शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

टोलला टोला देण्याचा सर्वपक्षीय निर्धार

By admin | Updated: March 20, 2016 00:18 IST

पालकमंत्र्यांना निवेदन देणार : सांगली-कोल्हापूर रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्याची मागणी

सांगली : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात केंद्र शासनाने सांगली-कोल्हापूर रस्त्याचा समावेश करून टोल रद्द करावा किंवा राज्य शासनाने रस्त्याचा खर्च करावा, अन्यथा टोल विरोधात तीव्र लढा उभारण्यात येईल, असा इशारा सांगलीतील सर्वपक्षीय बैठकीत शनिवारी देण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना रविवार, दि. २० मार्च रोजी याप्रश्नी निवेदन देण्यात येणार आहे . सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील टोलला विरोध करण्यासाठी सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. निमंत्रक महापौर हारुण शिकलगार व वाहतूकदार संघटनेचे नेते बापूसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत सर्वपक्षीय बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीला स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील, गटनेते किशोर जामदार, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, स्वाभिमानीचे गटनेते शिवराज बोळाज, भाजपच्या नीता केळकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, राष्ट्रवादीचे सांगली शहराध्यक्ष सागर घोडके, अंकलीचे सरपंच कीर्तीकुमार सावळवाडे, मदन पाटील युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर उपस्थित होते . महापौर शिकलगार म्हणाले की, सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील टोलविरोधात आता आक्रमक लढा उभारण्यात येणार आहे. शासनाने या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करून हा रस्ता टोलमुक्त करावा किंवा या ठेकेदाराचे काम पूर्ण करून शासनाने त्याची रक्कम अदा करावी, अशी मागणी रविवारी पालकमंत्र्यांकडे करणे आवश्यक आहे. सर्वांनी हा निर्णय मान्य करत रविवारी दुपारी चार वाजता येथील सर्किट हाऊसवर पालकमंत्र्यांची भेट घेऊन टोल रद्दची मागणी करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, कोल्हापूर येथील टोल रद्द करण्यासाठी ४५० कोटी रुपये शासन देणार आहे. त्या धर्तीवर हा टोल रद्द करण्यासाठी शासनाने १६२ कोटी रुपये द्यावेत. केंद्रीय सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनी सांगली-कोल्हापूर रस्त्याला टोल लावणार नाही, असे आश्वासन सांगलीत दिले होते. ते आश्वासन त्यांनी पूर्ण करावे, असे आवाहन पाटील यांनी केले. नीता केळकर म्हणाल्या, नितीन गडकरी यांनी टोल रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे याचा पाठपुरावा केल्यास निश्चित टोल रद्द होईल. अंकलीचे सरपंच कीर्तीकुमार सावळवाडे यांनी दोन दिवसात होणाऱ्या ग्रामसभेत टोलविरोधात ठराव घेणार असल्याचे जाहीर केले. आरपीआयचे सुरेश दुधगावकर, मनसेचे तानाजी सावंत यांनीही मते मांडली. बैठकीला शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले, एस. टी. कामगार संघटनेचे नेते बिराज साळुंखे, सांगली चेंबरचे अध्यक्ष गोपाळ मर्दा, वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी, प्रशांत पाटील-मजलेकर, नगरसेवक युवराज गायकवाड, विष्णू माने, राजू गवळी, पांडुरंग भिसे, लालू मेस्त्री तसेच शहरातील विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. झाडांचे गणित : ठेकेदाराकडून चुकले अ‍ॅड. अमित शिंदे म्हणाले, शास्त्री चौक ते अंकलीपर्यंतचा रस्ता डीपीमध्ये ३० मीटर असताना महापालिकेने ३५ मीटरच्या रस्त्याची परवानगी दिली आहे. तसा ठरावदेखील केला आहे. प्रथम हा ठराव रद्द करणे आवश्यक आहे. महापालिका हद्दीतील सुमारे ५९२ झाडे या ठेकेदाराने तोडली आहेत. एका झाडामागे पाच झाडे लावण्याचे आदेश असताना त्यांनी अद्याप एकही झाड लावलेले नाही. शिवाय अद्याप भूसंपादन केले गेले नाही. यामुळे कायद्यानुसार ठेकेदाराला टोलवसुली करता येत नसल्याचा मुद्दा शिंदे यांनी मांडला.