शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘अंकुश’चे पदाधिकारी आले आत्मदहनासाठी

By admin | Updated: May 1, 2015 00:17 IST

प्रशासनास जाग : जि. प. बैठकीत सकारात्मक चर्चा

कोल्हापूर : वैयक्तिक लाभ देत असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची शिफारस शासन नियमांप्रमाणे घेणे बंधनकारक नाही. तरीही शिफारस घेऊनच हितसंबंधितांना लाभ दिला जात आहे. हे त्वरित बंद करावे, यासह विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत ‘अंकुश’चे पदाधिकारी गुरुवारी दीडच्या सुमारास रॉकेलचे कॅन घेऊन जिल्हा परिषदेसमोर दाखल झाले. ही कुणकुण लागताच जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या दालनात त्वरित बैठक झाली. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे आत्मदहन आंदोलन स्थगित केले. वैयक्तिक लाभ देताना सदस्यांची शिफारस सक्तीची करणे बेकायदेशीर आहे. शिफारसींच्या माध्यमातून सदस्य बगलबच्च्यांची नावे घुसडतात. परिणामी, पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहतात. राजर्षी शाहू घरकुल योजनेंतर्गत जिल्हा परिषद सदस्य ज्यांना विहीत नमुन्यातील अर्ज देतात, त्यांनाच लाभ दिला जातो, हे पूर्णत: चुकीचे आहे. प्रशासनाने पारदर्शकपणे शासन नियमाप्रमाणे योजनेचा लाभ द्यावा. सदस्यांचा हस्तक्षेप टाळावा. बांधकाम विभागाकडून झालेल्या कामांच्या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या नावांचे लावलेले बेकायदेशीर फलक काढून टाकावेत, वारंवार पत्रव्यवहार करूनही समाज कल्याण विभागाने न दिलेले उत्तर मिळावे, जि. प.च्या मासिक बैठकीला बसण्यास परवानगी द्यावी, असे निवेदन यापूर्वी प्रशासनाकडे दिले होते. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे मागण्या २८ एप्रिलअखेर पूर्ण न केल्यास जि. प. इमारतीवरून उडी मारण्याचा इशारा दिला होता. सकाळी अकरापासूनच उडी मारल्यास त्यांना झेलण्यासाठी जाळी घेऊन पोलीस व अग्निशमन दलाचे जवान तैनात होते. दरम्यान, ‘अकुंश’च्या आशाराणी पाटील, अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते रॉकेलचे कॅन घेऊन जि. प.समोर आले. बंदोबस्त दिसताच अंतरावर दोन आंदोलक कॅन घेऊन थांबले. आशाराणी पाटील व अभिजित पाटील यांच्यासह शिष्टमंडळ बैठकीसाठी गेले. बैठकीत सकारात्मक चर्चा न झाल्यास आत्मदहन करावे, अशी सूचना दोन आंदोलकांना दिली. मात्र, सकारात्मक चर्चा झाल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. (प्रतिनिधी)१४ मे रोजी बैठकसर्व मागण्या पूर्ण करण्यासंबंधी १४ मे रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेतले आहे. बैठकीत सर्व मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आत्मदहन करणार असल्याचे आशाराणी पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.