शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

रॅलीच्या माध्यमातून ‘रानमोडी’चे उच्चाटन

By admin | Updated: January 5, 2015 00:40 IST

पन्हाळा तालुक्यात रॅली : निसर्गमित्र, राजाराम महाविद्यालयाचा उपक्रम

पोर्ले तर्फ ठाणे : निसर्गमित्र संघटना आणि राजाराम महाविद्यालयाच्या वतीने पन्हाळा पश्चिम भागात ‘निसर्गाकडे चला’ असा संदेश देत सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून ‘रानमोडी’ तणाचे श्रमदानातून उच्चाटन करण्यात आले. कोल्हापूर येथील शाहू मिल, मंगेशकरनगर, बेलबाग परिसरातील ‘रानमोडी’ तणाचे उच्चाटन करून रॅली सुरू झाली. रॅलीच्या दरम्यान येणाऱ्या गावातील शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, सार्वजनिक मंडळे, महिला बचत गट, शेतकरी, कष्टकरी यांच्यात ‘रानमोडी’ व पर्यावरण जागृतीविषयी कृतिशील प्रबोधन करण्यात आले. शेती आणि जंगलसंपदेवर अतिक्रमण करणाऱ्या तणांची माहिती देण्यात आली.पर्यावरणपूरक जीवनशैली आचरणात आणण्याच्या दृष्टिकोनातून पाण्याचे महत्त्व, कचऱ्याचे विघटन, प्लास्टिकचा गैरवापर, विजेचा वापर कमी, सौरऊर्जेचा वापर, आदींविषयी ग्रामस्थांना विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. तुकाराम महाराजांचा ‘पर्यावरणपूरक संदेश’ देणाऱ्या माहितीपटाद्वारे मार्गदर्शन केले. शाळेतील मुलांना ‘लाखमोलाची गोष्ट’, निसर्गखेळातून पर्यावरणाची जनजागृती, पथनाट्याद्वारे प्रात्यक्षिके करून राजाराम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रबोधन केले.रॅलीच्या दरम्यान निसर्गमित्र अनिल चौगुले, दिनकर चौगुले, ‘राजाराम’च्या प्रा. डॉ. अंजली पाटील, प्रा. शामराव कांबळे, प्रा. अजित आकोळकर यांनी मार्गदर्शन केले, तर प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन राजाराम महाविद्यालयातील ३० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ‘निसर्गाकडे चला’चा संदेश देत रानमोडी तणांची माहिती दिली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, ग्रामस्थ, सार्वजनिक तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)पर्यावरणाबाबत लोकांत सकारात्मक दृष्टिकोनाची कमतरता आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीला धोका निर्माण करणाऱ्या वस्तू नाकारण्याची मन:स्थिती तयार होऊ शकत नाही, तोपर्यंत पर्यावरण वाचू शकत नाही. लोकांनी पुनर्वापर आणि पुन:निर्मित वस्तूंचा वापर करायला हवा. तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीतील घटकांचे लेखापरीक्षण होणे काळाची गरज आहे. त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. - अनिल चौगुले, निसर्गमित्र.१८ गावांचा समावेशपन्हाळा तालुक्यातील आसुर्ले, पोर्ले तर्फ ठाणे, माजगाव, शिंदेवाडी, माळवाडी, देवठाणे, कसबा ठाणे, महाडिकवाडी, म्हाळुंगे, दिगवडे, तिरपण, कोतोली, पिंपळे, वाघवे, उत्रे, आदी गावांतून रॅलीने प्रबोधन केले.