शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

माऊलीसह सहाही आरोपींच्या पोलीसकोठडीत वाढ

By admin | Updated: May 15, 2015 23:32 IST

माऊलीचा एक जवळचा सेवेकरी प्रकाश बाईत तिला सोडून गेला. प्रकाशला अद्दल घडावी, तो आपल्याकडे यावा, यासाठी माऊलीने ७ वर्षीय मुलाचे शिक्षक मधुकर चिंदकेच्या सहाय्याने अपहरण केले.

चिपळूण : आपल्या भोंदुगिरीने भक्तगण वाढवण्यासाठी एका बालकाचे अपहरण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या माऊली वासंती कांबळीसह इतर ५ आरोपींना न्यायालयाने आज (शुक्रवारी) दि. १८पर्यंत पोलीसकोठडी वाढवली. चिपळूण शहराजवळील कापसाळ गावी वासंती वसंत कांबळी या हॉटेलमध्ये पोळ्या लाटणाऱ्या महिलेने कलावती आर्इंच्या नावाने कापसाळ-फणसवाडी येथे सिध्दकला मठाची स्थापना केली. या मठाच्या माध्यमातून दर गुरुवारी ती प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेत असे. अगदी मूल होण्यापासून ते कॅन्सरवर उपचार करण्यापर्यंत साऱ्या गोष्टी माऊली साध्य करत असत, अशी अनेक भक्तांची श्रध्दा होती. आपले भक्त वाढावेत, यासाठी माऊलीचे विविध फंडे सुरु होते. त्यासाठी तिने कामथे हुमणेवाडी येथील नदीत एका दगडावर आपले स्वत:चे पाऊल कोरुन घेऊन ते कलावती आर्इंचे असल्याचे भासवले. येथील नदी अडवून तेथे श्रीकृष्णाचे मंदिर बांधले.दिवसेंदिवस माऊलीची कीर्ती वाढवण्यासाठी आटापिटा सुरु असतानाच माऊलीचा एक जवळचा सेवेकरी प्रकाश बाईत तिला सोडून गेला. प्रकाशला अद्दल घडावी, तो पुन्हा आपल्याकडे यावा, यासाठी माऊलीने त्याच्या ७ वर्षीय मुलाचे माध्यमिक शिक्षक मधुकर चिंदके याच्या सहाय्याने अपहरण केले. या कटात प्राजक्ता ऊर्फ मंगला जावळे, सूरज दळवी, माऊलीची ब्ाहीण अर्चना वाजे व चिंदकेच्या बहिणीचा पती सूर्यकांत नलावडे यांनी तिला मदत केली. या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना आजपर्यंत पोलीसकोठडी सुनावण्यात आली होती. आज पुन्हा या सहाही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १८ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.याप्रकरणी पोलीस तपास वेगाने सुरु आहे. प्रथमला घरातून उचलून नेताना प्राजक्ता जावळेला ज्यांनी पाहिले होते, अशा काही महिलांची चौकशी आता पोलिसांनी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)काही भक्तांचे धाबे दणाणलेमाऊलीच्या अटकेनंतर कामथे ग्रामस्थांनी नदीपात्रातील मंदिरे काढून टाकण्याबाबत आवाज उठविला व भक्तगणांना येथे येण्यास मज्जाव केला. त्यामुळे कामथे येथील मंदिराकडे एकही भक्तगण फिरकत नाही. माऊलीच्या मठातील कार्यक्रमही बंद झाले आहेत. सुरुवातीला काही काळ भक्तांनी माऊलीच्या सुटकेसाठी जपजाप केले. परंतु, आता माऊलीचे भांडे फुटल्याने भोंदुगिरी उघड झाली. त्यामुळे मठाकडेही भक्तगण फिरकत नाही. काही जवळच्या भक्तांचे धाबे दणाणले आहेत.