शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

नगरपंचायतीची घोषणा केवळ लोकप्रियतेसाठीच

By admin | Updated: March 14, 2016 23:48 IST

आजरा ग्रामपंचायत : नगरसेवक पदाची स्वप्ने पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास

ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याबाबतच्या विविध नेतेमंडळींकडून केल्या जाणाऱ्या घोषणा या केवळ सवंग लोकप्रियतेसाठीच असल्याचे स्पष्ट होत असून, गेली चार वर्षे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर नगरसेवक होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या मंडळींचा मात्र पुन्हा पुन्हा भ्रमनिरास होत आहे.साडेतीन वर्षांपूर्वी आजरा ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. यावेळी ग्रामपंचायतीची नगरपंचायत होणार, असे सांगत तंटामुक्ती समितीने निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्नही केला. यामुळे इच्छा असूनही अनेक इच्छुकांनी निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहणे पसंत केले. प्रत्यक्षात मात्र अद्याप ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर तर झालेले नाहीच; पण या चर्चेमुळे अनेकजण विनासायास सदस्य बनले आणि त्यांनी पदेही भोगली.सरपंचपदाचीही अवस्था अशीच राहिलीनगरपंचायतीची टांगती तलवार असल्याने या पदासाठीही वेळोवेळी बराच संघर्ष झाला. कधी तीन, तर कधी सहा महिन्यांसाठी सरपंचपदी संधी दिली गेल्याने सरपंचपदाची शानही निघून गेली. दरम्यान, गेल्या साडेतीन वर्षांत ज्या-ज्या नेतेमंडळींनी ग्रामपंचायतीला भेट दिली, त्यांनी मात्र लवकरच आजरा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होणार, असे सांगितल्याने सरपंचपदाच्या संघर्षात भरच पडत गेली.साडेतीन वर्षे झाली; पण ग्रामपंचायतीचे काही नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले नाही. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार हसन मुश्रीफ, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह सर्वांनी आजरा नगरपंचायत होण्यासाठी आपण प्रयत्न करू, असेही सांगितल्याने आजरेकरांच्या आशा या घोषणेकडे लागून आहेत.एखाद्याने वर्षात, तर कुणी महिनाभरात नगरपंचायत करण्याचे आश्वासन दिले होते; पण या घोषणा केवळ लोकप्रियतेसाठीच होत्या, हे स्पष्ट होत आहे. आणखी दीड वर्षांनी रितसर ग्रामपंचायतीची निवडणूक आहेच. त्यामुळे नेतेमंडळींनी अशा घोषणा थांबवून नगरपंचायत होण्यासाठी थेट आपली ताकद वापरण्याची गरज आहे.४मुळातच दिशाहीन नेतृत्वामुळे आजरा तालुकावासीयांची फरफट होत असून, तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हा प्रश्नही याचाच एक भाग आहे. नेतेमंडळींकडून सामूहिक प्रयत्न झाल्याशिवाय आजरा ग्रामपंचायतीची नगरपंचायत होणे सध्या तरी अडचणीचे दिसते.