शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कठीण असली तरी मी जिगरबाज माणूस

By admin | Updated: July 10, 2015 00:13 IST

महादेवराव महाडिक : शरद पवार यांच्याशी साखर उद्योगातील अडचणींवर चर्चा

कोल्हापूर : निवडणुकीसाठी माझी फिल्डिंग नेहमीच असते. सातत्याने लोकांशी संपर्क आहे तरीही मला निवडणूक अवघड असत; परंतु जिगरबाज माणूस नेहमीच जिंकत असतो. त्यामुळे आतापासून काळजी करण्याचे कारण नाही. ‘योग्य वेळ आल्यावर बघू आणि बोलू,’ असे आमदार महादेवराव महाडिक यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची बुधवारी महाडिक यांनी बंद खोलीत भेट घेतली. त्यामुळे या भेटीत नक्की काय चर्चा झाली, याबद्दल जिल्ह्यातील जनतेला उत्सुकता होती म्हणून गुरुवारी ‘लोकमत’ने त्यांना त्याबद्दल विचारणा केली. त्यावर आमदार महाडिक म्हणाले, ‘विधानपरिषद निवडणुकीस अजून सहा महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे आताच या विषयावर चर्चा करण्याची घाई नाही. पवारसाहेब देशातील मोठे नेते आहेत. त्यांनी दोनवेळा साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यास मदत केली होती. त्यामुळे त्यांना भेटून साखर उद्योगासंबंधीच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. त्यामध्ये राजकीय चर्चा झालेली नाही.’ येथील पंचशील हॉटेलच्या खोली क्रमांक ४०२ मध्ये वास्तव्यास असलेल्या पवार यांना आमदार महाडिक बुधवारी सकाळी भेटले. या दोघांच्या चर्चेवेळी केवळ माजी मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, के. पी. पाटील खोलीच्या बाहेर थांबले होते. कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या पवार यांना आमदार महाडिक नेहमी भेटतात; परंतु यावेळी मात्र त्यांच्या भेटीला विधानपरिषदेचे संदर्भ जोडले गेले आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यात चर्चा सुरू झाली. महाडिक यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत सहकार्य करण्याचे साकडे घातले, अशा स्वरूपाची ही चर्चा आहे. ‘या महादेवराव,’ अशा शब्दांत पवार यांनी महाडिकांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांच्यात साखर कारखान्यांवर चर्चा झाली. तुमचे कारखाने कसे चालले आहेत, अशी विचारणा पवारांनी केली. त्यावेळी सध्याच्या अडचणी त्यांना सांगितल्या. वीस मिनिटे ही चर्चा झाली आणि दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. हॉटेलमधून बाहेर पडताना ते एकदमच बाहेर पडले. दोघांत चर्चा काय झाली, याचे गुपित केवळ मुश्रीफ यांनाच ठाऊक आहे. (प्रतिनिधी)पवार-महाडिक भेटीला विधान परिषदेची किनारमहाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व बाजार समितीच्या निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ला ठरवून ‘बाय’ दिला आहे. या पक्षाची ‘गोकुळ’मध्ये व विधान परिषदेसाठी आपल्याला मदत व्हावी, हे त्यामागील राजकारण आहे. ‘गोकुळ’मध्ये ती मदत झाली म्हणूनच त्यांची पुन्हा सत्ता आली. तिथे सतेज पाटील, विनय कोरे व हसन मुश्रीफ अशी युती झाली असती, तर सत्तांतर अटळ होते. आताही विधान परिषदेच्या निवडणुकीत सतेज पाटील हेच त्यांना आव्हान देतील, अशा हालचाली आहेत. अशा स्थितीत राष्ट्रवादी त्यांच्यासोबत राहिली, तर त्यांना ही लढत सोपी जाऊ शकते. त्यासाठी पवार यांचा ‘शब्द’ महत्त्वाचा असल्यानेच महाडिक त्यांच्या भेटीला गेल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.पवारसाहेब देशातील मोठे नेते. त्यांनी दोनवेळा साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढले आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर साखर उद्योगासंबंधीच्या अडचणी मांडल्या. त्यामध्ये राजकीय चर्चा झालेली नसल्याचे महाडिक यांनी स्पस्ट केले.