शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
3
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
4
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
5
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
6
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
7
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
8
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
9
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
10
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
11
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
12
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
13
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
14
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
15
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
16
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
17
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
18
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
19
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
20
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
Daily Top 2Weekly Top 5

अंगडिया व्यावसायिकांना सराफ बंदचा फटका

By admin | Updated: March 4, 2016 01:03 IST

व्यवसाय कोलमडला : शहरातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान

तानाजी पोवार -- कोल्हापूर  शहरातील सराफ व्यवसाय गेले दोन दिवस बंद आहे. या सराफ व्यावसायिकांवर अवलंबून असणाऱ्या शहरातील अंगडिया कुरिअर सर्व्हिसला गेल्या दोन दिवसांत सुमारे ६५ लाखांचा फटका बसला आहे. सराफ व्यवसाय बंद राहिल्याने पर्यायाने अंगडिया सर्व्हिसही पूर्णत: कोलमडली असल्याने बुधवारी काही प्रमाणात सुरू असलेली ही सेवा गुरुवारी बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. याशिवाय जिल्ह्यातील गांधीनगर, इचलकरंजी या ठिकाणीही ही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय या व्यावसायिकांनी घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात किमान एक कोटी रुपयांचा फटका बसल्याची माहिती अंगडिया व्यावसायिकांनी दिली.केंद्रीय अबकारी कराच्या निषेधार्थ देशभर सराफ व्यावसायिकांनी तीन दिवसांचा बंद पुकारला आहे. त्यामुळे कोल्हापुरातही गेले दोन दिवस सराफ बाजारपेठ बंद स्थितीत आहे. अंगडिया कुरिअर सर्व्हिस पूर्णत: कोलमडली आहे. बुधवार (दि. २) पासून सराफ व्यावसायिकांनी हा बंद पुकारला असला तरी त्या दिवशी सायंकाळी ही सेवा काही प्रमाणात सुरू होती, पण गुरुवारी ही सेवा बंद झाली. दररोज मुंबईला माल रवानाकोल्हापुरातून मुंबई बाजारपेठेत दररोज रात्री नऊ वाजता पार्सल पाठविली जातात. कोल्हापुरातून ११ अंगडिया व्यावसायिकांपैकी किमान सहाजणांचे स्वतंत्र टेम्पो अथवा सुमो या चारचाकी वाहनाने माल पाठविला जातो. इतर व्यावसायिकांचे कर्मचारी कमी माल असल्यास दररोज खासगी बसेस अथवा एस. टी. महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करून मुंबईपर्यंत माल पोहोचवितात. गुजरात व इतर ठिकाणी जाणारा माल मुंबईत गेल्यानंतर तेथून वेगवेगळ्या ठिकाणी पाठविला जातो.विश्वास महत्त्वाचाकोल्हापूर शहराच्या सराफ बाजारपेठेतून दररोज किमान ३५ ते ४० लाखांची उलाढाल या अंगडिया व्यावसायिकांमार्फत होते. संपूर्ण व्यवसाय हा विश्वासावरच अवलंबून असल्याने अनेक सराफ व्यावसायिकांचे अंगडिया व्यावसायिकांशी अनेक वर्षांपासूनचे संबंध जुळले आहेत. त्यामुळे प्रत्येक सराफ व्यावसायिक आपला माल पाठविताना ठरावीकच अंगडिया कुरिअर सर्व्हिसकडेच माल देत असतो. यामध्ये विश्वासाचा दुवा महत्त्वाचा मानला जातो.बहुतांश व्यावसायिक परप्रांतीयकोल्हापूर शहरातील सराफ बाजारपेठेत अंगडिया सर्व्हिसमध्ये फक्त एकच महाराष्ट्रीय असून बाकी सर्व व्यावसायिक हे परप्रांतीय आहेत. तरीही या अंगडिया व्यावसायिकांवर सराफ व्यावसायिकांचा विश्वास जडला आहे, पण अनेक वेळा यातून धोकाही निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.मालाचे दरसराफ बाजारपेठेतून दागिने पाठविताना चांदीचा दर हा किलोवर, तर सोन्याचा दर हा किमतीवर आकारला जातो. चांदीच्या एक किलोच्या दागिन्यावर १०० रुपये, तर सोन्याच्या एक लाखाच्या दागिन्यावर १५० ते २०० रुपयांपर्यंत दर आकारला जातो.