शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सीमा भागातील अमोल अखेर महाराष्ट्राच्या सेवेत रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:16 IST

: कृती समितीच्या पाठपुराव्याला यश लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी : दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेले सीमा ...

: कृती समितीच्या पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्क

निपाणी : दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेले सीमा भागातील उमेदवार अमोल चव्हाण यांना अखेर महाराष्ट्र सरकारने नियुक्तीपत्र दिले आहे. महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गात गणले जात असल्याने उत्तीर्ण होऊनही अमोल चव्हाण यांची नियुक्ती लांबणीवर पडली होती. पण सीमा भागात कार्यरत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थी नोकरदार कृती समितीच्या पाठपुराव्यामुळे यश आले आहे. शिरगुप्पी येथील अमोल चव्हाण यांची महाराष्ट्रात सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या राज्याबाहेरील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गात गणले जाते. सीमा भागातील अमोल चव्हाण (रा. शिरगुप्पी ) यानी आयोगाची परीक्षा दिल्यानंतर तो उत्तीर्ण झाला होता. पण मागासवर्गीय असूनदेखील त्याची गणना खुल्या प्रवर्गात झाल्याने त्याचा परिणाम निवडीवर झाला. सरकारच्या अध्यादेशामुळे सीमा भागातील ८६५ गावांच्या विद्यार्थी व नोकरदार यांच्यावर अन्याय होत आहे. महाराष्ट्राने दावा सांगितलेल्या सीमा भागातील ८६५ गावांतील लोकांना महाराष्ट्रातील लोकांप्रमाणेच गणले जावे व सेवा शर्तीच्या अटी लागू कराव्यात,या मागणीसाठी प्रा. डॉ. अच्युत माने यांच्या नेतृत्वाखाली मागासवर्गीय विद्यार्थी नोकरदार कृती समितीची स्थापना केली आहे. या समितीने वारंवार महाराष्ट्रातील मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांच्या भेटी घेऊन याबाबत चर्चा केली आहे.

अमोल चव्हाण यांची निवड लांबली असल्याचे लक्षात आल्यानंतर कृती समितीने यासाठी पाठपुरावा केला होता. प्रा. डॉक्टर अच्युत माने, प्रा. शरद कांबळे, सुनील शेवाळे, अनिल मसाळे, प्रमोद कांबळे, भुदरगडचे आमदार प्रकाश आबिडकर, मंत्री हसन मुश्रीफ, सीमा समन्वयक मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. याची दखल म्हणूनच अमोल चव्हाण यांची अखेर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. त्याच्या निवडीने अन्य सीमाभागातील विद्यार्थ्यांना ही न्याय मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.