शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

जलयुक्त शिवारासाठी हवा कार्पोरेट सहभाग

By admin | Updated: February 9, 2015 00:36 IST

जिल्हाधिकारी : कार्पोरेट कंपन्या, कारखाना प्रतिनिधींसोबत आढावा बैठक

कोल्हापूर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात ७० गावांची निवड करण्यात आली आहे. मोठमोठे प्रकल्प, उद्योग उभारण्यास परवानगी देत असताना त्या परिसरातील जनतेला त्याचा लाभ व्हावा, त्यांचा जीवनस्तर उंचावावा, अशी शासनाची अपेक्षा असते. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमामध्ये कार्पोरेट कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणिवेतून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी येथे बोलताना केले. जलयुक्त शिवार अभियान कार्यान्वयीन यंत्रणांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी माने यांच्या अध्यक्षतेखाली कार्पोरेट कंपन्या, कारखाने यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, एम.आय.डी.सी.चे प्रादेशिक अधिकारी अशोक पाटील, उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.जलयुक्त शिवार अभियान ही महाराष्ट्र शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. पाच वर्ष हे अभियान राबविण्यात येणार आहे. यातील आवश्यक कामांची यादी तयार करण्यात आली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, राज्यात वारंवार पडणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत आहे. ही योजना यशस्वीपणे कार्यान्वित झाल्यास वारंवार दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा मिळणार आहे. त्यामुळे जलस्रोत बळकटीकरणाच्या विविध कामांमध्ये कार्पोरेट कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणिवेतून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारीे यांनी केले. बैठकीस गडहिंग्लजचे प्रांताधिकारी कुणाल खेमनार, करवीरचे प्रांताधिकारी प्रशांत देसाई, इचलकरंजीच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी यांच्यासह हिंदाल्को, डी. एस. विंडपॉवर, शाहू, हमीदवाडा कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मायनिंग कंपन्यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील पर्यावरणाची जाणीवपूर्वक जपणूक करावी, त्यासाठी वनविभागाचे मार्गदर्शन घ्यावे. एम.आय.डी.सी. परिसरातील कंपन्यांनी वृक्षलागवड व अन्य पर्यावरणपूरक उपक्रम राबवावेत. साखर कारखान्यांनी वृक्षलागवड करुन परिसराचे सौंदर्यीकरणही करावे. अशा ठिकाणी टुरिझम पॉर्इंट विकसित करावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.