शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिर संरक्षण भिंतीची होणार पाहणी

By admin | Updated: March 31, 2016 00:38 IST

देवस्थान व्यवस्थापन समिती : ७ एप्रिलला विविध खात्यांचे प्रतिनिधी देणार अहवाल

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेसाठी संरक्षण भिंतीची उंची तीन फुटांनी वाढविण्यासाठी गुरुवारी (दि. ७ एप्रिल) विविध खात्यांच्या प्रतिनिधींच्या पथकाद्वारे भिंतीची पाहणी करून शासनाला अहवाल सादर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत झाला. जिल्हा प्रशासन, पोलिस, कोल्हापूर महापालिका प्रशासन, देवस्थान समिती, पुरातत्त्व खाते यांच्या प्रतिनिधींची समिती तीन फुटांनी भिंत वाढविण्यासाठी मंदिर परिसरातील भिंतीची पाहणी करेल, असा निर्णय घेण्यात आला. या दरम्यान लाडू प्रसादाबाबतही चर्चा झाली. तुरुंगामध्ये जाऊन ज्या ठिकाणी कैद्यांकडून लाडू बनविण्यात येणार आहेत, त्या ठिकाणची पाहणी केली जाणार आहे. याशिवाय तुरुंग प्रशासनाकडून लाडूचा प्रतिनग ७ रुपये ५० पैसे असा आहे. हा दर परवडणारा नाही. त्याचीही चर्चा या बैठकीत झाली. यावेळी सचिव शुभांगी साठे, सहसचिव शिवाजी साळवी, सदस्य फिरोजी परब, प्रमोद पाटील, संगीता खाडे, अभियंता सुदेश देशंपांडे, आदी उपस्थित होते.‘अंबाबाई’ला तीर्थक्षेत्र दर्जा कधी? : सतेज पाटीलकोल्हापुरातील करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. त्यास तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे आला आहे, हे खरे आहे का ? असल्यास मान्यता दिली आहे का व सद्य:स्थिती काय आहे, असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोल्हापुरातील श्री क्षेत्र करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर परिसर विकास प्रकल्प आराखडा व कोल्हापूर तीर्थ विकास प्राधिकरणास मंजुरीचा प्रस्ताव आयुक्त, कोल्हापूर महापालिका यांच्याकडून ६ मार्च २०१५ व विभागीय आयुक्त, पुणे यांचा प्रस्ताव ७ मे २०१५ ला शासनास पत्रान्वये मिळाला. तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळ, परिसर विकास आराखडा अंतिम करणेबाबत शासनाने ४ जून २०१५ च्या निर्णयाद्वारे कार्यपद्धती निश्चित केली. त्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचा समावेश असलेल्या जिल्हास्तरीय समितीमार्फत प्रस्ताव सादर करण्याविषयी संबंधितांना सूचित केले आहे. त्यामुळे याबाबत विलंबाचा प्रश्न उद्भवत नाही.