शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
5
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
6
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
7
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
8
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
9
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
10
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
11
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
12
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
13
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
14
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
15
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
16
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
17
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
18
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
19
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
20
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट

भरतीवर डोळा ठेवून पदांवर निशाणा

By admin | Updated: May 17, 2017 01:18 IST

सांगली जिल्हा बँक : संचालक मंडळातील राजकारणाला वेगळा रंग

अविनाश कोळी ।  लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : नोकरभरतीचा ‘अर्थ’पूर्ण निशाणा साधण्यासाठी जिल्हा बँकेच्या काही संचालकांनी पदांवर डोळा ठेवला आहे. गेल्या दोन वर्षात पदांच्याबाबतीत शांत असलेल्या काही संचालकांनी बँकेच्या कारभाराचे वस्त्रहरण करण्यास सुरुवात केल्याने, ही बाब आता स्पष्ट झाली आहे. जिल्हा बँकेच्या यापूर्वीच्या संचालक मंडळाने केलेल्या कारनाम्यांची नोंद घोटाळ्यांच्या कागदपत्रात कोरली गेली आहे. या घोटाळ्यांच्या चौकशांचे सत्र थांबल्याने सुप्त इच्छांचे वादळ बँकेत घोंगावत आहे. आर्थिकदृष्ट्या स्वच्छ प्रतिमेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची चर्चा दोन वर्षापूर्वी सुरू होती. अस्तित्वात असलेल्या संचालकांपैकी बऱ्याचजणांची नावे घोटाळ्यांच्या रंगात रंगली आहेत. त्यामुळेच यातील अनेकांना बँक कारभाराचा दीर्घ अनुभव असूनही, पदे मिळाली नाहीत. आता काही संचालकांनी भरतीच्या वधूला भुलून पदांच्या स्वप्नांचे बाशिंग गुडघ्याला बांधले आहे. जिल्हा बँक सध्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. मात्र शासकीय व संस्थात्मक अडचणींचे बांध तयार होऊ लागले आहेत. नोटाबंदीचा मोठा फटका बँकेला बसला आहे. राज्य बँकेच्या शाखांच्या माध्यमातून नवे संकट येऊ पाहत आहे. अशा परिस्थितीत बँकेच्या हितासाठी किंवा अडचणींचे बांध तोडण्यासाठी संचालकांची एकी कधीही दिसली नाही. याउलट अडचणींचे बांध दुर्लक्षित करून पदांची स्वार्थी शर्यत सुरू झाली आहे. प्रशासक नियुक्तीपूर्वी अस्तित्वात असलेल्या संचालक मंडळात जे राजकारण घडले, तेच पुन्हा घडू पाहत आहे. सत्ताधारी शेतकरी पॅनेलच्या नेत्यांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. कदाचित त्यांचेही या गोष्टींना बळ असल्याची चर्चा सुरू आहे. बँक पुन्हा बदनाम झाली, तर सत्ताधारी पॅनेल आणि त्यांचे नेतेही तितकेच बदनाम होणार आहेत, याचा विसर नेत्यांना पडला आहे. संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत वसंतदादा कारखान्याच्या निविदा प्रक्रियेवरून काही संचालकांनी अध्यक्षांना धारेवर धरले. त्यानंतर आटपाडीतील एका कारखान्याच्या कारनाम्यांची माहितीही उजेडात आणली. मात्र यापूर्वीच्या संचालक मंडळात बेकायदेशीररित्या झालेले निर्णय त्यांच्याच साक्षीने झाले होते. बँकेतील राजकारणाची लक्षणे ठीक नसल्याने, सत्ताधारी गटाचे नेते आ. जयंत पाटील यांनी यात लक्ष घालणे आवश्यक आहे. राजकीय गोेंधळगेल्या दोन वर्षात बँकेने सक्षमपणे वाटचाल केली आहे. वसंतदादा कारखान्यासह काही मोठे कारखानदार व संस्थांची थकबाकी या वर्षात वसूल होणे आवश्यक आहे. त्यासाठीचे प्रयत्न सध्या सुरू असले तरी, राजकीय गोंधळात आर्थिक गोंधळाचा नारळ केव्हाही फुटू शकतो. त्यामुळे राजकीय हालचालींना ‘ब्रेक’ लावणेच आता बँकेच्या हिताचे आहे. का सुरू आहे राजकारण... जिल्हा बँकेच्या भरती प्रक्रियेला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी मंजुरी मिळाली आहे. साडेचारशे पदांच्या भरतीस मान्यता आहे. तरीही सध्याच्या बँकेच्या आर्थिक बोजाचा विचार केला, तर दोनशेच्या वर कर्मचारी नियुक्त करणे धोक्याचे ठरू शकते. मंजूर झालेली सर्व पदे भरावीत, अशी इच्छा काही संचालकांची आहे. भरतीला ‘अर्थ’पूर्ण इच्छांचे राजकारण जोडले गेल्याने, यात अडथळा येणाऱ्या लोकांना बाजूला करण्याकडे काहींचा कल आहे. यातूनच सत्ताधाऱ्यांमध्येच राजकारण सुरू झाले आहे.