शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

‘अंकुश’चे पदाधिकारी आले आत्मदहनासाठी

By admin | Updated: May 1, 2015 00:17 IST

प्रशासनास जाग : जि. प. बैठकीत सकारात्मक चर्चा

कोल्हापूर : वैयक्तिक लाभ देत असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची शिफारस शासन नियमांप्रमाणे घेणे बंधनकारक नाही. तरीही शिफारस घेऊनच हितसंबंधितांना लाभ दिला जात आहे. हे त्वरित बंद करावे, यासह विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत ‘अंकुश’चे पदाधिकारी गुरुवारी दीडच्या सुमारास रॉकेलचे कॅन घेऊन जिल्हा परिषदेसमोर दाखल झाले. ही कुणकुण लागताच जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या दालनात त्वरित बैठक झाली. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे आत्मदहन आंदोलन स्थगित केले. वैयक्तिक लाभ देताना सदस्यांची शिफारस सक्तीची करणे बेकायदेशीर आहे. शिफारसींच्या माध्यमातून सदस्य बगलबच्च्यांची नावे घुसडतात. परिणामी, पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहतात. राजर्षी शाहू घरकुल योजनेंतर्गत जिल्हा परिषद सदस्य ज्यांना विहीत नमुन्यातील अर्ज देतात, त्यांनाच लाभ दिला जातो, हे पूर्णत: चुकीचे आहे. प्रशासनाने पारदर्शकपणे शासन नियमाप्रमाणे योजनेचा लाभ द्यावा. सदस्यांचा हस्तक्षेप टाळावा. बांधकाम विभागाकडून झालेल्या कामांच्या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या नावांचे लावलेले बेकायदेशीर फलक काढून टाकावेत, वारंवार पत्रव्यवहार करूनही समाज कल्याण विभागाने न दिलेले उत्तर मिळावे, जि. प.च्या मासिक बैठकीला बसण्यास परवानगी द्यावी, असे निवेदन यापूर्वी प्रशासनाकडे दिले होते. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे मागण्या २८ एप्रिलअखेर पूर्ण न केल्यास जि. प. इमारतीवरून उडी मारण्याचा इशारा दिला होता. सकाळी अकरापासूनच उडी मारल्यास त्यांना झेलण्यासाठी जाळी घेऊन पोलीस व अग्निशमन दलाचे जवान तैनात होते. दरम्यान, ‘अकुंश’च्या आशाराणी पाटील, अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते रॉकेलचे कॅन घेऊन जि. प.समोर आले. बंदोबस्त दिसताच अंतरावर दोन आंदोलक कॅन घेऊन थांबले. आशाराणी पाटील व अभिजित पाटील यांच्यासह शिष्टमंडळ बैठकीसाठी गेले. बैठकीत सकारात्मक चर्चा न झाल्यास आत्मदहन करावे, अशी सूचना दोन आंदोलकांना दिली. मात्र, सकारात्मक चर्चा झाल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. (प्रतिनिधी)१४ मे रोजी बैठकसर्व मागण्या पूर्ण करण्यासंबंधी १४ मे रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेतले आहे. बैठकीत सर्व मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आत्मदहन करणार असल्याचे आशाराणी पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.