शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

अंबाबाई, जोतिबासाठी केंद्राला साकडे

By admin | Updated: September 20, 2014 00:30 IST

आचारसंहिता संपल्यावर येणार गती : प्राथमिक स्वरूपात ५०० कोटींची मागणी

प्रवीण देसाई- कोल्हापूर -- अंबाबाईच्या मूर्ती प्रतिष्ठापनेला सप्टेंबर २०१५मध्ये तीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ५०० कोटींचा आराखडा केंद्र सरकारला पाठवून निधीच्या मागणीसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. राज्य शासनाने निधीची घोषणा करून तोंडाला पाने पुसल्यामुळेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या अंबाबाई व जोतिबा देवस्थानच्या विकासासाठी या संघटना पुढे सरसावल्या आहेत. अंबाबाई मंदिराच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला होता. परंतु सरकारचा कार्यकाळ संपला तरी अद्याप यातील एक रुपयाही मिळाला नाही. त्याचबरोबर श्री अंबाबाई मंदिर विकासासाठी महापालिकेने तीन वर्षांपूर्वी १२० कोटींचा विकास आराखडा बनवून घेतला होता. नंतर हा वाढवण्यात आला असून, त्यात मंदिरबाह्य परिसरातील भूसंपादन, ठिकठिकाणी पार्किंगची सोय, यात्री निवास, अन्नछत्र, मंदिराला जोडणाऱ्या रस्त्यांचे सुशोभीकरण, ‘कोल्हापूर दर्शन’साठी कायमस्वरूपी बससेवा, पंचगंगा घाट-रंकाळा या स्थळांचे सुशोभीकरण, गर्दीच्या रस्त्यांच्या ठिकाणी ‘स्काय वॉक’ अशा बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव आहे. आता हा आराखडा १९० कोटींचा झाला आहे. त्याबाबतही काही निर्णय झालेला नाही. अशीच स्थिती वाडीरत्नागिरी येथील जोतिबा देवस्थानची आहे. सुमारे १५५ कोटींचा आराखडा राज्य शासनाकडे पाठवूनही त्यावर निर्णय झालेला नाही.यामुळे आता काही सामाजिक संघटनांनीच यामध्ये पुढाकार घेऊन थेट केंद्र सरकारला साकडे घातले आहे. पर्यटन खात्याशी संपर्क साधून नांदेड येथील गुरुदा गद्दीला ३०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने ३००० कोटी रुपये केंद्र सरकारने निधी दिला आहे. त्यामुळे अंबाबाई आणि जोतिबा देवस्थानच्या विकासासाठी किमान ५०० कोटी रुपये निधीची मागणी केली आहे. आराखड्यामध्ये ३४५ कोटी रुपयांची मागणी श्री अंबाबाई देवस्थानसाठी, तर १५५ कोटी श्री जोतिबा देवस्थानच्या विकासासाठी करण्यात आली आहे.