शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, ठेवीदारांच्या हितासाठी सर्वपक्षीय मोट

By admin | Updated: April 28, 2015 00:46 IST

पी. एन. पाटील : काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य पक्षाच्या नेत्यांची बैठक ; गालबोट न लागणारा कारभार करु

कोल्हापूर : शेतकरी व ठेवीदारांच्या हितासाठी राजकीय विनिमयश बाजूला ठेवून जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय मोट बांधली आहे. बँकेच्या हितास गालबोट लागेल असा कारभार होणार नाही याची दक्षता सर्वच पक्षांचे नेते घेतील, अशी ग्वाही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पी. एन. पाटील म्हणाले,नांदेड, बीड जिल्हा बँकांची अवस्था वाईट होती, त्यांना शासनाने मदत दिली, आमच्या बँकेची परिस्थिती चांगली आहे, पाचशे कोटींच्या ठेवी शिल्लक आहेत, केवळ अनियमितेमुळे प्रशासक आले. पूर्वी वसूल न होणाऱ्या कर्जासाठी बुडीत फंड होता, आता नसल्याने थेट एनपीए तरतूद करावी लागते. आम्ही एक अजेंठा घेऊन सभासदांसमोर जात आहे, शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणणार आहे, शासन शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करते पण या योजनेत काही त्रुटी आहेत, त्या दूर करून या योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा कसा होईल यासाठीही प्रयत्नशील आहे. बँक चांगली चालविण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, शासनाच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. सहकारी संस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा बँकेचा कारभार चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. ते निश्चितच कारभार चांगला करून बँकेला गतवैभव मिळवून देतील. केंद्र सरकारच्या कर्जमाफी योजनेतील ११२ कोटी रुपये परत गेले आहेत, हे पैसे ‘नाबार्ड’कडे पडून आहेत, याबाबत केंद्रीय मंत्र्यांशी अनेकवेळा चर्चा केली आहे. बँकेचे नवीन संचालक मंडळ आले की त्यांना सोबत घेऊन केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली. आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्हा बँकेतील कर्जवाटपात अनियमिता राहिल्याने एनपीए वाढत गेला आणि प्रशासक आले. येथे कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही. बँकिंग धोरण बदलत आहे, त्यानुसार आम्हाला भविष्यात काम करावे लागणार आहे. अपात्र कर्जमाफीतील कोट्यवधी रुपये ‘नाबार्ड’कडे पडून आहेत, तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी दोन्ही खासदारांनी प्रयत्न करावेत. यावेळी के. पी. पाटील, निवेदिता माने, उदयानी साळुंखे, अरुण नरके, अप्पी पाटील, प्रा. जयंत पाटील, राहुल आवाडे, राजू आवळे, आर. के. पोवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)नरकेंमुळेच चार जागा बिनविरोध पन्हाळ्यातून माघार घेत विनय कोरे यांना बिनविरोध केले, त्यामुळे कोरे यांनी हातकणंगलेतून महादेवराव महाडिक यांना बिनविरोध केले. करवीरमधून पी. एन. पाटील यांच्या विरोधातील अर्ज आमदार चंद्रदीप नरके यांच्या कार्यकर्त्यांनी माघार घेतल्याने राधानगरीतून पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी माघार घेऊन ए. वाय. पाटील यांना बिनविरोध केले. या चार जागा बिनविरोध करण्यामागे नरके काका-पुतण्यांचे योगदान असल्याचे अरुण नरके यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंशी चर्चेनंतर निर्णय दोन्ही काँग्रेसच्या पॅनेलमध्ये जाताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व दिवाकर रावते यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. कदाचित कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षांनी वरिष्ठांशी चर्चा केली नसेल, असा टोला संजय मंडलिक यांनी शिवसेनेच्या नेत्यांना हाणला. ‘बंटीं’च्या मुळेच मंडलिकांना उमेदवारी