शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दारू-जुगारही हद्दपार!

By admin | Updated: October 5, 2015 00:17 IST

डॉल्बीनंतर आता तडवळे (सं) वाघोली : ग्रामसभेत एकमुखी निर्णय

वाठार स्टेशन : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत कोरेगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या तडवळे (सं) वाघोली गाव डॉल्बीमुक्त करण्याबरोबरच गावातून दारु व जुगार हद्दपार करण्याचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. तर पिंपोडे बुद्रुकमध्ये दारुबंदीवरुन सत्ताधारी व गावातील तरुणांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.सरपंच नलिनी भोईटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी गाव डॉल्बीमुक्त व्हावे, असा ठराव खुद्द सरपंच नलिनी भोईटे यांनी मांडला. याला भगवानराव देशमुख यांनी अनुमोदन दिले. यानंतर हा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आला. तसेच गावहद्दीत असलेली सर्व दारु दुकाने व जुगार अड्डे बंद करण्याचा ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला. गाव टॅँकरमुक्त करण्याबाबत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.यावेळी उपसरपंच अजित भोईटे, सदस्य विजय भोईटे, तंटामुक्ती अध्यक्ष अशोकराव भोईटे, सदस्य दत्तात्रय ठोंबरे, कल्पना बडेकर, अमोल चव्हाण, निलेश भोईटे, पांडुरंग भोईटे, ग्रामसेवक नवनाथ शिरसागर ग्रामस्थ मोेठ्या संख्येने उपस्थित होते.पिंपोडे बुद्रुकच्या ग्रामसभेत डॉल्बीबंदीचा ठराव यापूर्वीच मंजूर केला होता. याबाबत मंडळाच्या कार्यकत्यांनी नाराजी व्यक्त करत युवकांना या ठरावावेळी विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करण्यात आला. गावात डॉल्बीबंदी असतानाही डॉल्बी वाजवणाऱ्या मंडळांविरोधात दंडात्मक कारवाई करावी किंवा त्यांना ग्रामस्वच्छता करायला लावावी, असा आग्रह तरुणांनी धरला. यावर एका माजी सरपंचांनी माफी मागतली. यानंतर या ठरावास संबंधित युवकांनी संमती दिली.सरपंच मच्छिंद्र केंजळे, उपसरपंच जनार्दन निकम, तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर साळुंखे, जयेंद्र लेंभे, अशोकराव लेंभे, चंद्रकांत निकम, दौलतराव लेंभे, शांताराम निकम, नरेंद्र वाघांबरे, महेश मोहटकर, लक्ष्मण साळुंखे ग्रामविकास अधिकारी शशिकांत माने यांनी ठरावाचे वाचन केले. (वार्ताहर)पिंपोडेतील दारुबंदीसाठी १२ रोजी सभागोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या दारुबंदीबाबत निर्णय व्हावा, अशी मागणी व्यसनमुक्त युवक संघाच्या कार्यकत्यांनी केली. मात्र, यासाठी गावातील सर्वांनी एकत्रित येऊन ही मोहीम राबवावी, असे मत संजय साळुंखे यांनी मांडले. यासाठी कायदेशीर मार्गाने लढा उभारण्यावरुन जोरदार खलबते झाली. शेवटी दारुबंदीबाबत १२ आॅक्टोबर रोजी विषेश ग्रामसभा बोलवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.