शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

अखेर ‘वाघ्या’चा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 17:09 IST

खंडोबाचा गोंधळ घालणाºया ‘वाघ्या’चा अखेर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी दूपारी दूर्देवी मृत्यू झाला. आनंदा बापू राऊत (वय ५५, रा. राजारामपूरी ३ गल्ली, मातंग वसाहत) असे त्यांचे नाव आहे. केएमटी बस अपघातातील हा तिसरा बळी गेल्याने शहरात पुन्हा तणावाचे वातावरण पसरले. राजारामपूरीमध्ये व्यापाºयांनी बंद पाळून राऊत यांना श्रध्दांजली वाहिली. राजारामपूरीसह शहरात चौका-चौकात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. 

ठळक मुद्देबस अपघातातील तिसरा बळी :राजारामपुरी परिसरात पुन्हा तणाव, उत्स्फुर्तपणे बंद केएमटीची वाहतूकही पुन्हा बंद बंद पाळून मृतांना श्रद्धांजली

कोल्हापूर , दि. ३ :   खंडोबाचा गोंधळ घालणाºया ‘वाघ्या’चा अखेर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी दूपारी दूर्देवी मृत्यू झाला. आनंदा बापू राऊत (वय ५५, रा. राजारामपूरी ३ गल्ली, मातंग वसाहत) असे त्यांचे नाव आहे. केएमटी बस अपघातातील हा तिसरा बळी गेल्याने शहरात पुन्हा तणावाचे वातावरण पसरले. राजारामपूरीमध्ये व्यापाºयांनी बंद पाळून राऊत यांना श्रध्दांजली वाहिली. राजारामपूरीसह शहरात चौका-चौकात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. 

गंगावेशच्या परिसरात ताबूत विसर्जन मिरवणुकीत भरधाव केएमटी बस घुसल्याने चिरडून तानाजी भाऊ साठे (५०), सुजल भानुदास अवघडे (१५, रा. राजारामपुरी तिसरी गल्ली, मातंग वसाहत, कोल्हापूर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला; तर अठरा भाविक गंभीर जखमी झाले. आनंदा राऊत यांच्या डोक्याला गंभीर दूखापत झाली होती. सीपीआर रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन त्यांना राजारामपूरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

प्रकृत्ती अत्यवस्थ असल्याने गेली तीन दिवस ते मृत्यूशी झुंझ देत होते. मंगळवारी दूपारी दीडच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बस अपघातातील तिसरा बळी गेल्याचे वृत्त शहरात पसरताच तणावाचे वातावरण पसरले. राऊत यांचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी रुग्णालयासमोर गर्दी केल्याने गोंधळ उडाला. नातेवाईकांचा अक्रोश, गोंधळामुळे वातावरण धिरगंभीर बनले होते.

राजारामपूरीत व्यापाºयांनी बंद पाळून राऊत यांना श्रध्दांजली वाहिली. घटनेदिवशी संतप्त जमावाने बसची तोडफोड केली होती. राऊत यांच्या मृत्यूचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता असल्याने शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. राऊत यांच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात आनला. तेथून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पंचगंगा स्मशानभूमित शोकाकुल वातावणात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

राऊत हे खंडोबाचा गोंधळ घालत असत. ते वाघ्या-मुरळीची भूमिका पार पाडत होते. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांची ‘वाघ्या’ व आनंद महाराज म्हणून ओळख होती. त्यांच्या मृत्यूची माहिती समजताच मातंग वसाहतीमध्ये सन्नाटा पसरला. महिला-पुरुषांना गहिवरुन आले. नातेवाईकांच्या अक्रोशाने परिसर शोकाकुल झाला. पापाची तिकटी येथे रविवारी ( दि. १) ताबूत विसर्जन मिरवणुकीत के.एम.टी. बस घुसून दोघांचा जागीच मृत्यू झाला होता; तर १८ जण जखमी झाले होते. यातील कांही जखमींवर खाजगी रुग्णालयात तर काहींजणांवर सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. या अपघातात गंभीर जखमी झालेले आनंदा बापू राऊत (वय ५०, राजारामपुरी दुसरी गल्ली) यांचा आज (मंगळवार) दुपारी मृत्यू झाला. त्यांच्यावर राजारामपुरी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. हे वृत्त समजताच राजारामपुरीत पुन्हा तणाव निर्माण झाला. सलग दुसºया दिवशीही राजारामपुरी परिसरात बंद पाळण्यात आला.

कालच्या बंदनंतर सकाळपासून पुन्हा व्यवहार सुरळीत झाले होते. मात्र दुपारी सव्वा दोनच्या सुमारास राऊत यांच्या मृत्यूचे वृत्त समजल्यानंतर राजारामपुरी परिसरातील दुकाने उत्स्फुर्तपणे बंद ठेवण्यात आली. मंगळवारी सकाळी सुरु करण्यात आलेली केएमटीची वाहतूकही पुन्हा बंद करण्यात आली आहे.

अपघातात ठार झालेले आणि जखमी झालेले सर्वजण राजारामपुरी (मातंग वसाहत) येथील असल्याने मंगळवारीही राजारामपुरी परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. येथील सर्वच दुकानदारांनी सोमवारी सकाळीही बंद पाळून मृतांना श्रद्धांजली वाहिली.रविवारी (दि. १) रात्री घडलेल्या घटनेचे पडसाद राजारामपुरी येथे मंगळवारीही उमटले. मंगळवारी तिसºया जखमीचाही मृत्यू झाल्याचे समजताच राजारामपुरी मुख्य रस्त्यासह सर्व परिसरातील दुकाने बंद करण्याचे आवाहन संतप्त युवक करत होते, याचा परिणाम म्हणून आज दुपारी राजारामपुरीतील सर्व दुकाने बंद करण्यात आली. त्यामुळे एक प्रकारे कडकडीत ‘बंद’च पाळण्यात आला. कोल्हापूर शहरातील राजारामपुरी ही एक मोठी व्यापारी पेठ मानली जाते; पण ‘बंद’मुळे सर्वत्र शुकशुकाट होता. या परिसरातील मार्गावर सकाळी काही केएमटी बसेस धावल्या, परंतु तिसºया जखमीचा मृत्यू झाल्याचे समजताच केएमटीची वाहतूकही पुन्हा थांबविण्यात आली आहे.