शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

हुपरीवर अखेर प्रशासक नियुक्ती

By admin | Updated: April 12, 2017 01:21 IST

ग्रामपंचायत केली बरखास्त : नगरपालिका स्थापन करण्याच्या प्रक्रियेस सुरूवात

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथे नगरपालिका स्थापन होण्याचे रौप्यनगरीवासीयांचे गेल्या ४५ वर्षांपासूनचे असणारे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी राज्य शासनाने मंगळवारी ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपालिका उभारणीच्या प्रक्रियेस प्रत्यक्षात सुरुवात केली. तहसीलदार वैशाली राजमाने यांनी मंगळवारी रात्री प्रभारी सरपंच भारती बावचे यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. हुपरी शहराची लोकसंख्या सुमारे ५० हजारांहून अधिक झाली आहे. शहराचा विस्तार मोठ्याप्रमाणात वाढल्याने नागरिकांना सर्वप्रकारच्या नागरी सुविधा पुरविणे ग्रामपंचायतीला अशक्य झाले होते. परिणामी नागरी विकासकामांचा पूर्णपणे बोजवारा उडाला होता. अशी परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून निर्माण झाली असतानाही सर्वच राजकीय पक्षांचे नेते व लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नगरपालिका करण्याचे वारंवार केवळ आश्वासन देऊन रौप्यनगरीवासीयांची बोळवण चालविली होती. परिणामी सर्वच वृत्तपत्रांचे पत्रकार, सर्व राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, तरुण मंडळे, तालीम संघटना व नागरिकांच्या बळावर नगरपालिका कृती समितीची उभारणी करून, गेल्या दोन वर्षांपासून विविध प्रकारच्या आंदोलनांबरोबरच राज्य शासनाकडे या प्रश्नी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. कृती समितीच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाला अखेर ३० जुलै २०१५ रोजी हुपरी येथे नगरपालिका स्थापन करण्याबाबतचा पहिला अध्यादेश काढावा लागला. त्यानंतरही कृती समितीने या प्रश्नी सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता.दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार सुरेश हाळवणकर यांनी निवडणुका संपताच या ठिकाणी नगरपालिकेची निश्चितपणे उभारणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे रौप्यनगरीवासीयांनी भाजप उमेदवारांच्या पदरात मोठ्याप्रमाणात मते टाकून विजयी केले आहे. याबाबतची जाणीव जनता समूहाचे संस्थापक आण्णासाहेब शेंडुरे यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार सुरेश हाळवणकर यांना वेळोवेळी करून देऊन त्याबाबतचा पाठपुरावाही सुरू ठेवला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. ६) हुपरी येथे नगरपालिकेची स्थापना करण्याचा अंतिम अध्यादेश काढला. यावेळी दौलतराव पाटील, बाळासाहेब रणदिवे, किरण कांबळे, राजेंद्र सुतार, सचिन गाठ, संभाजी हांडे, धर्मा कांबळे, जयकुमार माळगे, सुदर्शन खाडे, सयाजीराव पाटील, बाबासाहेब गायकवाड, सर्जेराव हांडे, तसेच कृती समितीचे निमंत्रक अमजद नदाफ, बाळासाहेब कांबळे, तानाजी घोरपडे, आदी उपस्थित होते.प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करू : राजमानेयावेळी प्रशासक व तहसीलदार वैशाली राजमाने म्हणाल्या, या शासन निर्णयाने रौप्यनगरीवासीयांचे गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिका व्हावी असे स्वप्न सत्यात उतरत आहे. जनतेच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी येथे लवकरात लवकर नगरपालिकेची उभारणी होण्यासाठी अगदी तत्परतेने प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करू. तसेच नगरपालिका मंजुरीसाठी स्थानिक पत्रकारांनी उभारलेला लढा व घेतलेले परिश्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.