शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

आजपासून व्यापार सुरु करण्यास परवानगी द्या : ललित गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:16 IST

कोल्हापूर : राज्य शासनाने प्रायोगिक तत्वावर गेल्या आठवड्यात सरसकट दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. त्याआधारे पाच दिवस कोल्हापूर ...

कोल्हापूर : राज्य शासनाने प्रायोगिक तत्वावर गेल्या आठवड्यात सरसकट दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. त्याआधारे पाच दिवस कोल्हापूर शहरातील व्यापार सुरू राहिला. या कालावधीत कोरोना रूग्णांची संख्या वाढली नाही. त्यामुळे व्यापार सुरू करण्याने कोरोनाचा संसर्ग वाढत नाही, हे व्यापाऱ्यांचे म्हणणे खरे ठरले आहे. म्हणून आज (सोमवार)पासून आमचे सर्व व्यापार सुरू राहतील. त्याला सरकारची परवानगी मिळालीच पाहिजे, असे प्रतिपादन राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.

राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची विशेष बैठक रविवारी सायंकाळी असोसिएशनच्या कार्यालयात झाली. या बैठकीत गांधी बोलत होते. ते म्हणाले, प्रायोगिक परवानगीची मुदत शुक्रवारी दुपारी चार वाजता संपल्यानंतर सोमवारपासून पुन्हा व्यापार सुरू करण्याच्या परवानगीच्या प्रतीक्षेत सर्व व्यापारी आहेत. या परवानगीसंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, आदी विविध मान्यवर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून महाराष्ट्र चेंबरच्यावतीने निवेदनही दिले आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पण प्रत्यक्षात परवानगीचा आदेश निघालेला नाही, असे व्यापाऱ्यांच्या बाबतीत नेहमीच घडत आहे. तरीही व्यापाऱ्यांनी सोमवारपासून आपले व्यापार सुरू करण्याची तयारी केलेली आहे.

या बैठकीला सचिव रणजित पारेख, सहसचिव विजय येवले, खजिनदार अनिल पिंजानी, माणिक पाटील चुयेकर, प्रताप पवार, प्रितेश दोशी, स्नेहल मगदूम, अतुल लोंढे, शाम बासराणी, दीपक पुरोहित, भरत रावळ, इंदर चौधरी, आदी संचालक उपस्थित होते.