शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

आंबोली, आंबा घाट बनलेत ‘घातपाताचे केंद्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:46 IST

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : घनदाट जंगल, खोल दºया, निसर्गरम्य परिसरासाठी आंबोली, आंबा घाट परिचित आहे. मात्र, खून करून मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे ठिकाण अशी या घाटांची ओळख आता पुढे येत आहे. गुन्हेगारी टोळक्यांचा वावर या ठिकाणी वाढला असून या घाटांमध्ये अनेक ‘कांड’ घडले आहेत, जे आजही उघडकीस आलेले नाहीत.विवाहबाह्य ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : घनदाट जंगल, खोल दºया, निसर्गरम्य परिसरासाठी आंबोली, आंबा घाट परिचित आहे. मात्र, खून करून मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे ठिकाण अशी या घाटांची ओळख आता पुढे येत आहे. गुन्हेगारी टोळक्यांचा वावर या ठिकाणी वाढला असून या घाटांमध्ये अनेक ‘कांड’ घडले आहेत, जे आजही उघडकीस आलेले नाहीत.विवाहबाह्य संबंध, आर्थिक किंवा मालमत्ता वाद, पूर्ववैमनस्य, हुंडाबळी, क्षणिक वादातून सुरू असलेल्या खूनसत्राने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे. सांगली पोलिसांनी अनिकेत कोथळेचा खून करून मृतदेह आंबोली घाटात जाळला. या घटनेनंतर कधी कोणाचा, कशासाठी खून होईल याची शाश्वती आता राहिलेली नाही. आंबोली घाटात एक नव्हे तब्बल चार मृतदेह पाठोपाठ आढळून आले. वर्षापूर्वी स्वप्निल राजन पोवार (रा. जुना बुधवार पेठ) या चांदी व्यावसायिकाचा खून करून मृतदेह आंबा घाटातील विसावा पॉर्इंट येथील पाचशे फूट दरीत टाकला होता. या मृतदेहाचे काही अवयवच पोलिसांच्या हाती लागले. एकामोगाग एक हत्या, आत्महत्या आणि अपघाताच्या घटनांनी आंबोली, आंबा घाट नाहक बदनाम होत आहेत.हत्येचा सुगावा लागू नयेयासाठी घाटांची निवडराजर्षी शाहूंचे पुरोगामी विचार जोपासणाºया जिल्ह्यांत खुनासारखा वाढत्या घटना सुन्न करणाºया आहेत. या घटना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा कोणतेच पाऊल उचलत नाही. गेल्या वर्षभरापासून कोल्हापुरात खूनसत्र सुरू आहे. हत्या केल्यानंतर त्याचा सुगावा लागू नये, आपल्यापर्यंत पोलिसांचे हात पोहोचू नयेत, त्यांची दिशाभूल व्हावी, यासाठी आरोपी आंबोली-आंबा घाटात मृतदेहाची नियोजनबद्धरित्या विल्हेवाट लावत आहेत. याठिकाणी कधी मृतदेहाचे धडच मिळते, तर हात-पाय आणि डोके गायब असते. कधी संपूर्ण मृतदेह सापडतो; पण चेहरा ठेचून वा जाळून विद्रूप केलेला असतो. अशा गूढ खुनांचे प्रमाण वाढू लागले आहे.तिन्ही जिल्ह्यांच्यापोलिसांची जबाबदारीसिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर आंबोली घाट आहे तर रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर आंबा घाट आहे. हे दोन्ही घाट असुरक्षित होण्यामागे अनेक कारणे आहेत. नागमोडी घाटरस्ते दोन्ही बाजूंनी जंगलव्याप्त आहेत. एका बाजूला उंच डोंगरकडे तर दुसºया बाजूला खोल दरी त्यामुळे या मार्गावरून जाताना वाहनधारकांना श्वास रोखावा लागतो. दिवसा या मार्गावरून तुरळक रहदारी असते. रात्री सातनंतर या मार्गावर स्मशानशांतता असते. पोलीस कधी फिरकत नाहीत. त्यामुळे हा परिसर गुन्हेगारांचा अड्डाच बनला आहे. या निर्जन परिसराचा अनेकजण गैरमार्गासाठी वापर करत आहे. कोल्हापूरसह सिंधुदुर्ग व रत्नागिरी या तिन्ही जिल्ह्यांचे पोलीस या घटनांना जबाबदार आहेत. त्यांनी तत्काळ सामूहिक बैठक घेऊन खबरदारी घेणे गरजेचे आहे.