शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बड्या नेत्याच्या पाठिंब्याचे विमान कोसळले

By admin | Updated: August 1, 2015 00:34 IST

इस्लामपूर बाजार समिती विश्लेषण : जयंतरावांपुढे सर्वपक्षीय विरोधकांचा धुव्वा

अशोक पाटील -इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्याविरोधात सर्वपक्षीय विरोधक एकवटले होते. त्यामुळे निवडणूक चुरशीची ठरणार असे चित्र होते. मात्र पाटील यांच्या राजारामबापू शेतकरी विकास पॅनेलने विरोधकांचा धुव्वा उडवत ‘नाद करायचा नाय’ असे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब कोरे यांना शहरातील बड्या नेत्याने छुपा पाठिंबा दिला होता, परंतु त्या नेत्याची ताकद दिसलीच नाही. त्यामुळे पाठिंब्याचे हे विमान सपशेल कोसळले.मर्यादित सभासद असलेल्या इस्लामपूर बाजार समितीची निवडणूक चुरशीची होणार, असे चित्र विरोधकांनी तयार केले होते. परंतु मतदार संघातील सहकारी संस्था, सोसायट्या, ग्रामपंचायती, प्रक्रिया संस्था आदींवर जयंत पाटील यांच्या समर्थकांचे वर्चस्व आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला निवडणुकीत एकतर्फी विजय मिळविण्यात काहीही अडचण आली नाही.काळमवाडी येथे निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ करताना जयंत पाटील यांनी, या निवडणुकीत विजय निश्चित आहे, परंतु तो उच्चांकी असायला हवा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. कार्यकर्त्यांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकतर्फी विजय मिळवून दिला.व्यापारी गटात दोन जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादीतील बाळासाहेब कोरे यांनी बंडखोरी करून ‘विमान’ या चिन्हावर निवडणूक लढविली होती. त्यांना पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा होती. त्यामुळे विजयभाऊ पाटील यांचे अंतर्गत विरोधक माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर पिसे यांचे समर्थक राजारामबापू शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार माणिक गायकवाड यांचा पराभव होणार, अशी चर्चा होती. मात्र जयंत पाटील यांनी एका रात्रीत सर्व घडामोडी करीत गायकवाड व शामसुंदर पाटील यांनाच निवडून आणण्याचा आदेश दिला. त्यामुळे गायकवाड (८७0 मते) व पाटील (७५९ मते) विजयी झाले. विरोधी काँग्रेसचे विजय पवार यांना तिसऱ्या क्रमांकाची ६८0 मते मिळाल्याने त्यांचे विमान सपशेल कोसळले.(प्रतिनिधी)इस्लामपूर मतदारसंघात प्रथमच जयंत पाटील यांच्याविरोधात सर्वपक्षीय युवकांची फळी निर्माण झाली आहे. मतदारसंघातील सर्व संस्थांवर जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. मतदारही ठराविक असल्याने राष्ट्रवादीचा विजय निश्चित होता. परंतु आगामी काळात जनतेतून होणाऱ्या निवडणुकीला आम्ही आव्हान देऊ.- सी. बी. पाटील, संचालक, जिल्हा बँक.- राहुल महाडिक, माजी जिल्हा परिषद सदस्यराष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब कोरे यांना माझा पाठिंबा नव्हता. निवडणुकीच्या प्रचारात माझा काहीही संबंध नाही. राष्ट्रवादीचे सर्वच नेते, कार्यकर्ते एकदिलाने प्रचारात सामील होते. त्यामुळेच बाजार समितीवर आमचे नेते जयंत पाटील यांचेच वर्चस्व राहिले आहे.- विजयभाऊ पाटील, पक्षप्रतोदपक्षप्रतोद विजय पाटील यांचे असे उद्योग १९९१ पासून सुरू आहेत. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवार उभे करण्याच्या खेळ्या ते नेहमीच खेळतात. परंतु सभासद, व्यापारी आदी जयंत पाटील यांनाच मानणारे आहेत, हे विजय पाटील यांनी समजून घ्यावे.- अ‍ॅड. सुधीर पिसे, माजी नगराध्यक्ष