शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

...अन् त्यांची दिवाळी झाली तेजोमय

By admin | Updated: October 24, 2014 00:17 IST

मातोश्री वृद्धाश्रम : सामाजिक संस्था, व्यक्तींकडून दिवाळीसाठी पाठबळ

एम. ए. पठाण -कोल्हापूर -किमान दिवाळी सणाच्या निमित्ताने तरी नातेवाईक आपल्याला भेटायला येतील, घरी घेऊन जातील, या आशेने त्यांच्या प्रतीक्षेतील थकलेले शरीर आणि थिजलेल्या डोळ्यांची निराशा झाली. मात्र, निराधारांना लाखमोलाचा आधार देणाऱ्या पाटोळे कुटुंबीय, सामाजिक संस्था आणि व्यक्तींच्या अखंड प्रेमाने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. ‘मातोश्री’ वृद्धाश्रमात दिवाळी तेजोमय होत आहे.पाचगाव येथील आर. के. नगरमधील मातोश्री वृद्धाश्रमात दिवाळीची धामधूम सुरू आहे. येथील आजी-आजोबांना नाही म्हटले तर ओढ असते आपल्या जिवाभावाच्या नातलगांची; पण काल, बुधवारी दिवाळी असूनही कोणाचेही नातेवाईक त्यांच्याकडे फिरकले नाहीत. अशा व्यथित आजी-आजोबांसाठी पाटोळे कुटुंबीयांनी दिवाळीचे नेटके नियोजन केले. दिवाळीदिवशी पहाटे अभ्यंगस्नान, त्यानंतर त्यांना संस्थेतर्फे कपडे देण्यात आली, तर सकाळी सामूहिक फराळाचा कार्यक्रम झाला. दिवाळीदिवशी या आजी-आजोबांच्या मनात नातेवाइकांना न भेटण्याची खंत असली तरी येथील वातावरणातून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बरच काही सांगून गेला. येथे एकूण १३० आजी, आजोबांची सुश्रुषा केली जाते. काल वसंतराव चौगुले हायस्कूलतर्फे फराळाचे साहित्य, उद्योगपती अजित जाधव, शासकीय रुग्णालयातील एक्स-रे विभाग यांच्या हस्ते फराळ, मिठाई वाटप झाली. सायंकाळी कबीर शेख यांच्या हिंदी, मराठी गीतांचा कार्यक्रम झाला. त्यास येथील आजोबा-आजींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज, गुरुवारी लक्ष्मी पूजनादिवशी सायंकाळी अरुंधती महाडिक यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली. तसेच लक्ष्मी पूजन झाल्यानंतर आजी-आजोबा आतषबाजीत सहभागी झाले अन् मातोश्री आश्रमातील माहौलच पालटून गेला. यासाठी संस्थेचे संस्थापक शिवाजी पाटोळे, अ‍ॅड. शरद पाटोळे, लीला पाटोळे, राणी पाटोळे, रोहन पाटोळे व पूर्ण पाटोळे कुटुंबीय यासाठी राबत असते. तसेच सध्या ‘मातोश्री’मध्ये सामाजिक भान ठेवून काही संस्था, व्यक्ती उत्स्फूर्त मदत करत आहेत.आपल्या अडचणीमुळे काही कुटुंबीय आपल्या वृद्ध आई, वडील अथवा नातेवाइकांना मातोश्री वृद्धाश्रमात सोडून जातात. या वृद्धांचा कुटुंबांप्रमाणे येथे सांभाळ केला जात आहे; पण दिवाळीसारख्या सणादिवशी आपल्या वृद्ध आजी, आजोबांना भेटायला येथे येणे किंवा दिवाळीसाठी दोन दिवस घरी घेऊन जाणे हे घडत नसल्याची खंत वाटते. अशी मानसिकता बदलण्याची गरज आहे. -अ‍ॅड. शरद पाटोळे