शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई चरणी दहा लाख भाविक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या गेल्या सहा दिवसांत दहा लाख भाविकांनी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. रविवारी (दि. २४) व सोमवारी (दि. २५) दोन दिवस पडलेल्या पावसामुळे भाविकांची संख्या रोडावली. दरम्यान, मंगळवारी १ लाख ४६ हजार ८९९ भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.गुरुवार (दि. २१) पासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या गेल्या सहा दिवसांत दहा लाख भाविकांनी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. रविवारी (दि. २४) व सोमवारी (दि. २५) दोन दिवस पडलेल्या पावसामुळे भाविकांची संख्या रोडावली. दरम्यान, मंगळवारी १ लाख ४६ हजार ८९९ भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.गुरुवार (दि. २१) पासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. त्या दिवसापासून सलग तीन दिवस रोज सव्वा लाखाच्या वर भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येत होते. उत्सवकाळातील एकमेव रविवारी (दि. २४) भाविकांची उच्चांकी गर्दी होती. भाविकांच्या रांगा शिवाजी पुतळ्यापर्यंत गेल्या होत्या. मात्र त्या दिवशी दुपारी तीन वाजल्यापासून अचानक जोराचा पाऊस सुरू झाला आणि भाविकांची पळापळ होऊन संख्या रोडावली.सोमवारी (दि. २५) देखील दुपारी चार वाजल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी सात वाजता पाऊस थांबल्यानंतर वातावरण पूर्ववत झाले. मात्र दोन दिवस पडलेल्या पावसाचा परिणाम भाविकांच्या गर्दीवर झाला. मंगळवारी मात्र सकाळपासून भाविकांची मंदिर परिसरात चांगली गर्दी होती. पावसानेही उघडीप दिल्याने सायंकाळीही भवानी मंडपात झालेल्या ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ या सांस्कृतिक कार्यक्रमाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हॉटेल्स, यात्री निवास हाऊसफुल्लकरवीरनिवासनी अंबाबाईच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची कोल्हापुरात रेलचेल असते. विशेषत: उन्हाळी सुटीत, नवरात्रौत्सव, दिवाळी सुटीदरम्यान मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते.नवरात्रौत्सवापासून कोल्हापुरात लाखो परस्थ भाविकांचा ओघ वाढला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील सर्व हॉटेल्स, यात्री निवास, धर्मशाळा, घरगुती यात्री निवासदेखील पर्यटकांनी गच्च झाले आहेत. परगावच्या गाड्यांनी बिंदू चौक, शिवाजी स्टेडियम, सरस्वती टॉकीज,गांधी मैदान यासारखी पार्किंगची ठिकाणेही वाहनांनी भरली असून, शहराच्या मुख्य चौकांमध्ये रहदारी खोळंबत आहे.भाविक लुटताहेत खरेदीचा आनंदमंदिराकडे जाणाºया सर्व बाजूंचे रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात आल्याने या परिसरात भाविक मोठ्या संख्येने खरेदीचा आनंद लुटत होते. किरकोळ साहित्य विक्रेते, खेळणीवाले, फेरीवाल्यांपासून ते कोल्हापूरची ओळख असलेल्या साज, ठुशी यासारख्या पारंपरिक इमिटेशन ज्वेलरी, नऊवारी साड्या, कोल्हापुरी चप्पल, गूळ, हार-गजरे, फूलवाले, ओटीसह पूजेचे साहित्य अशा सर्वच प्रकारच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री झाल्याने कोल्हापूरच्या बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल सुुरू आहे.अष्टमीला रांगेतूनच दर्शनउद्या, गुरुवारी अष्टमी हा नवरात्रौत्सवातील सर्वांत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन, देवस्थान समितीच्या वतीने भाविकांना अन्य कोणत्याही मार्गाने अंबाबाईचे दर्शन दिले जाणार नाही. त्यामुळे सर्व भाविकांनी रांगेतूनच दर्शन घ्यावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.