शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

एअर इंडिया, आरसीएफ विजयी

By admin | Updated: April 18, 2015 00:29 IST

--व्हीआयपी चषक क्रिकेट

कोल्हापूर : एअर इंडिया, मुंबई संघाने मयूर स्पोर्टस संघाचा ९ गडी राखून, तर दुसऱ्या सामन्यात आरसीएफ संघाने हुंडेकरी स्पोर्टस्चा ४० धावांनी पराभव करीत व्हीआयपी चषक क्रिकेट स्पर्धेची पुढील फेरी गाठली. कागल येथील शाहू मैदान येथे शुक्रवारी एअर इंडिया, मुंबई व मयूर स्पोर्टस् यांच्यात सामना झाला. नाणेफेक जिंकून मयूर संघाने प्रथम फलंदाजी करीत २५.३ षटकांत सर्वबाद १०१ धावा केल्या. यामध्ये रोहित पाटीलने १६, सूरज जाधवने ११, तर बाकी खेळाडूंना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. एअर इंडियाकडून अंकुश जयस्वालने ६ बळी घेतले, तर त्यास एस. मुल्लाणी याने २ बळी घेत मोलाची साथ दिली. उत्तरादाखल खेळताना फलंदाजीस आलेल्या एअर इंडिया संघाने १०१ धावांचे आव्हान केवळ ११.१ षटकांत १ बाद १०३ धावा करीत सहज पार केले. यात सलमान अहमदने नाबाद ४२ व रुद्रा दांडेने ३३ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.दुसरा सामना शास्त्रीनगर मैदानावर आरसीएफ, मुंबई व हुंडेकरी स्पोर्टस् यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना आरसीएफ संघाने ४० षटकांत ७ बाद २६० धावांचे आव्हान हुंडेकरी संघासमोर ठेवले. यात संतोष उपाध्ये ५२, सुनील चावरी ४९, शिवम दुबे ६१, अंकुर सिंगने ७ चेंडंूत नाबाद २७ धावांचा पाऊस पाडला. हुंडेकरी संघाकडून नासीर मोमीनने ४, तर अजय शितोळेने २ बळी घेतले.उत्तरादाखल खेळताना फलंदाजीस आलेल्या हुंडेकरी संघाचा डाव १७.४ षटकांत सर्वबाद २२० धावांत आटपला. यात अझीम काजीने ५८ व नौशाद शेख याने ५३, अतुल विटकरने ३७, नासिर मोमीनने २५ धावा करीत एकाकी झुंज दिली. मात्र, आरसीएफच्या अंकुर सिंग, वीरेंद्र कांबळी, तरांजित सिंग धिल्लॉँन यांच्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. अंकुर सिंगने ५ बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.