शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

वर्तकांचे पाटणकरांवरील आरोप बिनबुडाचे

By admin | Updated: November 28, 2015 00:13 IST

संपत देसाई : ...अन्यथा कष्टकरी जनता त्यांना त्याच भाषेत उत्तर देईल

आजरा : ‘सनातन’ संस्थेचे डॉ. अभय वर्तक यांनी डॉ. भारत पाटणकर यांच्यावर केलेल्या आरोपामुळे वर्तक यांचे राजकीय व सामाजिक अज्ञान स्पष्ट होते. गेली ४० वर्षे डॉ. पाटणकर हे कष्टकरी, श्रमिक जनतेच्या न्यायासाठी पूर्णवेळ आपले आयुष्य झोकून देऊन काम करीत आहेत. अशा वेळी अभय वर्तक यांनी डॉ. पाटणकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप करू नयेत, असा सल्ला श्रमिक मुक्ती दलाचे राज्य संघटक कॉ. संपत देसाई यांनी येथे पत्रकार बैठकीत बोलताना दिला.कॉ. देसाई म्हणाले, जलसिंचन घोटाळ्याबाबत डॉ. पाटणकर गप्प का बसले असे म्हणणाऱ्या वर्तकांनी डॉ. पाटणकरांच्या नेतृत्वाखाली २०१३-१४ मध्ये लोकाभिमुख पाणी धोरण मंचच्या माध्यमातून झालेली आंदोलने पहावीत. पाण्याची चोरी करणाऱ्या आणि सिंचन घोटाळा करणाऱ्या मंत्र्यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर एकाचवेळी अनेक जिल्ह्यांत मोर्चे निघाले होते. पुणे येथे श्रमिक मुक्ती दलाच्या पुढाकाराने सर्व संघटनांना एकत्र करून संघर्ष परिषद घेण्यात आली होती.सन २०१४ मध्ये आझाद मैदान मुंबई येथे हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीने धरणे आंदोलने प्रा. डॉ. एन. डी. पाटील व डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. त्यावेळी अभय वर्तक आणि त्यांची सनातन संस्था कुठे होती, असा प्रश्नही देसाई यांनी उपस्थित केला.मदरशांचे कोम्बिंग आॅपरेशन करा, असे पाटणकर का म्हणत नाहीत असे म्हणणाऱ्या वर्तक यांनी पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील सर्व मदरशांच्या मौलानांना सोबत घेऊन ज्यांना मदरशांविषयी संशय वाटतो त्यांनी मदरशांमध्ये यावे आणि मदरसे तपासावेत, अशी मागणी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लिम समाजाचा मोर्चा काढला होता हे वर्तक यांनी समजून घ्यावे.पाटणकर आणि दाभोलकर कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्याच्या वर्तक यांच्या सल्ल्याची पोलिसांना गरज नाही. याबाबत निर्णय घेण्यास पोलीस खाते सक्षम आहे.पोलीस आणि समाजाला गुन्हेगार कोण आहेत याची चांगलीच माहिती आहे. देशातील कष्टकरी व श्रमिक जनतेमध्ये फूट पाडू पाहणाऱ्या वर्तक आणि त्यांच्या सनातन संस्थेने कोणतेही विधान किंवा लिखाण करताना जबाबदारीने करावे. तत्पूर्वी, त्यांचे सामाजिक योगदान आणि कष्टकरी श्रमिकांसाठीचा संघर्षही पहावा; अन्यथा महाराष्ट्रातील कष्टकरी जनता त्यांना त्याच भाषेत उत्तर देईल, असा इशाराही देसाई यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)