शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

शहर हद्दवाढीसाठी सर्वपक्षीय एकवटले

By admin | Updated: June 19, 2016 01:09 IST

शासकीय समितीसमोर मांडली ठाम मते : महापालिकेच्या सुविधा पाहिजे तर हद्दवाढ का नको?

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीसाठी आज, शनिवारी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या नेत्यांनी शासनाच्या समितीसमोर पोटतिडकीने आपली मते मांडली. ही मते मांडताना त्यांनी शहराचा विकास होण्यासाठी प्रस्तावित हद्दवाढीच्या गावांना समाविष्ट करण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. महापालिकेच्या सुविधा घेता तर हद्दवाढ का नको, असा सवालही यावेळी करण्यात आला. त्याचवेळी या प्रश्नात राजकारण न करता शहराची बदनामी करू नये, असे आवाहनही यावेळी काही नेत्यांनी केले. ग्रामीणचा बोजा शहरावरच प्रस्ताविक हद्दवाढीतील गावे ही शहरावर अवलंबून आहेत. ग्रामीण जनता महापालिका, सरकारी व खासगी दवाखान्यांतून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेत आहे. दररोज खरेदी-विक्रीच्या निमित्ताने, नोकरी, उद्योग, व्यवसायांच्या निमित्ताने लाखो लोक दररोज शहरातील वाहतुकीच्या सुविधेचा लाभ घेतात. महानगरपालिकेच्या मार्केटचा वापर करतात. नजीकच्या गावातून येणारे सुमारे ५० हजारांहून अधिक विद्यार्थी शहरातील शाळेतून शिक्षण घेत आहेत. त्यांना केएमटी बससेवा सवलतीच्या दरात दिली जाते. या सर्व गोष्टींचा बोजा शहरावर पडतो. ग्रामीण जनतेचा कचरा, सांडपाणी उपसा करण्याची वेळ महापालिकेवर येते. आत्ताच या गावांना इतक्या सुविधा महानगरपालिकेमार्फत दिल्या जात आहेत, म्हणूनच ही गावे शहरात समाविष्ट केली पाहिजेत, अशी भूमिका नगरसेवक जयंत पाटील यांनी मांडली. ज्यांचे राजकारण ग्रामपंचायतीवर अवलंबून आहे, असे मूठभर लोक याला विरोध करीत आहेत. जर हद्दवाढ करायची नसेल तर शासनाने महापालिकेचे रूपांतर नगरपालिकेत करावे, असेही प्रा. पाटील म्हणाले. बैठकीच्या सुरुवातीस कोल्हापूर शहर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी प्रास्ताविक केले. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश मोरे, लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, नगरसेविका अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, लाला गायकवाड, सुरेश जरग, ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई, यांनीही मते मांडली.