शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

‘अंकुश’चे पदाधिकारी आले आत्मदहनासाठी

By admin | Updated: May 1, 2015 00:17 IST

प्रशासनास जाग : जि. प. बैठकीत सकारात्मक चर्चा

कोल्हापूर : वैयक्तिक लाभ देत असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची शिफारस शासन नियमांप्रमाणे घेणे बंधनकारक नाही. तरीही शिफारस घेऊनच हितसंबंधितांना लाभ दिला जात आहे. हे त्वरित बंद करावे, यासह विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत ‘अंकुश’चे पदाधिकारी गुरुवारी दीडच्या सुमारास रॉकेलचे कॅन घेऊन जिल्हा परिषदेसमोर दाखल झाले. ही कुणकुण लागताच जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या दालनात त्वरित बैठक झाली. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे आत्मदहन आंदोलन स्थगित केले. वैयक्तिक लाभ देताना सदस्यांची शिफारस सक्तीची करणे बेकायदेशीर आहे. शिफारसींच्या माध्यमातून सदस्य बगलबच्च्यांची नावे घुसडतात. परिणामी, पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहतात. राजर्षी शाहू घरकुल योजनेंतर्गत जिल्हा परिषद सदस्य ज्यांना विहीत नमुन्यातील अर्ज देतात, त्यांनाच लाभ दिला जातो, हे पूर्णत: चुकीचे आहे. प्रशासनाने पारदर्शकपणे शासन नियमाप्रमाणे योजनेचा लाभ द्यावा. सदस्यांचा हस्तक्षेप टाळावा. बांधकाम विभागाकडून झालेल्या कामांच्या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या नावांचे लावलेले बेकायदेशीर फलक काढून टाकावेत, वारंवार पत्रव्यवहार करूनही समाज कल्याण विभागाने न दिलेले उत्तर मिळावे, जि. प.च्या मासिक बैठकीला बसण्यास परवानगी द्यावी, असे निवेदन यापूर्वी प्रशासनाकडे दिले होते. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे मागण्या २८ एप्रिलअखेर पूर्ण न केल्यास जि. प. इमारतीवरून उडी मारण्याचा इशारा दिला होता. सकाळी अकरापासूनच उडी मारल्यास त्यांना झेलण्यासाठी जाळी घेऊन पोलीस व अग्निशमन दलाचे जवान तैनात होते. दरम्यान, ‘अकुंश’च्या आशाराणी पाटील, अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते रॉकेलचे कॅन घेऊन जि. प.समोर आले. बंदोबस्त दिसताच अंतरावर दोन आंदोलक कॅन घेऊन थांबले. आशाराणी पाटील व अभिजित पाटील यांच्यासह शिष्टमंडळ बैठकीसाठी गेले. बैठकीत सकारात्मक चर्चा न झाल्यास आत्मदहन करावे, अशी सूचना दोन आंदोलकांना दिली. मात्र, सकारात्मक चर्चा झाल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. (प्रतिनिधी)१४ मे रोजी बैठकसर्व मागण्या पूर्ण करण्यासंबंधी १४ मे रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेतले आहे. बैठकीत सर्व मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आत्मदहन करणार असल्याचे आशाराणी पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.