शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

दुष्काळग्रस्तांसाठी उपाययोजना राबवा

By admin | Updated: October 1, 2015 00:41 IST

भारत पाटणकर : जयसिंगपूरमध्ये ‘रत्नाप्पाण्णा कुंभार विचार मंच’चे पुरस्कार प्रदान

जयसिंगपूर : दरवर्षी पाच लाख एकर जमीन औद्योगिक वसाहतींच्या नावाने घशात घातली जात आहे. महाराष्ट्रात प्रत्येकवर्षी शंभर तालुके दुष्काळग्रस्त होतात. गावाकडच्या शेतीवर भागत नसल्यामुळे शहरातील झोपडपट्टीमध्ये राहून शेतकरी गुलामी करीत आहेत. यासाठी ठोस उपाय योजना गरजेची आहे. विचार संपविण्यासाठी चांगली माणसे संपविली जात आहेत. यामुळे स्वांतत्र्याची खरी लढाई जिंकण्याची वेळ आली आहे, असे मत श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केले.येथील छत्रपती राजर्षी शाहू खुले नाट्यगृहामध्ये बुधवारी सायंकाळी ‘दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार विचार मंच’च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी पाटणकर बोलत होते. अध्यक्षस्थानी सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड होते.प्रारंभी शाहीर संजय जाधव यांच्या पोवाड्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विचारमंचचे अध्यक्ष बंडा मिणियार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर इंदुमती पाटणकर यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांना ‘जीवन गौरव’, डाव्या विचारसरणीचे व श्रमिक मुक्तीदलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांना ‘गौरव’, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ यांना ‘साहित्यरत्न’ या राज्यस्तरीय पुरस्कारासह शिरोळ तालुका स्तरावरील ‘क्रांती’ पुरस्कार कोथळी येथील कुस्ती निवेदक पै. शंकर पुजारी यांना प्रदान करण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष सुनील पाटील-मजलेकर, अ‍ॅड. सुरेश कुऱ्हाडे, अनंत दीक्षित, विठ्ठल वाघ, शंकर पुजारी, इंदुमती पाटणकर, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अशोक घोरपडे, चंद्रकांत जाधव, शंकर पाटील, इम्तियाज खान, बालवीर पाटील, मनोज डिगे, चिदानंद आवळेकर, गजाधन मानधना, बाबगोंडा पाटील, पदाधिकारी उपस्थित होते. महादेव मेथे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)