शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नावीन्याची आस जागवणारा ‘अभिआस’

By admin | Updated: January 1, 2015 00:04 IST

वाचक चळवळीस बळ : स्त्रियांनी नवीन वाचावे यासाठी प्रयत्न; सदस्यांची होते वैचारिक जागृती

प्रिया दंडगे - कोल्हापूर -स्त्रिया म्हटलं की, त्यांचा बहुतेक वेळ साड्या, दागिने, नटणे-मुरडणे या गोष्टींवर खर्च होतो, असा सार्वत्रिक समज दूर करत गेली ३५ वर्षे येथे नियमितपणे दर्जेदार पुस्तकांचे वाचन आणि त्यावरील चर्चा करणारा बहुसंख्य स्त्रिया असलेला ‘अभिआस’ हा ग्रुप कार्यरत आहे. ही समाजमनाला दिलासा देणारी बाब आहे. प्राचार्या लीलाताई पाटील यांनी सृजन आनंद विद्यालयाची स्थापना १९८५ मध्ये केली त्याचवेळी वाचनप्रेमींना एकत्र करून या ग्रुपची सुरुवात केली. स्त्रियांनी विचार करावा, बुद्धीला ताण द्यावा, प्रत्येक कृती करण्यापूर्वी विचार करावा, ही लीलातार्इंची त्यामागील भूमिका होती. ‘अभिआस’ याचा अर्थ नावीन्याची आस. स्त्रियांनी नवीन लेखक वाचावेत, आपापसांत वैचारिक चर्चा करावी, सुजाण पालकत्व निभवावं, असं लीलातार्इंना वाटत होतं. त्यातूनच त्यांनी ‘अभिआस’ची सुरुवात केली. त्यात जराही खंड न पडता ही वाचन चळवळ अव्याहतपणे सुरू केली आहे.महिन्यातून एकदा एका सभासदाकडे सगळेजण जमतात, आधी ठरलेले पुस्तक सगळेजण वाचून येतात आणि त्या पुस्तकावर एकजण बोलतो. त्यानंतर पुस्तकावर चर्चा होते. जी काही चर्चा होते, ती लिहून काढली जाते. या मासिक बैठकीमध्ये अनेकवेळा लेखकांचाही सहभाग असतो. राजन गवस, रेणू गावस्कर, श्याम मनोहर, डॉ. अनिल अवचट , डॉ. तारा भवाळकर अशा लेखकांसोबत ‘अभिआस’च्या वैचारिक गप्पा रंगल्या आहेत. कधी एका विशिष्ट विषयावर मान्यवर वक्त्याला पाचारण करून त्याचे विचार ऐकले जातात. दरवर्षी ८ मार्च महिला दिनानिमित्त दर्जेदार कार्यक्रम घेतले जातात. ज्योती सुभाष व अमृता सुभाष यांचा ‘काळोखाच्या लेकी’, महिलांच्या स्वच्छतागृहाच्या प्रश्नावर भाष्य करणारे ‘वुमनिया’ हे नाटक, ‘कर्तृत्ववान स्त्रिया’हा मुक्त आविष्कार असे कार्यक्रम ‘अभिआस’ने कोल्हापुरातील रसिकांसाठी केले आहेत. नीमाताई पोतनीस, उषा कल्याणकर, सुमित्रा जाधव, आशा आठल्ये, डॉ. उदयप्रकाश संत, डॉ. नीना संत या बुजुर्ग सभासदांबरोबरच तनुजा शिपूरकर, सुप्रिया काळे, अर्चना देसाई, अशी तरुण पिढीतील मंडळीही ‘अभिआस’मध्ये सामील होत गेली आहेत. सर्वांसाठी खुला ग्रुपसाधारणपणे तीसजणांचा हा ग्रुप वाचन करणाऱ्या सर्वांसाठी खुला आहे. त्याला कुठलेही शुल्क नाही. फक्त वाचनाच्या आनंदात डुंबणारी ही मंडळी महिन्यातील दोन तास सृजनांच्या सहवासात रमली आहेत.