शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

रॅलीच्या माध्यमातून ‘रानमोडी’चे उच्चाटन

By admin | Updated: January 5, 2015 00:40 IST

पन्हाळा तालुक्यात रॅली : निसर्गमित्र, राजाराम महाविद्यालयाचा उपक्रम

पोर्ले तर्फ ठाणे : निसर्गमित्र संघटना आणि राजाराम महाविद्यालयाच्या वतीने पन्हाळा पश्चिम भागात ‘निसर्गाकडे चला’ असा संदेश देत सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून ‘रानमोडी’ तणाचे श्रमदानातून उच्चाटन करण्यात आले. कोल्हापूर येथील शाहू मिल, मंगेशकरनगर, बेलबाग परिसरातील ‘रानमोडी’ तणाचे उच्चाटन करून रॅली सुरू झाली. रॅलीच्या दरम्यान येणाऱ्या गावातील शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, सार्वजनिक मंडळे, महिला बचत गट, शेतकरी, कष्टकरी यांच्यात ‘रानमोडी’ व पर्यावरण जागृतीविषयी कृतिशील प्रबोधन करण्यात आले. शेती आणि जंगलसंपदेवर अतिक्रमण करणाऱ्या तणांची माहिती देण्यात आली.पर्यावरणपूरक जीवनशैली आचरणात आणण्याच्या दृष्टिकोनातून पाण्याचे महत्त्व, कचऱ्याचे विघटन, प्लास्टिकचा गैरवापर, विजेचा वापर कमी, सौरऊर्जेचा वापर, आदींविषयी ग्रामस्थांना विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. तुकाराम महाराजांचा ‘पर्यावरणपूरक संदेश’ देणाऱ्या माहितीपटाद्वारे मार्गदर्शन केले. शाळेतील मुलांना ‘लाखमोलाची गोष्ट’, निसर्गखेळातून पर्यावरणाची जनजागृती, पथनाट्याद्वारे प्रात्यक्षिके करून राजाराम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रबोधन केले.रॅलीच्या दरम्यान निसर्गमित्र अनिल चौगुले, दिनकर चौगुले, ‘राजाराम’च्या प्रा. डॉ. अंजली पाटील, प्रा. शामराव कांबळे, प्रा. अजित आकोळकर यांनी मार्गदर्शन केले, तर प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन राजाराम महाविद्यालयातील ३० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ‘निसर्गाकडे चला’चा संदेश देत रानमोडी तणांची माहिती दिली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, ग्रामस्थ, सार्वजनिक तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)पर्यावरणाबाबत लोकांत सकारात्मक दृष्टिकोनाची कमतरता आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीला धोका निर्माण करणाऱ्या वस्तू नाकारण्याची मन:स्थिती तयार होऊ शकत नाही, तोपर्यंत पर्यावरण वाचू शकत नाही. लोकांनी पुनर्वापर आणि पुन:निर्मित वस्तूंचा वापर करायला हवा. तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीतील घटकांचे लेखापरीक्षण होणे काळाची गरज आहे. त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. - अनिल चौगुले, निसर्गमित्र.१८ गावांचा समावेशपन्हाळा तालुक्यातील आसुर्ले, पोर्ले तर्फ ठाणे, माजगाव, शिंदेवाडी, माळवाडी, देवठाणे, कसबा ठाणे, महाडिकवाडी, म्हाळुंगे, दिगवडे, तिरपण, कोतोली, पिंपळे, वाघवे, उत्रे, आदी गावांतून रॅलीने प्रबोधन केले.