शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

...अन् त्यांची दिवाळी झाली तेजोमय

By admin | Updated: October 24, 2014 00:17 IST

मातोश्री वृद्धाश्रम : सामाजिक संस्था, व्यक्तींकडून दिवाळीसाठी पाठबळ

एम. ए. पठाण -कोल्हापूर -किमान दिवाळी सणाच्या निमित्ताने तरी नातेवाईक आपल्याला भेटायला येतील, घरी घेऊन जातील, या आशेने त्यांच्या प्रतीक्षेतील थकलेले शरीर आणि थिजलेल्या डोळ्यांची निराशा झाली. मात्र, निराधारांना लाखमोलाचा आधार देणाऱ्या पाटोळे कुटुंबीय, सामाजिक संस्था आणि व्यक्तींच्या अखंड प्रेमाने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. ‘मातोश्री’ वृद्धाश्रमात दिवाळी तेजोमय होत आहे.पाचगाव येथील आर. के. नगरमधील मातोश्री वृद्धाश्रमात दिवाळीची धामधूम सुरू आहे. येथील आजी-आजोबांना नाही म्हटले तर ओढ असते आपल्या जिवाभावाच्या नातलगांची; पण काल, बुधवारी दिवाळी असूनही कोणाचेही नातेवाईक त्यांच्याकडे फिरकले नाहीत. अशा व्यथित आजी-आजोबांसाठी पाटोळे कुटुंबीयांनी दिवाळीचे नेटके नियोजन केले. दिवाळीदिवशी पहाटे अभ्यंगस्नान, त्यानंतर त्यांना संस्थेतर्फे कपडे देण्यात आली, तर सकाळी सामूहिक फराळाचा कार्यक्रम झाला. दिवाळीदिवशी या आजी-आजोबांच्या मनात नातेवाइकांना न भेटण्याची खंत असली तरी येथील वातावरणातून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बरच काही सांगून गेला. येथे एकूण १३० आजी, आजोबांची सुश्रुषा केली जाते. काल वसंतराव चौगुले हायस्कूलतर्फे फराळाचे साहित्य, उद्योगपती अजित जाधव, शासकीय रुग्णालयातील एक्स-रे विभाग यांच्या हस्ते फराळ, मिठाई वाटप झाली. सायंकाळी कबीर शेख यांच्या हिंदी, मराठी गीतांचा कार्यक्रम झाला. त्यास येथील आजोबा-आजींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज, गुरुवारी लक्ष्मी पूजनादिवशी सायंकाळी अरुंधती महाडिक यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली. तसेच लक्ष्मी पूजन झाल्यानंतर आजी-आजोबा आतषबाजीत सहभागी झाले अन् मातोश्री आश्रमातील माहौलच पालटून गेला. यासाठी संस्थेचे संस्थापक शिवाजी पाटोळे, अ‍ॅड. शरद पाटोळे, लीला पाटोळे, राणी पाटोळे, रोहन पाटोळे व पूर्ण पाटोळे कुटुंबीय यासाठी राबत असते. तसेच सध्या ‘मातोश्री’मध्ये सामाजिक भान ठेवून काही संस्था, व्यक्ती उत्स्फूर्त मदत करत आहेत.आपल्या अडचणीमुळे काही कुटुंबीय आपल्या वृद्ध आई, वडील अथवा नातेवाइकांना मातोश्री वृद्धाश्रमात सोडून जातात. या वृद्धांचा कुटुंबांप्रमाणे येथे सांभाळ केला जात आहे; पण दिवाळीसारख्या सणादिवशी आपल्या वृद्ध आजी, आजोबांना भेटायला येथे येणे किंवा दिवाळीसाठी दोन दिवस घरी घेऊन जाणे हे घडत नसल्याची खंत वाटते. अशी मानसिकता बदलण्याची गरज आहे. -अ‍ॅड. शरद पाटोळे