शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

साखर कारखान्यांसमोर ‘अंकुश’ आंदोलन

By admin | Updated: February 28, 2017 00:28 IST

५०० रुपयांची बाकी : शेतकऱ्यांना हक्काची रक्कम देण्याची आंदोलन अंकुशची मागणी

शिरोळ : चालू गळीत हंगामात तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना मिळावा, या मागणीसाठी आंदोलन अंकुशच्या वतीने सोमवारी शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील दत्त, गुरुदत्त, जवाहर व पंचगंगा साखर कारखान्यांसमोर एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली दत्त, गुरुदत्त, जवाहर व पंचगंगा साखर कारखान्यांसमोर सोमवारी सकाळी दहा वाजता आंदोलनास प्रारंभ केला. बाजारात साखरेला उच्चांकी प्रतिटन ३७०० ते ३९०० रुपये दर मिळू लागला आहे. शासनाने १६ फेबु्रवारी २०१६ रोजी अधिसूचना काढून उसाचा दर कसा ठरवावा, याचे मापदंड घालून दिले आहेत. त्यानुसार कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अद्याप प्रतिटन किमान ४५० ते ५०० रुपये येणे बाकी आहे, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. यापूर्वीही लेखी मागणी करून दुसरा हप्ता देण्याची मागणी केली होती. शिरोळ येथे आंदोलनात सुरेश भोसले, अवधूत काळे, अविनाश पाटील, बाळासाहेब सोमण, रघुनाथ पाटील, सुधाकर उदगावे, रामचंद्र सुतार, संजय मोडके, मारुती नंदिवाले कार्यकर्ते सहभागी झाले होते. गंगानगर येथील पंचगंगा साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर धनाजी चुडमुंगे, कृष्णात गोटे, अवधूत काळे व राकेश जगदाळे यांनी धरणे आंदोलन केले. (प्रतिनिधी)२० दिवसांची मुदतउसाला दर कमी आणि साखर विक्रीतून कारखान्यांना जादा पैसे मिळाले असून, या पैशावर शेतकऱ्यांचा हक्क आहे. यासाठी आंदोलन अंकुशने आंदोलन केले. मागण्यांबाबत येत्या २० दिवसांत निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धनाजी चुडमुंगे यांनी दिली.