शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

अलमट्टी ८८ टक्के; कोल्हापूर, सांगली जिल्ह्यास पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:52 IST

प्रशांत कोडणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनृसिंहवाडी : कर्नाटकातील अलमट्टी धरण ८८ टक्के भरले असून, पाणीपातळी ५१८ मीटरवर स्थिर ठेवण्यात आली आहे. धरणात १०८ टीएमसी पाणीसाठी असून, सध्या १,७३,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यास कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत पुराचा धोका निर्माण होऊ शकतो.जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने ...

प्रशांत कोडणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनृसिंहवाडी : कर्नाटकातील अलमट्टी धरण ८८ टक्के भरले असून, पाणीपातळी ५१८ मीटरवर स्थिर ठेवण्यात आली आहे. धरणात १०८ टीएमसी पाणीसाठी असून, सध्या १,७३,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यास कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत पुराचा धोका निर्माण होऊ शकतो.जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने राधानगरी धरण भरले असून, कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणा, पंचगंगा, कृष्णा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. पुराच्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र व कर्नाटक प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय सुरू आहे.कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय यापूर्वीच झाला असून, कोल्हापूरपासून १४०,तर सांगलीपासून जवळपास १०० किलोमीटर अंतरावर असणाºया विजापूर आणि बागलकोट तालुक्याच्या सीमेवर अलमट्टी धरण आहे. २००५ मध्ये आलेल्या महापुरात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील अनेक गावे पाण्याखाली गेली होती. त्याचवेळी अलमट्टी धरणाच्या उंचीचा मुद्दा वादग्रस्त बनला होता.२००५ सालीच धरणाचे बांधकाम पूर्ण झाले व याच वर्षापासून म्हणजे २००५ सालचा महापूर नंतर नृसिंहवाडी येथील पाणीपातळीत होणारी वाढ व पाणीपातळी कमी होणे यात मोठा फरक पडला असून, पावसाने उघडीप दिल्याशिवाय धरणातून होणारा विसर्ग जरी कमी असला तरी वाढलेली पाणीपातळी लवकर कमी होत नाही, असे चित्र पहावयास मिळत आहे. याचे कारण अलमट्टी धरण की हिप्परगी धरण हा संशोधनाचा विषय आहे.१३ जुलैला नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन १५ जुलैपासून नदीची पाणी पातळी स्थिर आहे. येथील श्री दत्त मंदिर पाण्याखाली असून, पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. तसेच धरणातून होणारा विसर्ग संयमित असूनदेखील येथील नदीचे पाणी ओसरत नाही. पंचगंगा नदीदेखील इशारा पातळीवर वाहत आहे. दोन दिवस पावसाचा जोर कमी झाल्याने पातळी घटलीआहे.जुलैच्या मध्यावरच राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अजून पावसाचे दोन महिने शिल्लक असून, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत आणखी दमदार पाऊस झाल्यास महापुरासारखा धोका निर्माण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक शासनाने योग्य समन्वय साधण्याची गरज आहे.अलमट्टी धरणात पाणीपातळी ५१८ मीटरवर स्थिर ठेवून यापेक्षा येणारे जादा पाणी विसर्ग केले जात आहे. २२ जुलै रोजी सकाळी पाणीसाठा १०८ टीएमसी असून धरण ८८ टक्के भरले होते. धरणात १,७३,९२३ क्युसेक्स पाणी जमा होत होते. तर तेवढेच पाणी विसर्ग होत आहे. महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यातील धरणातील आवक व विसर्ग याची दररोज माहिती घेतली जात असून, अलमट्टी धरणाच्या पाणीपातळीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.- मंजुनाथ, अलमट्टी धरण अधिकारी