शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

हद्दवाढसाठी गुरुवारपासून आमरण उपोषण

By admin | Updated: August 19, 2016 01:03 IST

३५ कार्यकर्ते थेट सहभागी : आंदोलनात सहभागाचे शहरवासीयांना आवाहन; प्रसंगी उपोषणात सहभागी - महापौर

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ ही अनिवार्य असून, शासनाने त्याची अधिसूचना ३१ आॅगस्टपूर्वी काढावी, या मागणीसाठी ३५ सर्वपक्षीय कार्यकर्ते व महिला हे गुरुवारी (दि. २५ आॅगस्ट)पासून महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषणास बसणार असल्याचे हद्दवाढ सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने गुरुवारी बैठकीत जाहीर केले. या बैठकीत कार्यकर्त्यांनी ‘अभी नहीं तो कभी नहीं’चा नारा दिला. आंदोलनाची तीव्रता वाढविण्याची तसेच सर्व शहरवासीयांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. मुदतीपूर्वी शासनाने हद्दवाढीची अधिसूचना न काढल्यास उपोषणात सहभागी होणार असल्याची घोषणा महापौर अश्विनी रामाणे यांनी यावेळी केली.शहराच्या हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वमान्य तोडगा काढतील, असे यापूर्वीच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत येत्या दोन दिवसांत बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तत्पूर्वी हद्दवाढ समर्थक आणि विरोधक या दोन्हीही बाजूंनी आंदोलनाची धार तीव्र करत शासनावर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हद्दवाढ सर्वपक्षीय कृती समितीने आमरण उपोषणाच्या तयारीसाठी गुरुवारी येथील महाराणा प्रताप चौकात कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांच्या कार्यालयात ही बैठक घेण्यात आली.अधिसूचना जाहीर होईपर्यंत विविध प्रकारे आंदोलने व जनजागृती करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ३१ आॅगस्टपूर्वी हद्दवाढीची सूचना न निघाल्यास पुन्हा दोन वर्षे हद्दवाढीच्या प्रक्रियेसाठी वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी शहरवासीयांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आर. के. पोवार यांनी केले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, महिला बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, भाजपचे सुरेश जरग, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, किशोर घाटगे, नामदेवराव गावडे, फिरोज खान उस्ताद, बाबूराव कदम, रेखा आवळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....तर दहापट शक्तिप्रदर्शन करूहद्दवाढीसाठी जितके कार्यकर्ते उपोषणाला बसतील त्याच्या दुप्पट ग्रामीणचे कार्यकर्ते उपोषण करतील, असा इशारा दोन दिवसांपूर्वी हद्दवाढीला विरोध करणाऱ्या आंदोलनात करण्यात आला. त्याचाही समाचार भाजपचे महेश जाधव यांनी घेतला, ते म्हणाले दुप्पट नव्हे तर दहापट उपोषणाला बसून शक्तिप्रदर्शन करू. हद्दवाढीबाबत शासनाच्या हातात अधिसूचना तयारच आहे, लवकरच मुख्यमंत्री ती जाहीर करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.शेट्टींचा विरोध दुर्दैवीटोलबाबत नेते टाहो फोडत आहेत; पण शहराचा टोल केव्हाच माफ झाला असता पण ग्रामीण जनतेला टोल नको म्हणून शेवटपर्यंत टोकाचे आंदोलन शहरवासीयांच्या सहभागाने झाले. खासदार राजू शेट्टी हे जिल्ह्याचे नेते असताना त्यांनी हद्दवाढीला विरोध करणे दुर्दैवी आहे. त्यांनी विरोधाची भूमिका सोडावी, असेही आवाहन बाबा पार्टे यांनी केले.नेत्यांनाच विचाराशहराची गटारगंगा केल्याचा आरोप नेत्यांकडून होत असल्याने महापालिकेचे नेतृत्व सातत्याने ग्रामीण नेतेच करीत आहेत. त्यामुळे शहराचा विकास केला की गटारगंगा याचा जाब तुम्ही नेत्यांनाच विचारा, असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश लाटकर म्हणाले. जमिनीवरील आरक्षणे व धोरण हे विधिमंडळात ठरते, कायदे करणाऱ्या सभागृहाचे नेतृत्व करणारेच स्वत:च्या स्वार्थासाठी आक्षेप घेत असल्याबाबत त्यांनी खंतही व्यक्त केली.