शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

हुपरीवर अखेर प्रशासक नियुक्ती

By admin | Updated: April 12, 2017 01:21 IST

ग्रामपंचायत केली बरखास्त : नगरपालिका स्थापन करण्याच्या प्रक्रियेस सुरूवात

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथे नगरपालिका स्थापन होण्याचे रौप्यनगरीवासीयांचे गेल्या ४५ वर्षांपासूनचे असणारे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी राज्य शासनाने मंगळवारी ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपालिका उभारणीच्या प्रक्रियेस प्रत्यक्षात सुरुवात केली. तहसीलदार वैशाली राजमाने यांनी मंगळवारी रात्री प्रभारी सरपंच भारती बावचे यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. हुपरी शहराची लोकसंख्या सुमारे ५० हजारांहून अधिक झाली आहे. शहराचा विस्तार मोठ्याप्रमाणात वाढल्याने नागरिकांना सर्वप्रकारच्या नागरी सुविधा पुरविणे ग्रामपंचायतीला अशक्य झाले होते. परिणामी नागरी विकासकामांचा पूर्णपणे बोजवारा उडाला होता. अशी परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून निर्माण झाली असतानाही सर्वच राजकीय पक्षांचे नेते व लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नगरपालिका करण्याचे वारंवार केवळ आश्वासन देऊन रौप्यनगरीवासीयांची बोळवण चालविली होती. परिणामी सर्वच वृत्तपत्रांचे पत्रकार, सर्व राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, तरुण मंडळे, तालीम संघटना व नागरिकांच्या बळावर नगरपालिका कृती समितीची उभारणी करून, गेल्या दोन वर्षांपासून विविध प्रकारच्या आंदोलनांबरोबरच राज्य शासनाकडे या प्रश्नी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. कृती समितीच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाला अखेर ३० जुलै २०१५ रोजी हुपरी येथे नगरपालिका स्थापन करण्याबाबतचा पहिला अध्यादेश काढावा लागला. त्यानंतरही कृती समितीने या प्रश्नी सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता.दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार सुरेश हाळवणकर यांनी निवडणुका संपताच या ठिकाणी नगरपालिकेची निश्चितपणे उभारणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे रौप्यनगरीवासीयांनी भाजप उमेदवारांच्या पदरात मोठ्याप्रमाणात मते टाकून विजयी केले आहे. याबाबतची जाणीव जनता समूहाचे संस्थापक आण्णासाहेब शेंडुरे यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार सुरेश हाळवणकर यांना वेळोवेळी करून देऊन त्याबाबतचा पाठपुरावाही सुरू ठेवला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. ६) हुपरी येथे नगरपालिकेची स्थापना करण्याचा अंतिम अध्यादेश काढला. यावेळी दौलतराव पाटील, बाळासाहेब रणदिवे, किरण कांबळे, राजेंद्र सुतार, सचिन गाठ, संभाजी हांडे, धर्मा कांबळे, जयकुमार माळगे, सुदर्शन खाडे, सयाजीराव पाटील, बाबासाहेब गायकवाड, सर्जेराव हांडे, तसेच कृती समितीचे निमंत्रक अमजद नदाफ, बाळासाहेब कांबळे, तानाजी घोरपडे, आदी उपस्थित होते.प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करू : राजमानेयावेळी प्रशासक व तहसीलदार वैशाली राजमाने म्हणाल्या, या शासन निर्णयाने रौप्यनगरीवासीयांचे गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिका व्हावी असे स्वप्न सत्यात उतरत आहे. जनतेच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी येथे लवकरात लवकर नगरपालिकेची उभारणी होण्यासाठी अगदी तत्परतेने प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करू. तसेच नगरपालिका मंजुरीसाठी स्थानिक पत्रकारांनी उभारलेला लढा व घेतलेले परिश्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.