शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

मानांकनाची ‘खुशी’, निधीचा ‘गम’

By admin | Updated: December 16, 2014 23:59 IST

मंत्रालयात हेलपाटे, मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊनदेखील निधी पदरात पडला नाही. त्यातच ‘नॅक’चे ‘अ’ मानांकन मिळाल्याने शेवट गोड झाला.

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीची धावपळ, ‘नॅक’ची तयारी, दूरशिक्षण केंद्राच्या परीक्षांतील गोंधळ, विद्यार्थी-प्राध्यापक संघटनांची आंदोलने झेलत, सुवर्णमहोत्सवी निधीच्या प्रतीक्षेत शिवाजी विद्यापीठ राहिले. मात्र, राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेचे (नॅक) ‘अ’ मानांकन मिळाल्याने वर्षाचा शेवट विद्यापीठासाठी गोड ठरला.विद्यापीठास अनुदान आयोगाकडून ४६ लाख २० हजारांचे अनुदान मंजूर झाल्याने मनुष्यबळ, स्वयंअध्ययन साहित्य निर्मितीसाठी दूरशिक्षण केंद्राला बळ मिळाले. पन्हाळगडावरील अवकाश संशोधन केंद्राच्या भूमिपूजनाने विद्यापीठाच्या नव्या विद्याशाखेची सुरुवात झाली. गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेली शिक्षकांची २२ आणि शिक्षकेतर ५५ पदांची भरती केल्याने शैक्षणिक आणि प्रशासकीय गुणवत्तेला ‘बुस्ट’ मिळाले. राज्य शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाशी विद्यापीठाने सामंजस्य करार केला. दोन ते तीन महिने चालणाऱ्या परीक्षांचा कालावधी ६० दिवसांवर आणून परीक्षा विभागाने वेळ आणि पैशांची बचत करणारे पाऊल टाकले. ग्रीन आॅडिट, वॉटर आॅडिट आणि ‘नो व्हेईकल डे’, क्रांतिवनाच्या अद्यावतीकरणातून विद्यापीठाने पर्यावरण संरक्षणाच्यादृष्टीने प्रयत्न केले. जैवतंत्रज्ञान विभागाने देशातील ‘टॉप टेन’मध्ये स्थान पटकावत विद्यापीठाचा नावलौकीक राष्ट्रीय पातळीवर पोहोचविला. प्रवेशपत्र, प्रश्नपत्रिका आणि परीक्षांबाबतचा दूरशिक्षण केंद्राचा गोंधळ यावर्षी देखील कायम राहिला. विद्यार्थी कल्याण मंडळाची निवडणूक, ग्रंथालयातील असुविधांबाबत विद्यार्थी संघटनांचा, तर शासनदरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत प्राध्यापक, शिक्षकेतर संघटनांचा आंदोलनांद्वारे आवाज घुमला. राज्य शासनाकडून जाहीर झालेल्या सुवर्णमहोत्सवी निधी मिळण्याची आणि तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या उपकेंद्राची स्थापनेची प्रतीक्षाच करावी लागली. मंत्रालयात हेलपाटे, मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊनदेखील निधी पदरात पडला नाही. त्यातच ‘नॅक’चे ‘अ’ मानांकन मिळाल्याने शेवट गोड झाला.समायोजनावरून वादळअतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रश्नावरून संघटनांच्या आंदोलनावरून वादळ उठले. बालकांचे मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीमुळे प्राथमिक-माध्यमिक शिक्षणाचा ढाचा बदलला. त्यातील तरतुदींप्रमाणे कार्यवाही करताना शासन आणि शिक्षक, संस्थाचालकांमध्ये संघर्ष निर्माण झाला. महाविद्यालये सुधारली...पायाभूत सुविधा, विद्यापीठाशी संलग्नता, अभ्यासक्रम अशा विविध मुद्द्यांवर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २०७ महाविद्यालयांची विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाने तपासणी केली. महाविद्यालयांची स्थापना, विद्यार्थी, प्राध्यापक, आदी स्वरूपांतील अद्ययावत ‘डाटा’ पहिल्यांदाच या कार्यालयाने तयार केला.