शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

उत्तरपत्रिका मूल्यमापनासाठी ‘मॉडेल अन्सर बुक’

By admin | Updated: August 27, 2015 00:35 IST

परीक्षा विभागाचे नवे पाऊल : अभियांत्रिकी विद्याशाखेसाठी अंमलबजावणी; व्यवस्थापन परिषदेची मान्यता

कोल्हापूर : उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतींची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षागणिक वाढती संख्या, मूल्यमापनाबाबतच्या वाढणाऱ्या तक्रारी कमी करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ आता ‘मॉडेल अन्सर बुक’ची (नमुना मार्गदर्शक उत्तरपत्रिका पुस्तिका) संकल्पना राबविणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने या संकल्पनेच्या माध्यमातून नवे पाऊल टाकणार आहे. ही संकल्पना अभियांत्रिकी विद्याशाखेसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. त्याला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे.विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांमधील काही विषयांच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी वाढत आहेत. परीक्षकांच्या पातळीवर योग्य कामकाज होत नसल्याने आणि नमुना मार्गदर्शक उत्तरपत्रिका उपलब्ध नसल्याने अचूक मूल्यमापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासह उत्तरपत्रिकांचे अचूक, नेमके मूल्यमापन करण्यासाठी ‘मॉडेल अन्सर बुक’ची संकल्पना परीक्षा विभागाकडून राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात अभियांत्रिकी विद्याशाखेसाठी पहिल्या सत्रात केली जाणार आहे. हे मॉडेल अन्सर बुक विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणी केंद्रावर पाठविण्यात येतील. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरदेखील त्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रमाणित उत्तरपत्रिकांप्रमाणे परीक्षकांना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करावी लागणार आहे. त्यामुळे मूल्यमापनाची प्रक्रिया प्रमाणित पद्धतीने होईल. त्यामुळे उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाबाबतच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)‘मॉडेल अन्सर बुक’ बनविण्यासाठी शैक्षणिक मानांकनानुसार तज्ज्ञ शिक्षक असलेल्या महाविद्यालयाची समन्वय संस्था (रिसोर्स सेंटर) म्हणून नियुक्त केली जाईल. या संस्थेद्वारे यासाठी कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन अशा संबंधित विषयांतील तज्ज्ञ शिक्षकांचा समावेश असलेले पॅनेल प्रत्येक विषयासाठी बनविले जाईल. त्यात विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षकांची नियुक्ती केली जाईल. त्यांना पेपर झाल्यानंतर ई-मेल अथवा हार्डकॉपी या स्वरूपात प्रश्नपत्रिका दिली जाईल. ते प्रश्नपत्रिकेतील प्रश्न वाटून घेऊन त्यांची प्रमाणित उत्तरांसह ‘मॉडेल अन्सर बुक’ तयार करतील. ‘असा होणार विद्यार्थ्यांना फायदा...मॉडेल अन्सर बुक’ हे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार असल्याने पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांना आपण कोणत्या प्रश्नाचे कसे उत्तर लिहिले आहे. शिवाय त्याला किती गुण मिळतील याचा अंदाज बांधता येणार आहे. यामुळे साहजिकच त्यांच्याकडून तक्रारी कमी होतील तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नांची पर्यवेक्षकांना कशी उत्तरे अपेक्षित आहेत शिवाय ती कशा पद्धतीने लिहिली पाहिजेत हे समजणार आहे. ते त्यांच्या गुणवाढीसाठी उपयुक्त ठरणारे आहे.