शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली, आंबा घाट बनलेत ‘घातपाताचे केंद्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:46 IST

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : घनदाट जंगल, खोल दºया, निसर्गरम्य परिसरासाठी आंबोली, आंबा घाट परिचित आहे. मात्र, खून करून मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे ठिकाण अशी या घाटांची ओळख आता पुढे येत आहे. गुन्हेगारी टोळक्यांचा वावर या ठिकाणी वाढला असून या घाटांमध्ये अनेक ‘कांड’ घडले आहेत, जे आजही उघडकीस आलेले नाहीत.विवाहबाह्य ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : घनदाट जंगल, खोल दºया, निसर्गरम्य परिसरासाठी आंबोली, आंबा घाट परिचित आहे. मात्र, खून करून मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे ठिकाण अशी या घाटांची ओळख आता पुढे येत आहे. गुन्हेगारी टोळक्यांचा वावर या ठिकाणी वाढला असून या घाटांमध्ये अनेक ‘कांड’ घडले आहेत, जे आजही उघडकीस आलेले नाहीत.विवाहबाह्य संबंध, आर्थिक किंवा मालमत्ता वाद, पूर्ववैमनस्य, हुंडाबळी, क्षणिक वादातून सुरू असलेल्या खूनसत्राने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे. सांगली पोलिसांनी अनिकेत कोथळेचा खून करून मृतदेह आंबोली घाटात जाळला. या घटनेनंतर कधी कोणाचा, कशासाठी खून होईल याची शाश्वती आता राहिलेली नाही. आंबोली घाटात एक नव्हे तब्बल चार मृतदेह पाठोपाठ आढळून आले. वर्षापूर्वी स्वप्निल राजन पोवार (रा. जुना बुधवार पेठ) या चांदी व्यावसायिकाचा खून करून मृतदेह आंबा घाटातील विसावा पॉर्इंट येथील पाचशे फूट दरीत टाकला होता. या मृतदेहाचे काही अवयवच पोलिसांच्या हाती लागले. एकामोगाग एक हत्या, आत्महत्या आणि अपघाताच्या घटनांनी आंबोली, आंबा घाट नाहक बदनाम होत आहेत.हत्येचा सुगावा लागू नयेयासाठी घाटांची निवडराजर्षी शाहूंचे पुरोगामी विचार जोपासणाºया जिल्ह्यांत खुनासारखा वाढत्या घटना सुन्न करणाºया आहेत. या घटना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा कोणतेच पाऊल उचलत नाही. गेल्या वर्षभरापासून कोल्हापुरात खूनसत्र सुरू आहे. हत्या केल्यानंतर त्याचा सुगावा लागू नये, आपल्यापर्यंत पोलिसांचे हात पोहोचू नयेत, त्यांची दिशाभूल व्हावी, यासाठी आरोपी आंबोली-आंबा घाटात मृतदेहाची नियोजनबद्धरित्या विल्हेवाट लावत आहेत. याठिकाणी कधी मृतदेहाचे धडच मिळते, तर हात-पाय आणि डोके गायब असते. कधी संपूर्ण मृतदेह सापडतो; पण चेहरा ठेचून वा जाळून विद्रूप केलेला असतो. अशा गूढ खुनांचे प्रमाण वाढू लागले आहे.तिन्ही जिल्ह्यांच्यापोलिसांची जबाबदारीसिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर आंबोली घाट आहे तर रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर आंबा घाट आहे. हे दोन्ही घाट असुरक्षित होण्यामागे अनेक कारणे आहेत. नागमोडी घाटरस्ते दोन्ही बाजूंनी जंगलव्याप्त आहेत. एका बाजूला उंच डोंगरकडे तर दुसºया बाजूला खोल दरी त्यामुळे या मार्गावरून जाताना वाहनधारकांना श्वास रोखावा लागतो. दिवसा या मार्गावरून तुरळक रहदारी असते. रात्री सातनंतर या मार्गावर स्मशानशांतता असते. पोलीस कधी फिरकत नाहीत. त्यामुळे हा परिसर गुन्हेगारांचा अड्डाच बनला आहे. या निर्जन परिसराचा अनेकजण गैरमार्गासाठी वापर करत आहे. कोल्हापूरसह सिंधुदुर्ग व रत्नागिरी या तिन्ही जिल्ह्यांचे पोलीस या घटनांना जबाबदार आहेत. त्यांनी तत्काळ सामूहिक बैठक घेऊन खबरदारी घेणे गरजेचे आहे.