शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पिकांची संजीवके विक्रीस परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 18:27 IST

पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असणारी संजीवके विक्रीस शेती सेवा केंद्रांना राज्य सरकारने बंदी घातली असून, हे अन्यायकारक आहे. शासनाने काढलेला हा अध्यादेश मागे घ्यावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा बी-बियाणे, कीटकनाशक व खते व्यापारी संघटनेच्या वतीने शुक्रवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे केली.

ठळक मुद्देबी-बियाणे, कीटकनाशक व्यापाºयांची मागणी सदाभाऊ खोत यांना दिले निवेदनकारवाईच्या धसक्याखालीच विक्रेते!

कोल्हापूर, दि. १३ : पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असणारी संजीवके विक्रीस शेती सेवा केंद्रांना राज्य सरकारने बंदी घातली असून, हे अन्यायकारक आहे. एकीकडे सरकार उत्पादनवाढीसाठी शेतकºयांना प्रोत्साहन देत असताना दुसºया बाजूला बंदी घालून पुन्हा शेतकºयांचेच नुकसान करीत आहे. यासाठी शासनाने काढलेला हा अध्यादेश मागे घ्यावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा बी-बियाणे, कीटकनाशक व खते व्यापारी संघटनेच्या वतीने शुक्रवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे केली.

राज्य सरकारने प्लॅँट ग्रोथ रेग्युलेटर (पीकवाढीची संजीवके) विक्रीस शेती सेवा केंद्रांना बंदी घातली आहे. राज्यात गेली पाच वर्षे दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्यात बी-बियाणे, कीटकनाशके, खते परवानाधारक विक्रेत्यांचे ही संजीवके विक्री उपजीविकेचे साधन आहे. बी-बियाणे, कीटकनाशके व खतविक्रीतून फार कमी उत्पन्न मिळत आहे.

नोटाबंदी व जीएसटीमुळे व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. राज्य सरकारने विक्रीवर बंदी घातल्याने विक्रेत्यांचे कंबरडे मोडणार आहे. सदरच्या विक्रेत्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असताना राज्य सरकारने पुन्हा बंदी घालून न्यायालयाचा अवमान केला आहे. हा अध्यादेश तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा बेमुदत विक्री बंद आंदोलन करावे, असा इशारा संघटनेच्या वतीने राज्यमंत्री खोत यांना देण्यात आला.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, उपाध्यक्ष विकास कदम, सचिव सुनील डुणुंग, अशोक श्रीश्रीमाळ, नितीन जंगम, नीता शेट्टी, रमेश खाडे, संजय पोवार, संजय आढाव, अनिल पाटील, आदी उपस्थित होते.

कारवाईच्या धसक्याखालीच विक्रेते!एकीकडे कॅशलेसबरोबर पेपरलेस व्यवहारासाठी केंद्र सरकार आग्रही असताना विक्रेत्यांवर संगणकीय डाटाबरोबर वेगळे स्टॉक बुक ठेवण्याची सक्ती केली जाते. प्रत्येक कीटकनाशकाचे उगम प्रमाणपत्र ठेवणे बंधनकारक करून कारवाईच्या नोटिसा काढल्या आहेत. त्यामुळे सगळे विक्रेते कारवाईच्या धसक्याखालीच दबले आहेत. 

 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत agricultureशेती