शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई, जोतिबासाठी केंद्राला साकडे

By admin | Updated: September 20, 2014 00:30 IST

आचारसंहिता संपल्यावर येणार गती : प्राथमिक स्वरूपात ५०० कोटींची मागणी

प्रवीण देसाई- कोल्हापूर -- अंबाबाईच्या मूर्ती प्रतिष्ठापनेला सप्टेंबर २०१५मध्ये तीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ५०० कोटींचा आराखडा केंद्र सरकारला पाठवून निधीच्या मागणीसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. राज्य शासनाने निधीची घोषणा करून तोंडाला पाने पुसल्यामुळेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या अंबाबाई व जोतिबा देवस्थानच्या विकासासाठी या संघटना पुढे सरसावल्या आहेत. अंबाबाई मंदिराच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला होता. परंतु सरकारचा कार्यकाळ संपला तरी अद्याप यातील एक रुपयाही मिळाला नाही. त्याचबरोबर श्री अंबाबाई मंदिर विकासासाठी महापालिकेने तीन वर्षांपूर्वी १२० कोटींचा विकास आराखडा बनवून घेतला होता. नंतर हा वाढवण्यात आला असून, त्यात मंदिरबाह्य परिसरातील भूसंपादन, ठिकठिकाणी पार्किंगची सोय, यात्री निवास, अन्नछत्र, मंदिराला जोडणाऱ्या रस्त्यांचे सुशोभीकरण, ‘कोल्हापूर दर्शन’साठी कायमस्वरूपी बससेवा, पंचगंगा घाट-रंकाळा या स्थळांचे सुशोभीकरण, गर्दीच्या रस्त्यांच्या ठिकाणी ‘स्काय वॉक’ अशा बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव आहे. आता हा आराखडा १९० कोटींचा झाला आहे. त्याबाबतही काही निर्णय झालेला नाही. अशीच स्थिती वाडीरत्नागिरी येथील जोतिबा देवस्थानची आहे. सुमारे १५५ कोटींचा आराखडा राज्य शासनाकडे पाठवूनही त्यावर निर्णय झालेला नाही.यामुळे आता काही सामाजिक संघटनांनीच यामध्ये पुढाकार घेऊन थेट केंद्र सरकारला साकडे घातले आहे. पर्यटन खात्याशी संपर्क साधून नांदेड येथील गुरुदा गद्दीला ३०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने ३००० कोटी रुपये केंद्र सरकारने निधी दिला आहे. त्यामुळे अंबाबाई आणि जोतिबा देवस्थानच्या विकासासाठी किमान ५०० कोटी रुपये निधीची मागणी केली आहे. आराखड्यामध्ये ३४५ कोटी रुपयांची मागणी श्री अंबाबाई देवस्थानसाठी, तर १५५ कोटी श्री जोतिबा देवस्थानच्या विकासासाठी करण्यात आली आहे.