शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
3
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
4
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
5
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
6
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
7
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
8
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
9
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
10
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
11
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
12
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
13
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
14
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
15
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
16
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
18
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
19
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
20
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
Daily Top 2Weekly Top 5

विमानसेवेच्या ‘टेकआॅफ’ची आशा पल्लवित

By admin | Updated: March 1, 2016 00:17 IST

केंद्रीय अर्थसंकल्प : बंद विमानतळे वापरात आणण्याच्या निर्णयात कोल्हापूरचा समावेश

कोल्हापूर : देशातील अनेक राज्यांमधील वापरात नसलेली विमानतळे वापरात आणण्याचा निर्णय केंद्रीय अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. यात कोल्हापूरचा समावेश असल्याने गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेल्या विमानसेवेचे टेकआॅफ होण्याची शहरवासीयांची आशा पल्लवित झाली आहे. अनेक राज्यांमध्ये लहान विमानतळ आहेत. मात्र, काही तांत्रिक आणि पायाभूत स्वरूपातील अडचणींमुळे त्याचा वापर होत नसल्याचे चित्र आहे. त्याचा फटका संबंधित राज्याला बसत आहे. ते टाळण्यासह या राज्यातील अशी विमानतळे वापरामध्ये आणण्याचा निर्णय अर्थसंकल्पातून घेण्यात आला आहे. तसेच नव्या २० विमानतळांच्या निर्मितीबरोबरच सध्या अस्तित्वात असलेल्या १६० विमानतळांचा वापर सुरू होणे शक्य आहे. या निर्णयात कोल्हापूरच्या विमानतळाचा समावेश आहे. या निर्णयामुळे संबंधित विमानतळाचा विकास होऊन येथून नियमितपणे विमानसेवा सुरू होईल, अशी आशा वाटत आहे. विमानतळ सुरू झाल्यास त्याचा तीर्थक्षेत्र विकास, पर्यटनवाढीला उपयोग होणार आहे. तसेच कोल्हापूरच्या उद्योग वाढीलाही चालना मिळणार आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास मिशनअंतर्गत देशातील ७६ लाख तरुणांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात झाला आहे. कोल्हापुरात बहुतांश लघुउद्योग आहेत. शिवाय कौशल्यपूर्ण उत्पादन निर्मिती अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे कौशल्य विकास मिशनअंतर्गत येथील युवक-युवतींना प्रशिक्षण मिळण्याची अधिक शक्यता आहे. (प्रतिनिधी)कोल्हापूरला उपयुक्त ठरणारे निर्णयदोन कोटी रुपयांच्या आत उलाढाल असलेल्या लघुउद्योगांना कर सवलतीचा निर्णय झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकतर लघुउद्योजक आहेत. त्यामुळे त्यांना संबंधित कर सवलत दिलासा देणारी असल्याची माहिती अर्थतज्ज्ञ व शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. विजय ककडे यांनी दिली. ते म्हणाले, दुग्ध व्यवसायाला चालना देणाऱ्या चार नवीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचा येथील दुग्ध व्यवसायाला फायदा होणार आहे. रस्ते, रेल्वे तसेच अन्य पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दोन लाख ११ हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यातून कोल्हापूर-वैभववाडी हा नवीन रेल्वे मार्ग तसेच रत्नागिरी महामार्गासाठी निधी उपलब्ध होणार आहे. लघुउद्योगांत नव्याने येणाऱ्या कामगारांना पहिल्या तीन वर्षांसाठी प्रॉव्हिडंट फंड ८.३३ टक्के दराने सरकारने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून या कामगारांचे ईपीएफ खाते सुरू होणार आहे. शिवाय त्यांना न्यू पेन्शन स्कीमचा फायदा होणार आहे.राज्यापाठोपाठ केंद्राचा सकारात्मक निर्णयगेल्यावर्षी राज्य सरकारने अर्थसंकल्पात राज्यातील दहा विमानतळांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात ९१ कोटींची तरतूद केली होती. यामध्ये कोल्हापूरच्या विमानतळाचा समावेश होता. याद्वारे कोल्हापूरच्या विमानतळ विकासाला बळ देण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊल टाकले. त्यापाठोपाठ आता केंद्र सरकारने वापरात नसलेली विमानतळे वापरात आणण्याचा जाहीर केलेला निर्णय विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने दिलासादायक ठरणारा आहे.