शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार : क्षीरसागर

By admin | Updated: October 7, 2015 00:17 IST

ही मतदारयादीतील मते गायब होण्याचा घोळ हा प्रशासनाने जाणूनबुजून केल्याचा आरोप करीत ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली.

कोल्हापूर : महापालिकेची निवडणूक अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपल्यावरही मतदारयादीतील घोळ अद्याप मिटलेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही यादीतील मतदार गायब होण्याची प्रकरणे दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहेत. त्यामुळे हा जाणूनबुजून केलेला घोळ असल्याचा आरोप करीत शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी सायंकाळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली तसेच आज, बुधवारी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.गेली महिनाभर मतदार यादीतील घोळ सुरूच आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्यानंतरही हा घोळ संपुष्टात आला नाही. विधानसभा वेळच्या मतदार याद्या प्रभागनिहाय फोडताना मतदार गायब होण्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रारूप मतदार याद्यांमध्ये अनेकांची नावे गायब होतीच; पण अख्ख्या गल्ल्या दुसऱ्या प्रभागात गेल्याचे, अनेक मतांचे गठ्ठे गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर यावर मागविलेल्या हरकतीनंतरही अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या; पण मतदार गायब होण्याचा प्रकार काहीअंशी कमी झाला. पण, परिपूर्ण मतदार याद्या तयार झाल्याच नाहीत. त्यामुळे मंगळवारपासून अर्ज भरण्याच्या दिवशीही क्षेत्रीय कार्यालयातही मतदारांनी येऊन गोंधळ घातला.त्याची दखल घेत आमदार राजेश क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासमवेत आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन ही मतदारयादीतील मते गायब होण्याचा घोळ हा प्रशासनाने जाणूनबुजून केल्याचा आरोप करीत ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली. तसेच या मागणीसाठी आज, बुधवारी मुंबईत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती दिली.