शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

अंगडिया व्यावसायिकांना सराफ बंदचा फटका

By admin | Updated: March 4, 2016 01:03 IST

व्यवसाय कोलमडला : शहरातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान

तानाजी पोवार -- कोल्हापूर  शहरातील सराफ व्यवसाय गेले दोन दिवस बंद आहे. या सराफ व्यावसायिकांवर अवलंबून असणाऱ्या शहरातील अंगडिया कुरिअर सर्व्हिसला गेल्या दोन दिवसांत सुमारे ६५ लाखांचा फटका बसला आहे. सराफ व्यवसाय बंद राहिल्याने पर्यायाने अंगडिया सर्व्हिसही पूर्णत: कोलमडली असल्याने बुधवारी काही प्रमाणात सुरू असलेली ही सेवा गुरुवारी बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. याशिवाय जिल्ह्यातील गांधीनगर, इचलकरंजी या ठिकाणीही ही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय या व्यावसायिकांनी घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात किमान एक कोटी रुपयांचा फटका बसल्याची माहिती अंगडिया व्यावसायिकांनी दिली.केंद्रीय अबकारी कराच्या निषेधार्थ देशभर सराफ व्यावसायिकांनी तीन दिवसांचा बंद पुकारला आहे. त्यामुळे कोल्हापुरातही गेले दोन दिवस सराफ बाजारपेठ बंद स्थितीत आहे. अंगडिया कुरिअर सर्व्हिस पूर्णत: कोलमडली आहे. बुधवार (दि. २) पासून सराफ व्यावसायिकांनी हा बंद पुकारला असला तरी त्या दिवशी सायंकाळी ही सेवा काही प्रमाणात सुरू होती, पण गुरुवारी ही सेवा बंद झाली. दररोज मुंबईला माल रवानाकोल्हापुरातून मुंबई बाजारपेठेत दररोज रात्री नऊ वाजता पार्सल पाठविली जातात. कोल्हापुरातून ११ अंगडिया व्यावसायिकांपैकी किमान सहाजणांचे स्वतंत्र टेम्पो अथवा सुमो या चारचाकी वाहनाने माल पाठविला जातो. इतर व्यावसायिकांचे कर्मचारी कमी माल असल्यास दररोज खासगी बसेस अथवा एस. टी. महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करून मुंबईपर्यंत माल पोहोचवितात. गुजरात व इतर ठिकाणी जाणारा माल मुंबईत गेल्यानंतर तेथून वेगवेगळ्या ठिकाणी पाठविला जातो.विश्वास महत्त्वाचाकोल्हापूर शहराच्या सराफ बाजारपेठेतून दररोज किमान ३५ ते ४० लाखांची उलाढाल या अंगडिया व्यावसायिकांमार्फत होते. संपूर्ण व्यवसाय हा विश्वासावरच अवलंबून असल्याने अनेक सराफ व्यावसायिकांचे अंगडिया व्यावसायिकांशी अनेक वर्षांपासूनचे संबंध जुळले आहेत. त्यामुळे प्रत्येक सराफ व्यावसायिक आपला माल पाठविताना ठरावीकच अंगडिया कुरिअर सर्व्हिसकडेच माल देत असतो. यामध्ये विश्वासाचा दुवा महत्त्वाचा मानला जातो.बहुतांश व्यावसायिक परप्रांतीयकोल्हापूर शहरातील सराफ बाजारपेठेत अंगडिया सर्व्हिसमध्ये फक्त एकच महाराष्ट्रीय असून बाकी सर्व व्यावसायिक हे परप्रांतीय आहेत. तरीही या अंगडिया व्यावसायिकांवर सराफ व्यावसायिकांचा विश्वास जडला आहे, पण अनेक वेळा यातून धोकाही निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.मालाचे दरसराफ बाजारपेठेतून दागिने पाठविताना चांदीचा दर हा किलोवर, तर सोन्याचा दर हा किमतीवर आकारला जातो. चांदीच्या एक किलोच्या दागिन्यावर १०० रुपये, तर सोन्याच्या एक लाखाच्या दागिन्यावर १५० ते २०० रुपयांपर्यंत दर आकारला जातो.