शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

पूरग्रस्तांना दिलेली सवलतीची रक्कम पुन्हा थकबाकीत,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:16 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला २०१९ मधील महापुरामुळे फटका बसला होता, त्यावेळी ज्यांच्या मिळकतींचे नुकसान झाले, अशा मिळकतधारकांना महापालिकेने घरफाळ्यात ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला २०१९ मधील महापुरामुळे फटका बसला होता, त्यावेळी ज्यांच्या मिळकतींचे नुकसान झाले, अशा मिळकतधारकांना महापालिकेने घरफाळ्यात पन्नास टक्के सवलत दिली. सवलतीनुसार अनेकांनी घरफाळा भरला खरा, पण संगणकीय प्रणालीमध्ये योग्य वेळी बदल केले गेले नसल्यामुळे सवलतीची पन्नास टक्के रक्कम चालूवर्षीच्या घरफाळ्यात थकबाकी म्हणून आल्याने पूरग्रस्त चक्रावून गेले आहेत.

कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने पूरग्रस्त मिळकतधारकांना त्यांच्या वार्षिक घरफाळ्यात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात करण्याचे ठरले. तसा ठराव झाला. परंतु घरफाळा विभागाकडून योग्य वेळेत ठरावाची माहिती लिखित स्वरूपात गेली नाही. त्यामुळे पूरग्रस्त अस्वस्थ बनले. पालिका अधिकाऱ्यांकडे विचारपूस होताच, तात्पुरता पर्याय म्हणून एक मार्ग काढण्यात आला. ज्यांच्याकडे पंचनाम्याचे दाखले आहेत, त्यांनी ते दाखवावेत असे सांगण्यात आले. त्यानुसार दाखला दाखवून सुमारे ८०० हून अधिक मिळकत धारकांपैकी कोणी पन्नास टक्के, तर कोणी शंभर टक्के घरफाळा भरला.

यावर्षीच्या एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू झाले. यावेळी तरी घरफाळा विभागाकडून संगणक विभागाला माहिती दिली जाईल, असे अपेक्षित होते. परंतु कोणतीच माहिती दिली गेली नाही. त्यामुळे संगणक प्रणालीमध्ये काहीच बदल झाले नाहीत. जेव्हा नागरिक घरफाळा भरायला गेले, तेव्हा त्यांच्या बिलात गतवर्षीची पन्नास टक्के रक्कम थकबाकी म्हणून दाखविली गेल्याचे निदर्शनास आले. नियमानुसार घरफाळा भरून देखील थकबाकी कशी आली, याची चौकशी केली, तर त्यांना मागच्या सवलतीची रक्कम थकबाकीत दाखविली गेल्याचे सांगण्यात आले.

यावर्षी अनेक मिळकतधारक सहा टक्क्यांची सवलत घेण्यास पुढे येत आहेत. त्यामध्ये पूरग्रस्तांचाही समावेश आहे. मागची सवलतीची थकबाकी कमी केल्याशिवाय त्यांना यंदाची बिले भरता येत नाहीत, शिवाय प्रशासनाकडून ही थकबाकी कमी करण्यास विलंब होत असल्याने सहा टक्क्यांची सवलत मिळणे आता दुरापास्त होण्याची शक्यता आहे. वास्तविक प्रामाणिक मिळकत धारकांना असे ताटकळत ठेवणे अपेक्षित नाही. परंतु प्रशासनही गतीने हलताना दिसत नाही.

दोन-चार दिवसात बदल होतील

घरफाळा विभागाकडे माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. याद्या तयार केल्या जात आहेत. बिलांमधील बदल दोन-चार दिवसात होईल. त्यानंतर पूरग्रस्तांना दुरुस्त केलेला घरफाळा भरता येणार आहे.

- यशपालसिंग रजपूत, सिस्टिम मॅनेजर.