शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

माऊलीसह सहाही आरोपींच्या पोलीसकोठडीत वाढ

By admin | Updated: May 15, 2015 23:32 IST

माऊलीचा एक जवळचा सेवेकरी प्रकाश बाईत तिला सोडून गेला. प्रकाशला अद्दल घडावी, तो आपल्याकडे यावा, यासाठी माऊलीने ७ वर्षीय मुलाचे शिक्षक मधुकर चिंदकेच्या सहाय्याने अपहरण केले.

चिपळूण : आपल्या भोंदुगिरीने भक्तगण वाढवण्यासाठी एका बालकाचे अपहरण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या माऊली वासंती कांबळीसह इतर ५ आरोपींना न्यायालयाने आज (शुक्रवारी) दि. १८पर्यंत पोलीसकोठडी वाढवली. चिपळूण शहराजवळील कापसाळ गावी वासंती वसंत कांबळी या हॉटेलमध्ये पोळ्या लाटणाऱ्या महिलेने कलावती आर्इंच्या नावाने कापसाळ-फणसवाडी येथे सिध्दकला मठाची स्थापना केली. या मठाच्या माध्यमातून दर गुरुवारी ती प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेत असे. अगदी मूल होण्यापासून ते कॅन्सरवर उपचार करण्यापर्यंत साऱ्या गोष्टी माऊली साध्य करत असत, अशी अनेक भक्तांची श्रध्दा होती. आपले भक्त वाढावेत, यासाठी माऊलीचे विविध फंडे सुरु होते. त्यासाठी तिने कामथे हुमणेवाडी येथील नदीत एका दगडावर आपले स्वत:चे पाऊल कोरुन घेऊन ते कलावती आर्इंचे असल्याचे भासवले. येथील नदी अडवून तेथे श्रीकृष्णाचे मंदिर बांधले.दिवसेंदिवस माऊलीची कीर्ती वाढवण्यासाठी आटापिटा सुरु असतानाच माऊलीचा एक जवळचा सेवेकरी प्रकाश बाईत तिला सोडून गेला. प्रकाशला अद्दल घडावी, तो पुन्हा आपल्याकडे यावा, यासाठी माऊलीने त्याच्या ७ वर्षीय मुलाचे माध्यमिक शिक्षक मधुकर चिंदके याच्या सहाय्याने अपहरण केले. या कटात प्राजक्ता ऊर्फ मंगला जावळे, सूरज दळवी, माऊलीची ब्ाहीण अर्चना वाजे व चिंदकेच्या बहिणीचा पती सूर्यकांत नलावडे यांनी तिला मदत केली. या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना आजपर्यंत पोलीसकोठडी सुनावण्यात आली होती. आज पुन्हा या सहाही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १८ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.याप्रकरणी पोलीस तपास वेगाने सुरु आहे. प्रथमला घरातून उचलून नेताना प्राजक्ता जावळेला ज्यांनी पाहिले होते, अशा काही महिलांची चौकशी आता पोलिसांनी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)काही भक्तांचे धाबे दणाणलेमाऊलीच्या अटकेनंतर कामथे ग्रामस्थांनी नदीपात्रातील मंदिरे काढून टाकण्याबाबत आवाज उठविला व भक्तगणांना येथे येण्यास मज्जाव केला. त्यामुळे कामथे येथील मंदिराकडे एकही भक्तगण फिरकत नाही. माऊलीच्या मठातील कार्यक्रमही बंद झाले आहेत. सुरुवातीला काही काळ भक्तांनी माऊलीच्या सुटकेसाठी जपजाप केले. परंतु, आता माऊलीचे भांडे फुटल्याने भोंदुगिरी उघड झाली. त्यामुळे मठाकडेही भक्तगण फिरकत नाही. काही जवळच्या भक्तांचे धाबे दणाणले आहेत.