शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी ग्रामपंचायतींना मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:25 IST

कोल्हापूर : गावामध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी ग्रामपंचायतींना मान्यता देण्यात आली आहे. पंधराव्या वित्त आयोगातून ...

कोल्हापूर : गावामध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी ग्रामपंचायतींना मान्यता देण्यात आली आहे. पंधराव्या वित्त आयोगातून अबंधित प्राप्त निधीच्या २५ टक्क्यांच्या मर्यादेत खर्च करण्यास ग्रामविकास विभागाने मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील ग्रामपंचायतींसमोरील निधी खर्च करण्याची अडचण दूर होणार आहे.

राज्यातील अनेक पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांना घरात ठेवू नका, कारण त्यामुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याचे शासनाच्या निर्दशनास आले आहे. त्यामुळे रुग्णांच्या गृह अलगीकरणापेक्षा संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशा सूचना वारंवार दिल्या जात होत्या. कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या टास्क फोर्सनेही हेच निरीक्षण नोंदवले; परंतु अशा पद्धतीचे संस्थात्मक विलगीकरण करताना त्यासाठी लागणारा खर्च कसा करायचा हा प्रश्न ग्रामपंचायतींसमोर होता.

गतवर्षी कोरोनाच्या काळात ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन गावातील शाळांमध्ये संस्थात्म्क विलगीकरणाची सोय केली. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जेवणाच्या सोयीपासून अन्य सुविधा या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या ग्रामस्थांना पुरवल्या; परंतु सलग दुसऱ्या दिवशी आलेल्या या संकटामध्ये ती मानसिकता राहिलेली नाही. म्हणूनच संस्थात्मक विलगीकरणाला ग्रामीण भागातून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले.

यावर उपाय म्हणून आता ग्रामविकास विभागानेच पंधराव्या वित्त आयोगातील जो अबंधित निधी आहे, त्यातील २५ टक्के निधी हा संस्थात्मक विलगीकरणासाठी खर्च करण्याला परवानगी दिली आहे. सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींच्या वतीने विलगीकरण कक्ष उभारण्याचे नियोजन करावे, अशी सूचना ग्रामविकास विभागाने दिली आहे.

चौकट

कोल्हापुरात ५ मे रोजीच घेण्यात आला निर्णय

हाच निर्णय कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी घेतला होता. त्यांनी याबाबत तीन पानी पत्रक सर्व ग्रामपंचायतींना काढले होते. त्यामध्ये त्यांनी निधी कसा आणि कोणत्या बाबीवर खर्च करायचा आणि संस्थात्मक अलगीकरणाला प्राधान्य द्या, अशा सूचना चव्हाण यांनी केल्या होत्या.

कोट

गावागावामध्ये संस्थात्मक अलगीकरण करताना ग्रामपंचायतींना काही अडचणी येत होत्या. प्रामुख्याने निधीच्या खर्चाबाबत पदाधिकाऱ्यांचा काही शंका होत्या. म्हणूनच या कामासाठी पंधराव्या वित्त आयोगातून अबंधित निधीच्या २५ टक्क्यांच्या मर्यादेत खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हसन मुश्रीफ

ग्रामविकासमंत्री, महाराष्ट्र