शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

आजऱ्यात पी. एम. किसान योजनेतील बोगस लाभार्थ्यांकडून अद्यापही वसुली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST

आजरा : आजरा तालुक्यात पी. एम. किसान योजनेचे ११३७ बोगस लाभार्थी आहेत. त्यापैकी ९१४ करदाते व अन्य २५३ लाभार्थी ...

आजरा

: आजरा तालुक्यात पी. एम. किसान योजनेचे ११३७ बोगस लाभार्थी आहेत. त्यापैकी ९१४ करदाते व अन्य २५३ लाभार्थी आहेत. २५३ करदात्यांकडून २३ लाख ५० हजारांची रक्कम वसूल केली आहे. मात्र, ६६१ करदात्यांकडून ६१ लाख १८ हजार व अन्य २५३ बोगस लाभार्थ्यांकडून १ लाख ४५ हजार २०० अशी एकूण ७२ लाख ६३ हजार २०० रुपयांची रक्कम अद्यापही वसूल झालेली नाही. चुकीची माहिती देऊन शासनाची फसवणूक केलेल्या लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा आजरा तहसीलदार विकास अहिर यांनी दिला आहे. मात्र, बोगस करदात्यांकडून वसुली नाही व फौजदारी गुन्हाही दाखल झालेला नसल्यामुळे प्रामाणिक लाभार्थ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गरीब शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी देशात पी. एम. किसान योजना राबविण्यात आली. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे, अशा शेतकऱ्यांना चार महिन्याला दोन हजार असे वर्षाला सहा हजार दिले जातात. मात्र, यामध्ये करदाते कर्मचारी व एकाच कुटुंबातील अन्य व्यक्तींनाही लाभ मिळाल्याचे तक्रारीनंतर लक्षात आले. बोगस लाभार्थी शोधण्यासाठी नायब तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली अव्वल कारकून, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पाटील यांची समिती नियुक्त केली. समितीच्या गाववार केलेल्या सर्व्हेमध्ये ९१४ करदाते, तर अन्य २२३ असे एकूण ११३७ लाभार्थी अपात्र ठरविले. त्यांच्याकडून वसुलीसाठी नोटिसा लागू केल्या. त्यापैकी फक्त २५३ बोगस लाभार्थ्यांनी २३ लाख ५० हजार जमा केले. मात्र, अपात्र असलेले ८८४ बोगस लाभार्थ्यांकडून अद्यापही ७२ लाख ६३ हजारांची रक्कम वसूल झालेली नाही. अशा बोगस लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून तातडीने रक्कम वसूल करण्याची गरज आहे.

* पात्र लाभार्थी अद्यापही वंचितच

तालुक्यात पी. एम. किसान योजनेच्या नियम व अटी पूर्ण करणारे अनेक कुटुंबे आहेत. मात्र, अशा गरीब कुटुंबांना या योजनेच्या लाभापासून अजूनही वंचितच ठेवले आहे. अनेक गावांत एकाच कुटुंबातील पती-पत्नी, मुलगा, मुलगी यांना जमीन नावावर असल्याने योजनेचा लाभ मिळाला आहे.

* बोगस लाभार्थ्यांवरील कारवाईकडे लक्ष

करदाते व अन्य बोगस लाभार्थ्यांनी ८६ लाख १३ हजारांची शासनाची फसवणूक केली आहे. करदात्या बोगस लाभार्थ्यांना नोटिसा पाठविल्या, पण अन्य लाभार्थ्यांना याबाबतची कोणतीही सूचना अद्यापही दिलेली नाही. बोगसगिरीकडून शासनाचे पैसे उकळणाऱ्या अशा लाभार्थ्यांवर कारवाई कधी होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.