शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

सीमा भागातील अमोल अखेर महाराष्ट्राच्या सेवेत रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:16 IST

: कृती समितीच्या पाठपुराव्याला यश लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी : दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेले सीमा ...

: कृती समितीच्या पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्क

निपाणी : दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेले सीमा भागातील उमेदवार अमोल चव्हाण यांना अखेर महाराष्ट्र सरकारने नियुक्तीपत्र दिले आहे. महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गात गणले जात असल्याने उत्तीर्ण होऊनही अमोल चव्हाण यांची नियुक्ती लांबणीवर पडली होती. पण सीमा भागात कार्यरत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थी नोकरदार कृती समितीच्या पाठपुराव्यामुळे यश आले आहे. शिरगुप्पी येथील अमोल चव्हाण यांची महाराष्ट्रात सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या राज्याबाहेरील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गात गणले जाते. सीमा भागातील अमोल चव्हाण (रा. शिरगुप्पी ) यानी आयोगाची परीक्षा दिल्यानंतर तो उत्तीर्ण झाला होता. पण मागासवर्गीय असूनदेखील त्याची गणना खुल्या प्रवर्गात झाल्याने त्याचा परिणाम निवडीवर झाला. सरकारच्या अध्यादेशामुळे सीमा भागातील ८६५ गावांच्या विद्यार्थी व नोकरदार यांच्यावर अन्याय होत आहे. महाराष्ट्राने दावा सांगितलेल्या सीमा भागातील ८६५ गावांतील लोकांना महाराष्ट्रातील लोकांप्रमाणेच गणले जावे व सेवा शर्तीच्या अटी लागू कराव्यात,या मागणीसाठी प्रा. डॉ. अच्युत माने यांच्या नेतृत्वाखाली मागासवर्गीय विद्यार्थी नोकरदार कृती समितीची स्थापना केली आहे. या समितीने वारंवार महाराष्ट्रातील मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांच्या भेटी घेऊन याबाबत चर्चा केली आहे.

अमोल चव्हाण यांची निवड लांबली असल्याचे लक्षात आल्यानंतर कृती समितीने यासाठी पाठपुरावा केला होता. प्रा. डॉक्टर अच्युत माने, प्रा. शरद कांबळे, सुनील शेवाळे, अनिल मसाळे, प्रमोद कांबळे, भुदरगडचे आमदार प्रकाश आबिडकर, मंत्री हसन मुश्रीफ, सीमा समन्वयक मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. याची दखल म्हणूनच अमोल चव्हाण यांची अखेर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. त्याच्या निवडीने अन्य सीमाभागातील विद्यार्थ्यांना ही न्याय मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.