शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

बिद्री कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्प उभारणीस मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:37 IST

सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी इथेनॉल प्रकल्प उभारणीस टाळ्यांचा गजरात मंजुरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील होते. या सभेत ९६ कोटी ५० लाखांचा डिस्टिलरीसह इथेनॉल प्रकल्प, आठ हजार गाळप क्षमता विस्तारीकरण, नऊ हजार ८२० ...

सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी इथेनॉल प्रकल्प उभारणीस टाळ्यांचा गजरात मंजुरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील होते. या सभेत ९६ कोटी ५० लाखांचा डिस्टिलरीसह इथेनॉल प्रकल्प, आठ हजार गाळप क्षमता विस्तारीकरण, नऊ हजार ८२० पात्र सभासद नियम व अटी पूर्ण करून करणे, २३१ रुपयांचे थकीत देणे, २०१९ नंतर नोकर भरती या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली.अध्यक्ष पाटील म्हणाले, केवळ साखर उत्पादन करून साखर कारखाने चालविणे सद्य:स्थितीत अवघड बनले आहे. सध्याच्या आव्हानात्मक काळात सहवीज प्रकल्प उभारल्यामुळेच बिद्रीला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी काळानुसार बदलणे आवश्यकअसून सभासदांच्या हितासाठी कारखान्यामार्फत इथेनॉल प्रकल्प उभारला जाईल. वीज व पेट्रोलियम पदार्थांची गरज ही कायमपणे लागणार असल्याने केंद्र शासनाने इथेनॉल प्रकल्प उभारणासाठी प्रोत्साहन धोरण जाहीर केले असून ६ टक्के व्याजदराने ८० कोटीपर्यंत रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रकल्पासाठी ९६ कोटी ५० लाख खर्च उपेक्षित आहे. शासनाच्या उपक्रमाचा लाभ घेऊन तो शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी यापूर्वी मंजूर असलेल्या डिस्टलरीसह इथेनॉल प्रकल्प उभारत आहे.पाटील म्हणाले, कार्यक्षेत्रातील सर्व शेतकºयांचा ऊस वेळेत गाळप होण्यासाठी कारखान्याची गाळप क्षमता आठ हजार मे. टनांपर्यंत वाढविण्याचा मागील वार्षिक सभेत निर्णय घेतला असून, त्याचा परवाना मिळवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ऊस लावणीची नोंद शेतकºयांच्या शेतावर जाऊन मोबाईल टॅबद्वारे घेतली जाणार असून त्याची नोंद आॅनलाईन कारखान्याकडे करून ऊस तोडणी कार्यक्रमात सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. या हंगामात ऊस टोळ्यांसाठी अ‍ॅडव्हान्स देऊन पुरेशी तोडणी यंत्रणा सक्षम केलेली आहे.चर्चेत तानाजी खोत, बी. टी. मुसळे, शहाजी शिंदे, बंडा पाटील, पांडुरंग जरग, आदींनी सहभाग घेतला. सभेस कारखान्याचे संचालक याबरोबरच सूतगिरणीचे अध्यक्ष पंडितराव केणे, मार्केट कमिटीचे संचालक नेताजी पाटील, नाथाजी पाटील, जि. प.चे सदस्य मनोज फराकटे, राहुल देसाई, दिग्विजय पाटील, सुनीलराव कांबळे, बाळासाहेब भोपळे, पं. स.चे माजी सदस्य रघुनाथ कुंभार, एकनाथ चव्हाण, ‘गोकुळ’चे माजी संचालक फिरोजखान पाटील, भूषण पाटील, माजी सरपंच विकास पाटील, एम. एस. पाटील उपस्थित होते.कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांनी नोटीस वाचन केले. सचिव एस. जी. किल्लेदार यांनी मागील सभेचे प्रोसिंडिग वाचन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी आभार मानले.