शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
3
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
4
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
5
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
6
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
7
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
8
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
9
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
10
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
11
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
12
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
13
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
14
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
15
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
16
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
17
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
18
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
19
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
20
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप

विमानसेवेच्या ‘टेकआॅफ’ची आशा पल्लवित

By admin | Updated: March 1, 2016 00:17 IST

केंद्रीय अर्थसंकल्प : बंद विमानतळे वापरात आणण्याच्या निर्णयात कोल्हापूरचा समावेश

कोल्हापूर : देशातील अनेक राज्यांमधील वापरात नसलेली विमानतळे वापरात आणण्याचा निर्णय केंद्रीय अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. यात कोल्हापूरचा समावेश असल्याने गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेल्या विमानसेवेचे टेकआॅफ होण्याची शहरवासीयांची आशा पल्लवित झाली आहे. अनेक राज्यांमध्ये लहान विमानतळ आहेत. मात्र, काही तांत्रिक आणि पायाभूत स्वरूपातील अडचणींमुळे त्याचा वापर होत नसल्याचे चित्र आहे. त्याचा फटका संबंधित राज्याला बसत आहे. ते टाळण्यासह या राज्यातील अशी विमानतळे वापरामध्ये आणण्याचा निर्णय अर्थसंकल्पातून घेण्यात आला आहे. तसेच नव्या २० विमानतळांच्या निर्मितीबरोबरच सध्या अस्तित्वात असलेल्या १६० विमानतळांचा वापर सुरू होणे शक्य आहे. या निर्णयात कोल्हापूरच्या विमानतळाचा समावेश आहे. या निर्णयामुळे संबंधित विमानतळाचा विकास होऊन येथून नियमितपणे विमानसेवा सुरू होईल, अशी आशा वाटत आहे. विमानतळ सुरू झाल्यास त्याचा तीर्थक्षेत्र विकास, पर्यटनवाढीला उपयोग होणार आहे. तसेच कोल्हापूरच्या उद्योग वाढीलाही चालना मिळणार आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास मिशनअंतर्गत देशातील ७६ लाख तरुणांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात झाला आहे. कोल्हापुरात बहुतांश लघुउद्योग आहेत. शिवाय कौशल्यपूर्ण उत्पादन निर्मिती अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे कौशल्य विकास मिशनअंतर्गत येथील युवक-युवतींना प्रशिक्षण मिळण्याची अधिक शक्यता आहे. (प्रतिनिधी)कोल्हापूरला उपयुक्त ठरणारे निर्णयदोन कोटी रुपयांच्या आत उलाढाल असलेल्या लघुउद्योगांना कर सवलतीचा निर्णय झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकतर लघुउद्योजक आहेत. त्यामुळे त्यांना संबंधित कर सवलत दिलासा देणारी असल्याची माहिती अर्थतज्ज्ञ व शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. विजय ककडे यांनी दिली. ते म्हणाले, दुग्ध व्यवसायाला चालना देणाऱ्या चार नवीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचा येथील दुग्ध व्यवसायाला फायदा होणार आहे. रस्ते, रेल्वे तसेच अन्य पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दोन लाख ११ हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यातून कोल्हापूर-वैभववाडी हा नवीन रेल्वे मार्ग तसेच रत्नागिरी महामार्गासाठी निधी उपलब्ध होणार आहे. लघुउद्योगांत नव्याने येणाऱ्या कामगारांना पहिल्या तीन वर्षांसाठी प्रॉव्हिडंट फंड ८.३३ टक्के दराने सरकारने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून या कामगारांचे ईपीएफ खाते सुरू होणार आहे. शिवाय त्यांना न्यू पेन्शन स्कीमचा फायदा होणार आहे.राज्यापाठोपाठ केंद्राचा सकारात्मक निर्णयगेल्यावर्षी राज्य सरकारने अर्थसंकल्पात राज्यातील दहा विमानतळांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात ९१ कोटींची तरतूद केली होती. यामध्ये कोल्हापूरच्या विमानतळाचा समावेश होता. याद्वारे कोल्हापूरच्या विमानतळ विकासाला बळ देण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊल टाकले. त्यापाठोपाठ आता केंद्र सरकारने वापरात नसलेली विमानतळे वापरात आणण्याचा जाहीर केलेला निर्णय विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने दिलासादायक ठरणारा आहे.