शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आंबेओहोळ प्रकल्पाचा वनवास संपेना-वीस वर्षांपासून रडत-खडत प्रवास : कागदावरवरच सत्तर टक्के काम पूर्ण, निधीअभावी रखडला प्रकल्प, पुनर्वसनासाठीही नाहीत पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:21 IST

चित्रीप्रमाणेच आजरा, गडहिंग्लजसह सीमाभागाला वरदान ठरणाºया गडहिंग्लज उपविभागातील उचंगी, आंबेओहोळ व सर्फनाला हे तिन्ही धरण प्रकल्प गेल्या दोन दशकांपासून रखडले आहेत.

चित्रीप्रमाणेच आजरा, गडहिंग्लजसह सीमाभागाला वरदान ठरणाºया गडहिंग्लज उपविभागातील उचंगी, आंबेओहोळ व सर्फनाला हे तिन्ही धरण प्रकल्प गेल्या दोन दशकांपासून रखडले आहेत. आवश्यक निधी आणि धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नामुळे रेंगाळलेल्या या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीबरोबरच जनरेट्याचीही गरज आहे. धरणग्रस्तांच्या त्यागातून आणि लोकलढ्यातून उपलब्ध झालेल्या जंगमहट्टी, चित्री-फाटकवाडीच्या पाण्यामुळे हरितक्रांतीच्या पर्वाला सुरुवात झाली. मात्र, गडहिंग्लज विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पाणी’ आणि समग्र ‘विकासा’चा जागर नव्याने मांडण्याची गरज आहे. त्यासाठीच रेंगाळलेल्या या प्रकल्पांचा लेखा-जोखा ...रवींद्र येसादे ।उत्तूर : १९९८ मध्ये मंजूर झालेला आजरा तालुक्यातील बहुचर्चित आंबेओहळ प्रकल्प तब्बल २० वर्षांपासून रखडला आहे. प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, प्रकल्पाच्या पूर्ततेबरोबरच विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी ७७ कोटींपेक्षा अधिक निधीची गरज आहे. या प्रकल्पाविषयी ..!आजरा व गडहिंग्लज तालुक्याला वरदायी ठरणारा आंबेओहळ प्रकल्प अनेक कारणांनी रखडला आहे. प्रकल्पाच्या मंजुरीनंतर प्रकल्पाच्या विरोधात अनेक आंदोलने झाली. तोडग्यासाठी कृती समित्याही स्थापन झाल्या. मात्र, त्यांच्यातील मतभिन्नता आजही कायम आहे. त्यामुळे सर्वसामान्य धरणग्रस्त अजूनही उपाशीच आहे.सन २००० मध्ये प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली. त्यावेळी पुनर्वसन व धरणाच्या उंचीवरून विरोध सुरू झाला. २००२ मध्ये जमावबंदीचा आदेश लागू करून प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. कधी निधी नसल्याने काम बंद, तर कधी पुनर्वसन होत नसल्याने विस्थापितांनी काम बंद पाडले. त्यामुळे ३० कोटींचा प्रकल्प २३० कोटींवर गेला आहे. या प्रकल्पात १.२४ द.ल.घ.फू. इतका पाणीसाठा होणार आहे. या प्रकल्पामुळे आजरा तालुक्यातील २१२२ हेक्टर व गडहिंग्लज तालुक्यातील ४२२० हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. त्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे बांधण्यात येणार आहेत. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यास ०.५० मे. वॅट वीजनिर्मितीचे नियोजन आहे.२० वर्षांत धरणाचे पूर्ण झालेले काम सरकारी कागदावर ७० टक्के असल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात मात्र हे काम कमीच असल्याचे वास्तव आहे.

सात-बारा पत्रकी नोंद असणाºया खातेदारांना एकत्रित या असे सांगण्यात येते. मात्र, ते एकत्र येऊ शकत नसतील तर समान वाटप करून हजर असणाºयांना पेंमट द्या, अशी आग्रहाची मागणी आहे; परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. पेंमट जमा असूनही मिळत नाही. प्रकल्पग्रस्तांचे निर्वाह भत्तेही बंद आहेत.

धरणग्रस्तांच्या दाखल्यात अनेक त्रुटी असून, नोकरीत धरणग्रस्तांना प्राधान्य द्यावे, असे असताना प्रकल्पातील धरणग्रस्तांना नोकरीचा लाभ मिळाला नाही. जमीन दाखविण्यासाठी क्रमपाळीनुसार जमीन देणे बंधनकारक असताना ‘हाजीर तो वजीर’ अशी अवस्था आहे. जिल्हाधिकारी यांचे नावे असणाºया जमिनी दाखविण्यासाठी समक्ष अधिकारी नसतो. फक्त जमिनीची यादी दिली जाते.

जमीन शोधणे शेतकºयांना अडचणींचे ठरत आहे. जमिनी पहायला गेल्यानंतर वादाचे प्रकारही घडत आहेत. धरणात जमिनी गेल्या, पर्यायी जमिनी नाही, भरपाईदेखील नाही, त्यामुळे धरणग्रस्तांवर उपासमारीची वेळ आली आहे. धरण पूर्ण होणारच नसेल, तर आमच्या जमिनी परत करा, अशी त्यांची मागणी आहे.पुनर्वसनासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. परिपूर्ण माहिती कोणत्याही कार्यालयातून मिळत नाही. जिल्हाधिकारी कोल्हापूर, पुनर्वसन विभाग कसबा

बावडा, प्रांताधिकारी कार्यालय गडहिंग्लज, भुदरगड व आजरा, गडहिंग्लज तहसीलदार कार्यालय, आदींकडे धावाधाव करावी लागते. त्यामुळे पुनर्वसनासाठी गडहिंग्लज येथे एकच स्वतंत्र कार्यालय सुरू करावे, अशी मागणी विस्थापितांची आहे. अन्य धरणग्रस्तांनाही त्याचा लाभ होईल.सन २००० मध्ये प्रकल्पाच्या कामास सुरुवातकधी निधी नसल्याने काम बंद, तर कधी पुनर्वसन होत नसल्याने विस्थापितांनी काम बंद पाडले.तीस कोटींचा प्रकल्प २३० कोटींवर गेला आहे.प्रकल्पात १.२४ द.ल.घ.फू. इतका पाणीसाठा होणार आहे.आजरा तालुक्यातील २१२२ व गडहिंग्लज तालुक्यातील ४२२० हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे.कोल्हापूर पद्धतीचे ७ बंधारे बांधण्यात येणार, प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यास ०.५० मे. वॅट वीजनिर्मितीचे नियोजन.