शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

जलयुक्त शिवारासाठी हवा कार्पोरेट सहभाग

By admin | Updated: February 9, 2015 00:36 IST

जिल्हाधिकारी : कार्पोरेट कंपन्या, कारखाना प्रतिनिधींसोबत आढावा बैठक

कोल्हापूर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात ७० गावांची निवड करण्यात आली आहे. मोठमोठे प्रकल्प, उद्योग उभारण्यास परवानगी देत असताना त्या परिसरातील जनतेला त्याचा लाभ व्हावा, त्यांचा जीवनस्तर उंचावावा, अशी शासनाची अपेक्षा असते. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमामध्ये कार्पोरेट कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणिवेतून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी येथे बोलताना केले. जलयुक्त शिवार अभियान कार्यान्वयीन यंत्रणांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी माने यांच्या अध्यक्षतेखाली कार्पोरेट कंपन्या, कारखाने यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, एम.आय.डी.सी.चे प्रादेशिक अधिकारी अशोक पाटील, उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.जलयुक्त शिवार अभियान ही महाराष्ट्र शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. पाच वर्ष हे अभियान राबविण्यात येणार आहे. यातील आवश्यक कामांची यादी तयार करण्यात आली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, राज्यात वारंवार पडणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत आहे. ही योजना यशस्वीपणे कार्यान्वित झाल्यास वारंवार दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा मिळणार आहे. त्यामुळे जलस्रोत बळकटीकरणाच्या विविध कामांमध्ये कार्पोरेट कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणिवेतून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारीे यांनी केले. बैठकीस गडहिंग्लजचे प्रांताधिकारी कुणाल खेमनार, करवीरचे प्रांताधिकारी प्रशांत देसाई, इचलकरंजीच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी यांच्यासह हिंदाल्को, डी. एस. विंडपॉवर, शाहू, हमीदवाडा कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मायनिंग कंपन्यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील पर्यावरणाची जाणीवपूर्वक जपणूक करावी, त्यासाठी वनविभागाचे मार्गदर्शन घ्यावे. एम.आय.डी.सी. परिसरातील कंपन्यांनी वृक्षलागवड व अन्य पर्यावरणपूरक उपक्रम राबवावेत. साखर कारखान्यांनी वृक्षलागवड करुन परिसराचे सौंदर्यीकरणही करावे. अशा ठिकाणी टुरिझम पॉर्इंट विकसित करावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.