शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

पाच दशकात मध्य महाराष्ट्र, कोकणातील वार्षिक तापमानात २.५ सेल्सिअसपर्यंत वाढ अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : तापमानात होणारी वाढ आणि हवामानातील बदलामुळे भविष्यात महाराष्ट्रातील तापमानात तसेच पर्जन्यमानात लक्षणीय वाढ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : तापमानात होणारी वाढ आणि हवामानातील बदलामुळे भविष्यात महाराष्ट्रातील तापमानात तसेच पर्जन्यमानात लक्षणीय वाढ होणार असून, याचा अन्नधान्य उत्पादनावर गंभीर परिणाम होणार असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. यामध्ये कोकण आणि पश्चिम घाटाचा समावेश आहे.

‘जर्नल स्प्रिंगर नेचर’ या संशोधनपत्रिकेत महाराष्ट्रातील वातावरणाचे भविष्य आणि त्याचा पीक उत्पादनावर होणाऱ्या परिणामांविषयीचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राहुल तोडमल यांनी हे संशोधन केले आहे. या संशोधनानुसार २०५० पर्यंत राज्याच्या वार्षिक सरासरी तापमानामध्ये ०.५ ते २.५ अंश सेल्सिअस वाढ होणार असल्याचा अंदाज असून, पुढील पाच दशकांमध्ये राज्यातील ८० टक्के जिल्ह्यांमध्ये वार्षिक सरासरी तपमान, वार्षिक किमान तापमान आणि वार्षिक कमाल तपमान यामध्ये लक्षणीय बदल होतील.

यानुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये १ ते २.५ अंश सेल्सिअस तापमानाची लक्षणीय वाढ होईल तर कोकणातील पर्जन्यमानात १५०-२१० एमएमपर्यंत आणि विदर्भ-पश्चिम घाट परिसरात ८२ ते २२५ एमएमपर्यंत वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

मोसमी पर्जन्यामध्ये २०१५ ते २१०० या काळात भरीव वाढ होणे अपेक्षित आहे. यात कोकण आणि विदर्भात २०५० पर्यंत पर्जन्यमानात सुमारे १८ ते २२ टक्क्यांची वाढ होणार आहे. कोकणातील पर्जन्यमानात १५०-२१० एमएमपर्यंत आणि विदर्भ-पश्चिम घाट परिसरात ८२ ते २२५ एमएमपर्यंत वाढ होण्याची चिन्हे आहेत. प्राध्यापक तोडमल यांनी पुण्यातील आयआयटीएम, पुणे या संस्थेकडून प्राप्त झालेल्या २०१५ ते २१०० या सालादरम्याच्या प्रादेशिक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या प्रतिकृती सांख्यिकी सामग्रीचे संख्याशास्त्रीय विश्लेषण करून हे संशोधन केले आहे.

ऊस, कांदा, मक्यासारख्या नगदी पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम

राज्यातील हवामान बदलांमुळे २०३३ नंतर बहुतांश प्रदेशातील महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होतील, असा अंदाज या अहवालात व्यक्त केला आहे. तापमानवाढीमुळे ज्वारी, बाजरी आणि कडधान्यासारख्या पारंपरिक पिकांबरोबरच ऊस, कांदा, मक्यासारख्या नगदी पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होणार आहे. प्रामुख्याने हिवाळ्यात होणारी सरासरी तापमानाची वाढ गव्हासारख्या पिकाच्या उत्पादकतेसाठी मारक ठरणार आहे.