शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

रॅलीच्या माध्यमातून ‘रानमोडी’चे उच्चाटन

By admin | Updated: January 5, 2015 00:40 IST

पन्हाळा तालुक्यात रॅली : निसर्गमित्र, राजाराम महाविद्यालयाचा उपक्रम

पोर्ले तर्फ ठाणे : निसर्गमित्र संघटना आणि राजाराम महाविद्यालयाच्या वतीने पन्हाळा पश्चिम भागात ‘निसर्गाकडे चला’ असा संदेश देत सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून ‘रानमोडी’ तणाचे श्रमदानातून उच्चाटन करण्यात आले. कोल्हापूर येथील शाहू मिल, मंगेशकरनगर, बेलबाग परिसरातील ‘रानमोडी’ तणाचे उच्चाटन करून रॅली सुरू झाली. रॅलीच्या दरम्यान येणाऱ्या गावातील शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, सार्वजनिक मंडळे, महिला बचत गट, शेतकरी, कष्टकरी यांच्यात ‘रानमोडी’ व पर्यावरण जागृतीविषयी कृतिशील प्रबोधन करण्यात आले. शेती आणि जंगलसंपदेवर अतिक्रमण करणाऱ्या तणांची माहिती देण्यात आली.पर्यावरणपूरक जीवनशैली आचरणात आणण्याच्या दृष्टिकोनातून पाण्याचे महत्त्व, कचऱ्याचे विघटन, प्लास्टिकचा गैरवापर, विजेचा वापर कमी, सौरऊर्जेचा वापर, आदींविषयी ग्रामस्थांना विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. तुकाराम महाराजांचा ‘पर्यावरणपूरक संदेश’ देणाऱ्या माहितीपटाद्वारे मार्गदर्शन केले. शाळेतील मुलांना ‘लाखमोलाची गोष्ट’, निसर्गखेळातून पर्यावरणाची जनजागृती, पथनाट्याद्वारे प्रात्यक्षिके करून राजाराम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रबोधन केले.रॅलीच्या दरम्यान निसर्गमित्र अनिल चौगुले, दिनकर चौगुले, ‘राजाराम’च्या प्रा. डॉ. अंजली पाटील, प्रा. शामराव कांबळे, प्रा. अजित आकोळकर यांनी मार्गदर्शन केले, तर प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन राजाराम महाविद्यालयातील ३० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ‘निसर्गाकडे चला’चा संदेश देत रानमोडी तणांची माहिती दिली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, ग्रामस्थ, सार्वजनिक तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)पर्यावरणाबाबत लोकांत सकारात्मक दृष्टिकोनाची कमतरता आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीला धोका निर्माण करणाऱ्या वस्तू नाकारण्याची मन:स्थिती तयार होऊ शकत नाही, तोपर्यंत पर्यावरण वाचू शकत नाही. लोकांनी पुनर्वापर आणि पुन:निर्मित वस्तूंचा वापर करायला हवा. तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीतील घटकांचे लेखापरीक्षण होणे काळाची गरज आहे. त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. - अनिल चौगुले, निसर्गमित्र.१८ गावांचा समावेशपन्हाळा तालुक्यातील आसुर्ले, पोर्ले तर्फ ठाणे, माजगाव, शिंदेवाडी, माळवाडी, देवठाणे, कसबा ठाणे, महाडिकवाडी, म्हाळुंगे, दिगवडे, तिरपण, कोतोली, पिंपळे, वाघवे, उत्रे, आदी गावांतून रॅलीने प्रबोधन केले.