवाही होत नाही, असा आरोप नगरसेवक मदन कारंडे यांनी उपस्थित केला. प्रकाश मोरबाळे यांनी शहरातील अनेक भू-संपादनाचे प्रश्न प्रलंबित असून, त्यातील त्रुटी दूर करण्याची गरज व्यक्त केली.

नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये फर्निचरचे काम राहिले असून, वर्षाअखेर या सभागृहात कौन्सिल सभा घेण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक अब्राहम आवळे यांनी सभागृहात केली. नगरपालिका मालकीच्या शहरातील विविध इमारतींमधील गाळेधारकांकडून दहा वर्षे घरफाळा वसूल केला नसल्याचे मोरबाळे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर प्रशासनाने थकीत घरफाळा वसुली करून नव्याने करार करण्याचे मान्य केले.

चौकटी

पाणीप्रश्नात वैयक्तिक नाराजी नको

नगरसेवक अजित जाधव यांनी सुळकूड योजनेसंदर्भात जवाहर साखर कारखान्यावर झालेल्या बैठकीचा वृत्तांत सभागृहात मांडण्याची मागणी केली. त्यावर सागर चाळके यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी पुढाकार घेतला असून, वैयक्तिक नाराजी व्यक्त करू नये, अशी विनंती केली.

कार्यक्रमात नियोजन नाही

नगरपालिकेच्यावतीने नियमितपणे विविध कार्यक्रम घेतले जातात. मात्र, त्यामध्ये नियोजन नसते, अशी खंत सागर चाळके यांनी व्यक्त केली.