शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

करवीर पोलीस ठाण्यासमोर आंबेवाडी ग्रामस्थांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:25 IST

आंबेवाडी गावातील पूरग्रस्तांचे अन्यत्र पुनर्वसन करावे, अशी मागणी १९८९ साली ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली. त्यानंतर वारंवार जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावाही करण्यात ...

आंबेवाडी गावातील पूरग्रस्तांचे अन्यत्र पुनर्वसन करावे, अशी मागणी १९८९ साली ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली. त्यानंतर वारंवार जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावाही करण्यात आला; मात्र पूरग्रस्त ग्रामस्थांचे पुनर्वसन झालेच नाही. त्यामुळे २०१९ मध्ये व पुन्हा जुलै २०२१ मध्ये महापूर आला. त्यावेळी ग्रामस्थांनी पूरग्रस्त भागास भेट देण्यासाठी आलेले मंत्री व प्रशासनास पूरग्रस्तांचे १५ ऑगस्टपूर्वी १०० टक्के पुनर्वसन करावे, अन्यथा स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी व ग्रामस्थ आत्मदहन करतील, असा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाय म्हणून सरपंच सिकंदर मुजावर, उपसरपंच वेदांत विटकर, सागर काकडे, आशिष माने, भारत गायकवाड, आदींना करवीर तहसील कार्यालयात चर्चेसाठी बोलवले. तहसीलदार शीतल मुळे-भामरे, करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर व करवीर पोलीस उपअधीक्षक आर.आर.पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली. लेखी आश्वासन दिल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका सरपंच मुजावर यांनी घेतली. या दरम्यान गावामध्ये सरपंचासह अन्य सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची अफवा पसरली, त्यामुळे शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शेकडो ग्रामस्थांनी करवीर पोलीस ठाण्याच्या दारात ताब्यात घेतलेल्यांना सोडावे म्हणून अर्धा तास ठिय्या दिला. पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी ग्रामस्थांना ताब्यात घेतले नसल्याचे सांगितल्यावर ग्रामस्थांनी निघून जाण्याचे मान्य केल्यामुळे तणाव निवळला.

फोटो : १४०८२०२१-कोल-आंबेवाडी

आेळी : गेल्या ३२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासंबंधी करवीर पोलीस ठाण्यात शनिवारी आंबेवाडी सरपंच सिकंदर मुजावर यांच्यासह पदाधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने चर्चेसाठी पाचारण केले होते.