शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

अंबाबाई चरणी दहा लाख भाविक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या गेल्या सहा दिवसांत दहा लाख भाविकांनी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. रविवारी (दि. २४) व सोमवारी (दि. २५) दोन दिवस पडलेल्या पावसामुळे भाविकांची संख्या रोडावली. दरम्यान, मंगळवारी १ लाख ४६ हजार ८९९ भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.गुरुवार (दि. २१) पासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या गेल्या सहा दिवसांत दहा लाख भाविकांनी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. रविवारी (दि. २४) व सोमवारी (दि. २५) दोन दिवस पडलेल्या पावसामुळे भाविकांची संख्या रोडावली. दरम्यान, मंगळवारी १ लाख ४६ हजार ८९९ भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.गुरुवार (दि. २१) पासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. त्या दिवसापासून सलग तीन दिवस रोज सव्वा लाखाच्या वर भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येत होते. उत्सवकाळातील एकमेव रविवारी (दि. २४) भाविकांची उच्चांकी गर्दी होती. भाविकांच्या रांगा शिवाजी पुतळ्यापर्यंत गेल्या होत्या. मात्र त्या दिवशी दुपारी तीन वाजल्यापासून अचानक जोराचा पाऊस सुरू झाला आणि भाविकांची पळापळ होऊन संख्या रोडावली.सोमवारी (दि. २५) देखील दुपारी चार वाजल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी सात वाजता पाऊस थांबल्यानंतर वातावरण पूर्ववत झाले. मात्र दोन दिवस पडलेल्या पावसाचा परिणाम भाविकांच्या गर्दीवर झाला. मंगळवारी मात्र सकाळपासून भाविकांची मंदिर परिसरात चांगली गर्दी होती. पावसानेही उघडीप दिल्याने सायंकाळीही भवानी मंडपात झालेल्या ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ या सांस्कृतिक कार्यक्रमाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हॉटेल्स, यात्री निवास हाऊसफुल्लकरवीरनिवासनी अंबाबाईच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची कोल्हापुरात रेलचेल असते. विशेषत: उन्हाळी सुटीत, नवरात्रौत्सव, दिवाळी सुटीदरम्यान मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते.नवरात्रौत्सवापासून कोल्हापुरात लाखो परस्थ भाविकांचा ओघ वाढला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील सर्व हॉटेल्स, यात्री निवास, धर्मशाळा, घरगुती यात्री निवासदेखील पर्यटकांनी गच्च झाले आहेत. परगावच्या गाड्यांनी बिंदू चौक, शिवाजी स्टेडियम, सरस्वती टॉकीज,गांधी मैदान यासारखी पार्किंगची ठिकाणेही वाहनांनी भरली असून, शहराच्या मुख्य चौकांमध्ये रहदारी खोळंबत आहे.भाविक लुटताहेत खरेदीचा आनंदमंदिराकडे जाणाºया सर्व बाजूंचे रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात आल्याने या परिसरात भाविक मोठ्या संख्येने खरेदीचा आनंद लुटत होते. किरकोळ साहित्य विक्रेते, खेळणीवाले, फेरीवाल्यांपासून ते कोल्हापूरची ओळख असलेल्या साज, ठुशी यासारख्या पारंपरिक इमिटेशन ज्वेलरी, नऊवारी साड्या, कोल्हापुरी चप्पल, गूळ, हार-गजरे, फूलवाले, ओटीसह पूजेचे साहित्य अशा सर्वच प्रकारच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री झाल्याने कोल्हापूरच्या बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल सुुरू आहे.अष्टमीला रांगेतूनच दर्शनउद्या, गुरुवारी अष्टमी हा नवरात्रौत्सवातील सर्वांत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन, देवस्थान समितीच्या वतीने भाविकांना अन्य कोणत्याही मार्गाने अंबाबाईचे दर्शन दिले जाणार नाही. त्यामुळे सर्व भाविकांनी रांगेतूनच दर्शन घ्यावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.