शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

अमन मित्तल यांची वानरमारी समाज वस्तीला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बाजारभोगाव : पोंबरे (ता. पन्हाळा ) येथे वानरमारी समाज पारंपरिक पद्धतीने आपले जीवन व्यतीत करीत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बाजारभोगाव : पोंबरे (ता. पन्हाळा ) येथे वानरमारी समाज पारंपरिक पद्धतीने आपले जीवन व्यतीत करीत आहे. गावापासून सुमारे अडीच-तीन किलोमीटरवर जंगलात त्यांची वस्ती आहे. झोपड्या बांधून तिथे सहा कुटुंबे वास्तव्यास आहेत. जिल्हाधिकाऱ्यांपाठोपाठ मित्तल यांनी या वस्तीला भेट दिल्याने वानरमारी समाजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

पोंबरे येथील जंगलक्षेत्रात राहणारे वानरमारी हे आदिवासी बांधव अनेक अडचणींचा सामना करीत आहेत. वनविभागाच्या कडक नियमांमुळे त्यांना जंगलातील औषधी वनस्पती, मध काढून विक्री करण्यात अडचणी येत असल्यामुळे मिळेल तिथे रोजगार करून गुजराण करावी लागत आहे. त्यांना स्वतःची गुंठाभरही जमीन नाही. परिसरात एखाद्याच्या शेतावर मजुरी करायची नाहीतर अगदी कोकणात आंबे तोडण्याचे, काजु गोळा करायचे कामही हे लोक करीत आहेत. शासनाच्या योजना या समाजापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे हा समाज स्वावलंबी बनण्यासाठी शासनाच्या मदतीची गरज आहे.

जंगलक्षेत्रात सरकारी मुलकीपड जमिनीत झोपड्या बांधून वानरमारी समाज राहिला आहे. त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्वतः या वानरमारी समाजाच्या वस्तीला भेट दिली होती. त्यांच्या पाठोपाठ गुरुवारी मित्तल यांनी भेट दिली. शासनाने कायमस्वरूपी उदरनिर्वाहासाठी जमीन व राहण्यासाठी पक्की घरे मिळणेविषयी या समाजाने अपेक्षा व्यक्त केली आहे.

यावेळी मित्तल यांनी कुटुंबातील लहान मुलांची चौकशी करून अंगणवाडीमार्फत त्यांना पोषण आहार देणेबाबत सूचना केल्या.

यावेळी गटविकास अधिकारी तुळशीदास शिंदे, सहा. गटविकास अधिकारी एस. एस. सावंत, विस्तार अधिकारी पी. डी. भोसले, पी. एस. सूर्यवंशी. अमित विचारे, ग्रामसेवक सारिका कुंभार, ग्रामसेवक दीपक इंगवले, रामकृष्ण वाघमारे, पोपट जगताप, अनिल गर्कल, तसेच, ग्रामपंचायत कर्मचारी शरद पोवार, प्रकाश पाटील, बबन कातळे, आदी उपस्थित होते.