शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली, आंबा घाट बनलेत ‘घातपाताचे केंद्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:46 IST

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : घनदाट जंगल, खोल दºया, निसर्गरम्य परिसरासाठी आंबोली, आंबा घाट परिचित आहे. मात्र, खून करून मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे ठिकाण अशी या घाटांची ओळख आता पुढे येत आहे. गुन्हेगारी टोळक्यांचा वावर या ठिकाणी वाढला असून या घाटांमध्ये अनेक ‘कांड’ घडले आहेत, जे आजही उघडकीस आलेले नाहीत.विवाहबाह्य ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : घनदाट जंगल, खोल दºया, निसर्गरम्य परिसरासाठी आंबोली, आंबा घाट परिचित आहे. मात्र, खून करून मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे ठिकाण अशी या घाटांची ओळख आता पुढे येत आहे. गुन्हेगारी टोळक्यांचा वावर या ठिकाणी वाढला असून या घाटांमध्ये अनेक ‘कांड’ घडले आहेत, जे आजही उघडकीस आलेले नाहीत.विवाहबाह्य संबंध, आर्थिक किंवा मालमत्ता वाद, पूर्ववैमनस्य, हुंडाबळी, क्षणिक वादातून सुरू असलेल्या खूनसत्राने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे. सांगली पोलिसांनी अनिकेत कोथळेचा खून करून मृतदेह आंबोली घाटात जाळला. या घटनेनंतर कधी कोणाचा, कशासाठी खून होईल याची शाश्वती आता राहिलेली नाही. आंबोली घाटात एक नव्हे तब्बल चार मृतदेह पाठोपाठ आढळून आले. वर्षापूर्वी स्वप्निल राजन पोवार (रा. जुना बुधवार पेठ) या चांदी व्यावसायिकाचा खून करून मृतदेह आंबा घाटातील विसावा पॉर्इंट येथील पाचशे फूट दरीत टाकला होता. या मृतदेहाचे काही अवयवच पोलिसांच्या हाती लागले. एकामोगाग एक हत्या, आत्महत्या आणि अपघाताच्या घटनांनी आंबोली, आंबा घाट नाहक बदनाम होत आहेत.हत्येचा सुगावा लागू नयेयासाठी घाटांची निवडराजर्षी शाहूंचे पुरोगामी विचार जोपासणाºया जिल्ह्यांत खुनासारखा वाढत्या घटना सुन्न करणाºया आहेत. या घटना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा कोणतेच पाऊल उचलत नाही. गेल्या वर्षभरापासून कोल्हापुरात खूनसत्र सुरू आहे. हत्या केल्यानंतर त्याचा सुगावा लागू नये, आपल्यापर्यंत पोलिसांचे हात पोहोचू नयेत, त्यांची दिशाभूल व्हावी, यासाठी आरोपी आंबोली-आंबा घाटात मृतदेहाची नियोजनबद्धरित्या विल्हेवाट लावत आहेत. याठिकाणी कधी मृतदेहाचे धडच मिळते, तर हात-पाय आणि डोके गायब असते. कधी संपूर्ण मृतदेह सापडतो; पण चेहरा ठेचून वा जाळून विद्रूप केलेला असतो. अशा गूढ खुनांचे प्रमाण वाढू लागले आहे.तिन्ही जिल्ह्यांच्यापोलिसांची जबाबदारीसिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर आंबोली घाट आहे तर रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर आंबा घाट आहे. हे दोन्ही घाट असुरक्षित होण्यामागे अनेक कारणे आहेत. नागमोडी घाटरस्ते दोन्ही बाजूंनी जंगलव्याप्त आहेत. एका बाजूला उंच डोंगरकडे तर दुसºया बाजूला खोल दरी त्यामुळे या मार्गावरून जाताना वाहनधारकांना श्वास रोखावा लागतो. दिवसा या मार्गावरून तुरळक रहदारी असते. रात्री सातनंतर या मार्गावर स्मशानशांतता असते. पोलीस कधी फिरकत नाहीत. त्यामुळे हा परिसर गुन्हेगारांचा अड्डाच बनला आहे. या निर्जन परिसराचा अनेकजण गैरमार्गासाठी वापर करत आहे. कोल्हापूरसह सिंधुदुर्ग व रत्नागिरी या तिन्ही जिल्ह्यांचे पोलीस या घटनांना जबाबदार आहेत. त्यांनी तत्काळ सामूहिक बैठक घेऊन खबरदारी घेणे गरजेचे आहे.