शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी ग्रामपंचायतींना मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:25 IST

कोल्हापूर : गावामध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी ग्रामपंचायतींना मान्यता देण्यात आली आहे. पंधराव्या वित्त आयोगातून ...

कोल्हापूर : गावामध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी ग्रामपंचायतींना मान्यता देण्यात आली आहे. पंधराव्या वित्त आयोगातून अबंधित प्राप्त निधीच्या २५ टक्क्यांच्या मर्यादेत खर्च करण्यास ग्रामविकास विभागाने मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील ग्रामपंचायतींसमोरील निधी खर्च करण्याची अडचण दूर होणार आहे.

राज्यातील अनेक पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांना घरात ठेवू नका, कारण त्यामुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याचे शासनाच्या निर्दशनास आले आहे. त्यामुळे रुग्णांच्या गृह अलगीकरणापेक्षा संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशा सूचना वारंवार दिल्या जात होत्या. कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या टास्क फोर्सनेही हेच निरीक्षण नोंदवले; परंतु अशा पद्धतीचे संस्थात्मक विलगीकरण करताना त्यासाठी लागणारा खर्च कसा करायचा हा प्रश्न ग्रामपंचायतींसमोर होता.

गतवर्षी कोरोनाच्या काळात ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन गावातील शाळांमध्ये संस्थात्म्क विलगीकरणाची सोय केली. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जेवणाच्या सोयीपासून अन्य सुविधा या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या ग्रामस्थांना पुरवल्या; परंतु सलग दुसऱ्या दिवशी आलेल्या या संकटामध्ये ती मानसिकता राहिलेली नाही. म्हणूनच संस्थात्मक विलगीकरणाला ग्रामीण भागातून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले.

यावर उपाय म्हणून आता ग्रामविकास विभागानेच पंधराव्या वित्त आयोगातील जो अबंधित निधी आहे, त्यातील २५ टक्के निधी हा संस्थात्मक विलगीकरणासाठी खर्च करण्याला परवानगी दिली आहे. सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींच्या वतीने विलगीकरण कक्ष उभारण्याचे नियोजन करावे, अशी सूचना ग्रामविकास विभागाने दिली आहे.

चौकट

कोल्हापुरात ५ मे रोजीच घेण्यात आला निर्णय

हाच निर्णय कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी घेतला होता. त्यांनी याबाबत तीन पानी पत्रक सर्व ग्रामपंचायतींना काढले होते. त्यामध्ये त्यांनी निधी कसा आणि कोणत्या बाबीवर खर्च करायचा आणि संस्थात्मक अलगीकरणाला प्राधान्य द्या, अशा सूचना चव्हाण यांनी केल्या होत्या.

कोट

गावागावामध्ये संस्थात्मक अलगीकरण करताना ग्रामपंचायतींना काही अडचणी येत होत्या. प्रामुख्याने निधीच्या खर्चाबाबत पदाधिकाऱ्यांचा काही शंका होत्या. म्हणूनच या कामासाठी पंधराव्या वित्त आयोगातून अबंधित निधीच्या २५ टक्क्यांच्या मर्यादेत खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हसन मुश्रीफ

ग्रामविकासमंत्री, महाराष्ट्र