शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

पूरग्रस्तांना दिलेली सवलतीची रक्कम पुन्हा थकबाकीत,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:16 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला २०१९ मधील महापुरामुळे फटका बसला होता, त्यावेळी ज्यांच्या मिळकतींचे नुकसान झाले, अशा मिळकतधारकांना महापालिकेने घरफाळ्यात ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला २०१९ मधील महापुरामुळे फटका बसला होता, त्यावेळी ज्यांच्या मिळकतींचे नुकसान झाले, अशा मिळकतधारकांना महापालिकेने घरफाळ्यात पन्नास टक्के सवलत दिली. सवलतीनुसार अनेकांनी घरफाळा भरला खरा, पण संगणकीय प्रणालीमध्ये योग्य वेळी बदल केले गेले नसल्यामुळे सवलतीची पन्नास टक्के रक्कम चालूवर्षीच्या घरफाळ्यात थकबाकी म्हणून आल्याने पूरग्रस्त चक्रावून गेले आहेत.

कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने पूरग्रस्त मिळकतधारकांना त्यांच्या वार्षिक घरफाळ्यात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात करण्याचे ठरले. तसा ठराव झाला. परंतु घरफाळा विभागाकडून योग्य वेळेत ठरावाची माहिती लिखित स्वरूपात गेली नाही. त्यामुळे पूरग्रस्त अस्वस्थ बनले. पालिका अधिकाऱ्यांकडे विचारपूस होताच, तात्पुरता पर्याय म्हणून एक मार्ग काढण्यात आला. ज्यांच्याकडे पंचनाम्याचे दाखले आहेत, त्यांनी ते दाखवावेत असे सांगण्यात आले. त्यानुसार दाखला दाखवून सुमारे ८०० हून अधिक मिळकत धारकांपैकी कोणी पन्नास टक्के, तर कोणी शंभर टक्के घरफाळा भरला.

यावर्षीच्या एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू झाले. यावेळी तरी घरफाळा विभागाकडून संगणक विभागाला माहिती दिली जाईल, असे अपेक्षित होते. परंतु कोणतीच माहिती दिली गेली नाही. त्यामुळे संगणक प्रणालीमध्ये काहीच बदल झाले नाहीत. जेव्हा नागरिक घरफाळा भरायला गेले, तेव्हा त्यांच्या बिलात गतवर्षीची पन्नास टक्के रक्कम थकबाकी म्हणून दाखविली गेल्याचे निदर्शनास आले. नियमानुसार घरफाळा भरून देखील थकबाकी कशी आली, याची चौकशी केली, तर त्यांना मागच्या सवलतीची रक्कम थकबाकीत दाखविली गेल्याचे सांगण्यात आले.

यावर्षी अनेक मिळकतधारक सहा टक्क्यांची सवलत घेण्यास पुढे येत आहेत. त्यामध्ये पूरग्रस्तांचाही समावेश आहे. मागची सवलतीची थकबाकी कमी केल्याशिवाय त्यांना यंदाची बिले भरता येत नाहीत, शिवाय प्रशासनाकडून ही थकबाकी कमी करण्यास विलंब होत असल्याने सहा टक्क्यांची सवलत मिळणे आता दुरापास्त होण्याची शक्यता आहे. वास्तविक प्रामाणिक मिळकत धारकांना असे ताटकळत ठेवणे अपेक्षित नाही. परंतु प्रशासनही गतीने हलताना दिसत नाही.

दोन-चार दिवसात बदल होतील

घरफाळा विभागाकडे माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. याद्या तयार केल्या जात आहेत. बिलांमधील बदल दोन-चार दिवसात होईल. त्यानंतर पूरग्रस्तांना दुरुस्त केलेला घरफाळा भरता येणार आहे.

- यशपालसिंग रजपूत, सिस्टिम मॅनेजर.