शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत सात घरे आगीत खाक

By admin | Updated: November 12, 2015 00:24 IST

गुंडगेवाडीतील घटना : ४७ लाखांचे नुकसान; नऊ कुटुंबे उघड्यावर

वारणावती : गुंडगेवाडी (ता. शिराळा) येथे मंगळवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत सात घरे भस्मसात झाली. आगीत धान्य, प्रापंचिक साहित्य, रोख रक्कम, दागिने असे ४७ लाख चार हजारांचे नुकसान झाल्याने नऊ कुटुंबे उघड्यावर आली आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. ऐन दिवाळीत घडलेल्या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील गुंडगेवाडी गावाची लोकसंख्या केवळ चारशेंवर आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास आनंदा शंकर गुंडगे यांच्या घराला अचानक आग लागली. जोराच्या वाऱ्यामुळे आगीने क्षणातच रौद्ररूप धारण केले. त्यामुळे शेजारच्या सात घरांनीही पेट घेतला. सर्व प्रापंचिक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. येथील गणेश मित्रमंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी कूपनलिकेचे पाणी तसेच मातीचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दोन तासांनंतर इस्लामपूर नगरपालिका व विश्वास साखर (पान १ वरून)कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या. पहाटे पाचच्या सुमारास आग आटोक्यात आली. निवृत्ती सावंत, सर्जेराव, रवींद्र गुंडगे, रामचंद्र गुंडगे, लक्ष्मण गुंडगे, बाळू गुंडगे, सुरेश गुंडगे या युवकांसह करुंगली, काशीदवाडी, चिंचेवाडी, खराळे, भाष्टेवाडी, आरळा, मराठेवाडी येथील युवकांनी धाडसाने सात घरांतील व्यक्तींना, जनावरांना सुरक्षितस्थळी हलविले. त्यामुळे जीवित हानी टळली. शिवाय लागून असलेल्या घरांचे वासे तोडून संपर्क तोडण्यात आला. यामुळे शेजारची घरे आगीपासून वाचली. नुकसानग्रस्त कुटुंबे व नुकसानीची रक्कम : आनंदा शंकर गुंडगे (एक लाख रुपये), किसन बाळकू गुंडगे (आठ लाख ५0 हजार), रामचंद्र धनू गुंडगे (सात लाख ४५ हजार), शिवाजी तुकाराम गुंडगे (सात लाख ९५ हजार), मारुती तुकाराम गुंडगे (सात लाख ३२ हजार), शालन पांडुरंग गुंडगे (पाच लाख २२ हजार), मालन किसन गुंडगे (तीन लाख ३७ हजार), शालन विष्णू गुंडगे (चार लाख ७३ हजार), किसाबाई तातोबा गुंडगे (एक लाख ५0 हजार), असे एकूण ४७ लाख चार हजारांचे नुकसान झाले आहे. आगीत भस्मसात झालेल्या कुटुंबांपैक ी तीन कुटुंबप्रमुख या विधवा आहेत. त्यांना लहान मुले आहेत. त्यांचे आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. कोरडवाहू शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. आगीमुळे या महिलांवर संकट कोसळले आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी कोकरूडचे पोलीस, गावकामगार तलाठी, मंडल अधिकारी, सरपंच,आदींनी भेट देऊन पंचनामा केला. निराधार झालेल्या या कुटुंबांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनानेही या कुटुंबांना सावरण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)सत्यजित देशमुख यांची तत्परतागुंडगेवाडी येथील सात घरांना आग लागल्याची बातमी रात्री समजताच प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व ते आग विझविण्यामध्ये सहभागी झाले. आग आटोक्यात आल्यानंतर मध्यरात्री अडीचपर्यंत देशमुख घटनास्थळी तळ ठोकून होते. यावेळी जळीत कुटुंबांना ते आधार देत होते. त्यांना शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. वैयक्तिक स्वरूपात मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.