शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी नेहमीच रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:14 IST

इचलकरंजी : मी साखर कारखानदारांसोबत जाऊन निवडणूक लढवत असल्याची माझ्यावर टीका केली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज ...

इचलकरंजी : मी साखर कारखानदारांसोबत जाऊन निवडणूक लढवत असल्याची माझ्यावर टीका केली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. शेतकºयांचा कोणताही प्रश्न निर्माण झाला, तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल. मग त्यावेळी सरकार कोणाचेही असो, असा विश्वास व्यक्त करून खासदार राजू शेट्टी यांनी इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावर मीच तोडगा काढणार, असे सांगून मतदारांना भावनिक आवाहन केले.येथील विक्रमनगरातील बालाजी चौकात प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.शेट्टी म्हणाले, वारणा काठावरील शेतकºयांना पाणी कमी पडू न देता इचलकरंजीला पाणी कसे द्यायचे, या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे आहे; पण त्यात राजकारण घुसले असल्याने हा प्रश्न विधानसभा निवडणूक होईपर्यंत सुटू दिला जाणार नाही, तरीही इचलकरंजीकरांना मीच पाणी मिळवून देणार आणि त्याबरोबर वस्त्रोद्योगासाठीही सर्वांना एकत्र करून लढा उभारणार. त्यातून यश मिळवून देऊन वस्त्रोद्योगाला बळ देणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाआघाडीतील सर्व घटक पक्षांना शेवटच्या टप्प्यावर एकत्रित करून निवडणुकीला सामोरे गेलो. त्यामध्ये सर्वांनी दिलेली साथ अमूल्य आहे.माजी मंत्री जयंत पाटील यांनी, करकरेंसारख्या शहीद होणाºया अधिकाºयांविषयी अपशब्द काढणाºया प्रज्ञा सिंहला भाजपने उमेदवारी दिली व मोदी त्यांची पाठराखण करतात. त्यावरूनच मोदी सरकारची दिशा समजते. मोदी शेतकºयांच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. मात्र, पुलवामा हल्ल्याच्या नावावर मते मागतात. २०१४ नंतर पठाणकोट, उरी व पुलवामा असे तीन मोठे हल्ले झाले. त्याची नैतिक जबाबदारी समजून एकानेही राजीनामा दिला नाही. त्यातून त्यांचे खुर्चीप्रेम दिसते. भाजपचे लोक व्यक्तिगत टीका करताना दिसतात. त्यांच्याकडे प्रचारासाठी मुद्देच नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.माजी मंत्री प्रकाश आवाडे, दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र सकटे, शेतकरी समन्वय संघटनेचे व्ही. एम. सिंग, गणपतराव पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, आदींची भाषणे झाली. सभेसाठी मदन कारंडे, राजूबाबा आवळे, दिलीप पाटील, अशोक जांभळे, संभाजीराव नाईक, आदींसह घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.वस्त्रोद्योगाचे नुकसानमोदी सरकारच्या नोटाबंदी व जीएसटी या फसलेल्या निर्णयांमुळे इचलकरंजीचा वस्त्रोद्योग मोडकळीस आला. त्यांची चुकीची धोरणे सर्वच उद्योगांना उद्ध्वस्त करत आहेत. त्याची जबाबदारी मात्र घेताना त्यांच्यातील कोणीही दिसत नाही.पदयात्रा व सभेला उत्स्फूर्त गर्दीइचलकरंजीतील घोरपडे नाट्यगृहापासून निघालेली पदयात्रा मुख्य मार्गांवरून के. एल. मलाबादे चौकात आली. तेथे शेतकºयांनी आसूडाचा आवाज काढत तसेच हलगीच्या तालावर ठेका धरत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. त्यानंतर मुख्य मार्गांवरून फिरून पदयात्रा विक्रमनगरात पोहोचली. तेथे सभेलाही मोठी गर्दी जमली होती.उद्धव मोदींबरोबर कसे?निवडणुकांपूर्वी मोदींवर आगपाखड करणारे उद्धव ठाकरे कोणत्या कारणाने मोदींबरोबर गेले, याचे उत्तर आजतागायत कोणाला समजले नाही.माती, शेतीला जात नसतेमाझ्यावर जातीयवादी असल्याची टीका सुरू आहे. दुसरा मुद्दा नसल्याने विरोधकांचे हे काम सुरू आहे. माती व शेतीला जात नसते. त्यामुळे जात बघून मत देण्यापेक्षा काम बघून मत द्या, असे आवाहन शेट्टी यांनी केले.